Sharad Pawar on Maratha Reservation: मराठा अरक्षणाबद्दल शरद पवारांचं मोठं वक्तव्य!

अहिल्यानगर: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनाला सुरुवात केली आहे. आज आंदोलनाचा दुसरा दिवस असून जो पर्यंत सरकार मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार असल्याची घोषणा जरांगेने केली आहे. ऐन गणेशोत्सवात सुरू केलेल्या या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर मराठा समाज मुंबईत दाखल झाल्याने, त्याचा परिणाम प्रशासन आणि वाहतूक व्यवस्थेवर होत आहे. या आंदोलनावरून सत्ताधारी आणि विरोधकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असताना, राष्ट्रवादी कोंग्रेस नेते शरद पवार यांनी मराठा आरक्षणावरून मोठे वक्तव्य केले आहे. शरद पवार यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी घटनेत बदल करता येऊ शकतो असे विधान केले आहे, त्यासाठी त्यांनी तामिळनाडूचा संदर्भ घेत हे शक्य होऊ शकते, असे म्हंटले आहे. त्यांच्या या विधानामुळे मराठा समाज अरक्षणाबाबात आणखीनच आशावादी होण्याची शक्यता आहे.


नुकताच शरद पवार यांनी मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या या विधानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतला आहे. शरद पवार यांनी अहिल्यानगरमधील एका कार्यक्रमात हजेरी लावली, यादरम्यान ते बोलत होते.



काय म्हणाले शरद पवार?


या कार्यक्रमात मराठा समाजाच्या आरक्षाविषयी बोलताना ते म्हणाले, ७२ टक्के आरक्षण तामिळनाडूमध्ये (Tamilnadu Reservation) होऊ शकते. तर घटनेत बदल करता येऊ शकते. घटनेत बदल (दुरुस्ती) करण्याची भूमिका घेतली तरच मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न सुटू शकतो.


यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांना मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण (OBC Reservation) देण्याबाबत आपली भूमिका जाहीर करण्यास सांगितले होते. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेतली आहे. यावर आता फडणवीस सरकार काय प्रतिक्रिया देते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच आज आझाद मैदानावर होत असलेल्या मराठा आंदोलनासाठी देण्यात आलेली एक दिवसाची मुदतवाढ देखील संपत आली आहे.


इतकेच नव्हे तर, गेले दोन दिवस मराठा आंदोलनात उसळलेली गर्दी आणि त्यामुळे मुंबईची विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्थेचा विचार करता सरकार काय निर्णय घेणार आहे, याकडे जनसामान्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Comments
Add Comment

वांद्रे पश्चिममधील एस. व्ही. रोडवरील त्या तुंबणाऱ्या पावसाच्या पाण्यापासून मिळणार मुक्ती

मुंबई (सचिन धानजी) : वांद्रे पश्चिम येथील एस व्ही रोड आणि के.सी मार्गावर पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या वारंवारच्या

ब्रिटिशकालीन १२ वर्षांच्या पुलाचा शेवट; रेल्वे ट्रॅकवरील काम जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई: मुंबईतील ११२ वर्षांचा जुना आणि महत्त्वाचा ब्रिटिशकालीन रस्ता पूल, एलफिन्स्टन पूल पाडण्याच्या कामाचा

मविआच्या दुटप्पी भूमिकेची पोलखोल करण्यासाठी भाजपचे आंदोलन

निवडणुकांच्या तोंडावर फेक नरेटिव्हचा 'मविआ' चा कट उधळून लावा – भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण मुंबई: आगामी

वेध निवडणुकीचा : कलिना आणि वांद्रे पूर्व भाजपसाठी अनुकूल; २० ते २२ नगरसेवक निवडून येतील

उत्तर मध्य भाजप जिल्हाध्यक्ष विरेंद्र म्हात्रे यांनी व्यक्त केला विश्वास सचिन धानजी मुंबई : मुंबई उत्तर मध्य

मुंबईत राजकीय रणकंदन पेटले! विरोधकांच्या ‘सत्याचा मोर्चा’ला भाजपचे 'मूक आंदोलन' करत जशास तसे प्रत्युत्तर

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि मतदार यादीतील मोठ्या गोंधळावर आक्षेप घेत, आज (दि. १) मुंबईत महाविकास

रस्त्यांच्या नियमित स्वच्छतेसाठी रस्ते दत्तक उपक्रम महापालिका राबवणार, कनिष्ठ पर्यवेक्षकांवर दोन ते तीन रस्त्यांची जबाबदारी सोपवणार

मुंबई : मुंबईत पावसाळ्यात रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांची समस्या निकालात काढण्यासाठी महापालिकेने रस्ते