रत्नागिरीमध्ये विनापरवाना शस्त्र बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक

रत्नागिरी : वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने विनापरवाना शस्त्र बाळगल्या प्रकरणी देवरूखच्या पोलिसांनी दोघा जणांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार साध्या वेशात गस्त घालणाऱ्या देवरूखच्या दोन पोलीस हेडकॉन्स्टेबलना तरुणांचा संशय आल्याने सखोल चौकशी केल्यावर शिकारीचा उद्देश उघड झाला. वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.

रात्री गस्त घालताना विघ्रवली एस टी बस स्टॉप (देवरूख) ते सोनवडे रस्त्यावर दोघे जण डोक्याला बॅटरी लावलेले दिसले. गस्त घालणाऱ्या अभिषेक वेलणकर आणि सचिन कामेरकर या दोन हेडकॉन्स्टेबलनी त्या दोन स्कूटरस्वारांकडे विचारणा केली असता त्यांनी समर्पक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे पोलिसांचाच संशय बळावला आणि अधिक चौकशी केली यापैकी एकाकडे जिवंत काडतूस आणि बंदूक आढळली.

प्रीतेश प्रतिपाल आडाव (वय २६ वर्षे, रा. कांजिवरा, देवरूख आणि साहिल संतोष कदम (वय १९, रा. ओझरे बौद्धवाडी) अशी अटक केलेल्या दोन तरुणांची नाव असून हे तरुण वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. या कारवाईत दुचाकीसह गावठी बंदूक, जिवंत काडतूस बॅटरी जप्त करण्यात आली.

विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी वन्य प्राण्यांच्या शिकारीच्या उद्देशाने फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
Comments
Add Comment

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

जगभरात लोकप्रिय ‘रेडिओ सिलोन’ची शताब्दी

‘बिनाका गीतमाला’सह गाजलेले अनेक कार्यक्रम कोलंबो : भारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासात अजरामर ठरलेल्या ‘रेडिओ

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा' चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो

मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ