शिंदे समिती आणि जरांगेंच्या बैठकीत तोडगा नाहीच


मुंबई : मनोज जरांगे आणि त्यांचे समर्थक मुंबईत आझाद मैदान येथे आंदोलन करण्यासाठी जमले आहेत. जरांगेंनी आरक्षण मिळावे म्हणून बेमुदत उपोषण सुरू करत असल्याचे जाहीर केले आहे. राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने जरांगेंशी चर्चा केली. याप्रसंगी बोलताना शिष्टमंडळाने दोन लाख ३९ हजार प्रमाणपत्र मान्य केल्याचे सांगितले. पण जरांगे त्यांच्याच मागणीवर अडून बसले आहेत. बराच वेळय चर्चा झाली पण शिंदे समिती आणि जरांगेंच्या बैठकीत तोडगा निघाला नाही.


मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या आणि तातडीने तशी प्रमाणपत्र द्या; अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. 'मराठा समाजाला कुणबी घोषित केल्याशिवाय मी हटणार नाही. आदेशाची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी माघारी परतणार नाही. मराठवाड्यातील एक लाख २३ हजार कुणबी गेले कुठे ?' असं जरांगे म्हणाले. 'शिंदे समितीने तेरा महिने अभ्यास केला. आता अहवाल द्यावा, आता एक मिनिटही देणार नाही, उद्या सकाळपर्यंत प्रमाणपत्र हातात द्या', असंही जरांगे म्हणाले.


जरांगेंनी ही मागणी केल्यानंतर शिंदे समितीने तातडीने एक बैठक घेण्याचा निर्णय घेतला. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिंदे समितीची बैठक झाली. ही बैठक थोड्या वेळापूर्वीच संपली पण जरांगेंना अपेक्षित निर्णय झालाच नाही. 


Comments
Add Comment

'उबाठा' गटाला पुन्हा खिंडार? निम्म्याहून अधिक खासदार शिवसेनेच्या वाटेवर

- कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच 'धमाका' होणार; एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यांनातर घडामोडींना वेग मुंबई :

महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक २०२६ एकमताने मंजूर

मुंबई : राज्यातील पर्यावरण संरक्षण, आर्थिक शिस्त आणि औद्योगिक विकास यांचा समतोल साधण्याच्या दृष्टीने

‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा

नक्षलग्रस्त भागात सागवान तस्करांचा धुमाकूळ; वनमंत्र्यांकडून सखोल चौकशीचे आदेश

मुंबई : नक्षलग्रस्त भागातील मौल्यवान सागवान लाकडाची तस्करी करणार्‍या संघटित टोळ्यांना राजकीय पाठबळ मिळत आहे,

मालाडमध्ये प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनात घोटाळा- चौकशी समिती गठीत; अहवाल प्राप्त होईपर्यंत प्रकल्पाला स्थगिती

मुंबई : मालाड पूर्वमधील प्रकल्प बाधितांच्या (पीएपी) पुनर्वसनात घोटाळा झाल्याची बाब बुधवारी विधानसभेत चर्चेला

मुंबईतील जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनात त्रुटी ठेवणार नाही; मंत्री पंकजा मुंडेंनी विधान परिषदेत मांडली ठोस भूमिका

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या केईएम (KEM), नायर आणि कूपर या प्रमुख रुग्णालयांमधील जैववैद्यकीय कचऱ्याची