जरांगे आरक्षण मिळेपर्यंत पाणी पण बंद करणार


मुंबई : ओबीसी कोट्यातून सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी करत मनोज जरांगेंच्या नेतृत्वात त्यांचे समर्थक मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. जरांगेंनी बेमुदत उपोषण सुरू केल्याचे जाहीर केले आहे. आरक्षणासाठी आंदोलन करत असलेल्या जरांगेंनी मागण्या पूर्ण होत नसतील तर चौथ्या दिवसापासून पाणीही घेणार नसल्याचे जाहीर केले आहे.


सरकार ऐकत नसेल, मागण्या मान्य होणार नसतील तर उपोषण आणखी कडक करणार. आता पाणीही पिणार नाही असे जरांगेंनी जाहीर केले. आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नसल्याचे जरांगेंनी जाहीर केले.


कुणी रेनकोट, छत्र्या वाटत असतील तर एक रुपया देऊ नका. काही लोकांनी धंदा सुरू केला आहे. समाजाच्या नावाने कमवत आहेत. रेनकोट वाटपाच्या नावाखाली पैसे गोळे करू नका. हे मी शेवटचं सांगतोय. महाराष्ट्रातील मराठ्यांनी कुणालाही पैसे द्यायचे नाही. फक्त गरीबाची सेवा करा. काही लोक समाजाला मदत करायची सोडून पैसे छापायला बघत आहे; असेही जरांगे म्हणाले.


मंत्री फक्त बैठका घेतात, आरक्षण देत नाहीत, असा आरोप करत जरांगेंनी मंत्र्यांवर टीका केली. मंत्री भंगार आहे, असा गंभीर आरोप जरांगेंनी केला.


Comments
Add Comment

१६ जानेवारीला मुंबई जिंका; अटलजींना तीच खरी आदरांजली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन मुंबई : “अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा' हे अटलजींचे उद्गार

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास