राहुल द्रविडचा धक्कादायक निर्णय! राजस्थान रॉयल्सच्या प्रशिक्षकपदाचा तडकाफडकी राजीनामा

नवी दिल्ली: भारताचा दिग्गज क्रिकेटपटू, माजी प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. राहुलच्या राजीनाम्या संदर्भातील माहिती संघ व्यवस्थापनाने दिली आहे. खरं तर प्रमुख खेळाडू संजू सॅमसन हा या हंगामात राजस्थान संघाकडून खेळणार नाही, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात होती. ही चर्चा सुरू असतानाच, राहुल द्रविडनने राजीनामा दिल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.


टीम इंडियाला आपल्या मार्गदर्शनाखाली टी-२०  वर्ल्ड कप जिंकून देणारे राहुल द्रविड यांनी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. या निर्णयाची माहिती स्वतः राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीनं सोशल मीडियावर दिली.


राजस्थान रॉयल्सच्या व्यवस्थापनानं ही अधिकृत माहिती दिली आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आयपीएल २०२६  (IPL 2026) च्या पर्वाला सुरुवात होण्याआधीच आपला कार्यकाळ संपुष्टात आणणार आहे.



राजीनाम्याचं कारण काय?


आयपीएल २०२५ मध्येच राजस्थान रॉयल्सच्या संघात सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा होती. कर्णधार संजू सॅमसन हा संघ व्यवस्थापनावर नाराज होता. पण नंतर राहुल द्रविडनंच ते वृत्त फेटाळलं होतं. कोणत्याही प्रकारचा वाद नसल्याचं द्रविडनं त्यावेळी स्पष्ट केले होते.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत