मुंबईत पाच दिवसांच्या गणरायाला निरोप, ढोल ताशाच्या निनादात गणेश मूर्तींचे विसर्जन

मुंबई: दिनांक २७ ऑगस्टपासून (Ganesh Chaturthi 2025) सुरू झालेल्या गणेशोत्सवाची धामधूम आणखीन काही दिवस राज्यभरात पाहायला मिळणार आहे. दरम्यान, मोठ्या उत्साहात घरोघरी विराजमान झालेल्या पाच दिवसाच्या गणपतीचे आज विसर्जन करण्यात आले.  'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'च्या जयघोषाने आणि जड अंतःकरणाने मुंबईकरांनी बाप्पाला निरोप दिला. दरम्यान, मुंबईतील सर्व चौपाट्या, तलाव परिसरात विसर्जनासाठी भाविकांनी दुपारपासून गर्दी केली होती.


अनेक ठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाच्या मिरवणुका काढण्यात आल्या, तर फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत उजळून निघाला.  मुंबईच्या चौपाट्यांवर तसेच घरगुती बाप्पाच्या मूर्तीसाठी उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावात  रात्री उशिरापर्यंत विसर्जन सुरू राहिले.


यादरम्यान, गणेशभक्तांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा मुंबईच्या प्रमुख चौपाट्यांवर आणि तलावावर उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.  ज्यात विद्युत रोषणाई, निर्माल्य संकलनासाठी कुंड आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने बॅरिकेड्सची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


ज्येष्ठा गौरी पूजन


आज घरगुती पाच दिवसाच्या गणपतीचे विसर्जन झाले, पण आज अनेकांच्या घरी गौराईचे आगमन झाले आहे, त्यानुसार उद्या अनेक ठिकाणी ज्येष्ठा गौरी आवाहन साजरा केला जाणार असून, तिसऱ्या दिवशी   म्हणजे मंगळवारी सात दिवसांच्या गणपतींसोबत विसर्जन केले जाईल. त्यामुळे अजून दोन दिवस मुंबईच्या चौपाट्यांवर भाविकांची गर्दी असणार आहे.

Comments
Add Comment

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबई विमानतळावर आगमन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत

मुंबई : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांचे आज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे

Mumbai Local News : लोकलमध्ये महिलेला मारहाण करणाऱ्या पुरुषाला १२ तासांत अटक

मुंबई : लोकलमध्ये महिलेला मारहाण करत असलेल्या पुरुषाचा व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ व्हायरल होताच अवघ्या १२

Weather changes in Maharashtra : महाराष्ट्रात पुन्हा बदलले हवामान; शनिवारी अनेक भागांत पावसाचा अंदाज, ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

मुंबई : महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे वारे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर

Boss Scam : अधिकारी बनून पैशांची मागणी; 'बॉस स्कॅम'पासून सावधान राहण्याचे केंद्राचे आवाहन

नवी दिल्ली : व्हॉट्सॲप, ई-मेल किंवा इतर संदेशवहन माध्यमांचा वापर करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या सायबर

New IT Rules : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नवीन आयटी नियम कठोर, आक्षेपार्ह मजकूर हटवण्याची मुदत २४ तासांवरून थेट २ तासांवर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी आक्षेपार्ह आणि संवेदनशील मजकूर हटवण्याच्या मुदतीत

PM Modi and Sukhbir Singh Badal Meeting : पंतप्रधान मोदी आणि सुखबीर सिंग बादल यांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण

नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी मित्रपक्ष असलेल्या भारतीय जनता पक्ष (भाजप)