कांदा खरेदी करूनही नाफेड' , एनसीसीएफने थकविले बळीराजाचे पैसे

नाशिक : राज्यामध्ये केंद्र सरकारच्या नाफेड आणि एनसीसीएफ या दोन संस्थांनी शेतकऱ्यांच्या कांदा खरेदी करून देखील पैसे न दिल्याने बळीराजा आता हवालदिल झाले. याबाबत चौकशी करण्यास गेले असताना देखील या दोन्हीही संस्थांचे अधिकारी काहीही उत्तर देण्यात तयार नाही. त्यामुळे सणासुदीच्या दिवसात कांदा उत्पादक पैशाअभावी हवालदिल झाला असल्याची परिस्थिती आहे.

मागील काही दिवसापासून सतत त्याने कांद्याचा प्रश्न हा गाजत आहे. कधी कांद्याचे भाव कमी होतात तर कधी कांद्याचे भाव वाढत आहे. कांद्याचे भाव स्थिर राहावे यासाठी म्हणून केंद्र सरकारच्या उपभोक्ता मंत्रालयाने कृषी मंत्रालयाच्या सहकार्यातून नाफेड' व 'एनसीसीएफ या दोन एजन्सीच्या माध्यमातून कांदा खरेदी करून तो बाजारात कमी भावामध्ये आणण्याचे ठरवले आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली.

सातत्याने शेतकरी मागील काही दिवसांपासून नाफेड' व 'एनसीसीएफ या दोन्हीही एजन्सीच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करत आहेत.या दोन्हीही संस्थांकडून मोठ्या प्रमाणावर बोगस कांदा खरेदी झाली आहे अशा स्वरूपाच्या तक्रारी देखील उपभोक्ता मंत्रालयाकडे करण्यात आलेल्या होत्या पण त्या दृष्टिकोनातून सुरुवातीला कारवाई झाली नाही पण याबाबत ज्यावेळी केंद्र सरकारच्याच लक्षामध्ये काही गोष्टी आल्यानंतर त्यांनी त्याची चौकशी केली नाशिकच्या नाफेड' व 'एनसीसीएफ मधील अधिकाऱ्यांवरती कारवाई देखील केली आणि त्यानंतर काही प्रमाणात हा पुरवठा सुरळीत होईल यातून मार्ग निघेल अशी अपेक्षा असताना देखील ती प्रत्यक्षात खरी होऊ शकली नाही.

आता तर किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत 'नाफेड' व 'एनसीसीएफ' या दोन नोडल एजन्सीने व शेतकरी कंपन्यांच्या माध्यमातून प्रामुख्याने नाशिक, अहिल्यानगर, पुणे व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये ३ लाख टन कांद्याची खरेदी केली. दोन महिने उलटूनही कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना कष्टाचे पैसे मिळालेले नाहीत. परिणामी, ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना खरेदीदारांचे उंबरे झिजवावे लागत आहेत. बफर स्टॉकसाठी खरेदी करण्यात आलेला कांदा सध्या खरेदीदार संस्थांच्या ताब्यात आहे. खरेदीवेळी ७२ तासांत पैसे मिळतील असे सांगण्यात आले. मात्र आता दोन महिने उलटूनही पैसे खात्यावर आले नाहीत. यामागे कांदा खरेदी व प्रत्यक्ष उपलब्ध साठ्याचा ताळमेळ लागत नसल्याने हे पैसे ग्राहक व्यवहार विभाग अदा करत नसल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्व व्यवहारामुळे आता कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले असून कांदा विकूनही हातामध्ये पैसा नाही त्यामुळे सण कसा साजरा करावा नवीन पेरणी कशी करावी यासारख्या विवंचनेत शेतकरी वर्ग आहे.
Comments
Add Comment

'महायुती' सरकारचा मोठा राजकीय 'गेम'; ५४ आमदारांच्या मतदारसंघांसाठी राज्य सरकारचे २७० कोटी

मुंबई: राज्यातील सत्ताधारी 'महायुती' सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर एक मोठा राजकीय

तुमच्या खिशातली ५००ची नोट खरी आहे की नकली? हा धक्कादायक प्रकार ऐकून पायाखालची जमीनच सरकेल!

अमरावती: सावधान! तुमच्या हातात येणारी प्रत्येक ५०० रुपयांची नोट खरी आहे की, बनावट? कारण, अमरावती जिल्ह्यात बनावट

Exclusive News: मतदार यादीमुळे विरोधकांना कशा प्रकारे झाली मदत; भाजप करणार पर्दाफाश!

'दिल्ली अजून दूर, मी २०२९ पर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहणार' - देवेंद्र फडणवीस मुंबई: महाराष्ट्राचे

बाप रे ! 'लाडकी बहीण' योजनेचा १२,४३१ पुरुषांनीच घेतला गैरफायदा; सरकारी कर्मचाऱ्यांचाही समावेश, कोट्यवधींची लूट!

मुंबई: महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावे, त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारावे आणि कुटुंबातील त्यांचा निर्णय

सावधान! चेहऱ्याला दररोज क्रीम लावताय? फेअरनेस क्रीममुळे महाराष्ट्रातील तीन महिलांची किडनी निकामी

मुंबई: चेहरा गोरा आणि सुंदर करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काही 'स्किन लाईटनिंग क्रीम्स' आरोग्यासाठी किती

एअर इंडियाचे अमेरिकेला निघालेले विमान टेक-ऑफनंतर मुंबईत परतले; तांत्रिक बिघाडाची सात दिवसांतील दुसरी घटना

मुंबई: एअर इंडियाच्या मुंबईहून अमेरिकेतील नेवार्क शहराकडे जाणाऱ्या विमानाला (फ्लाइट AI191) टेक-ऑफनंतर तांत्रिक