शिंदे समिती आणि जरांगेंच्या बैठकीत तोडगा नाहीच


मुंबई : मनोज जरांगे आणि त्यांचे समर्थक मुंबईत आझाद मैदान येथे आंदोलन करण्यासाठी जमले आहेत. जरांगेंनी आरक्षण मिळावे म्हणून बेमुदत उपोषण सुरू करत असल्याचे जाहीर केले आहे. राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने जरांगेंशी चर्चा केली. याप्रसंगी बोलताना शिष्टमंडळाने दोन लाख ३९ हजार प्रमाणपत्र मान्य केल्याचे सांगितले. पण जरांगे त्यांच्याच मागणीवर अडून बसले आहेत. बराच वेळय चर्चा झाली पण शिंदे समिती आणि जरांगेंच्या बैठकीत तोडगा निघाला नाही.


मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या आणि तातडीने तशी प्रमाणपत्र द्या; अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. 'मराठा समाजाला कुणबी घोषित केल्याशिवाय मी हटणार नाही. आदेशाची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी माघारी परतणार नाही. मराठवाड्यातील एक लाख २३ हजार कुणबी गेले कुठे ?' असं जरांगे म्हणाले. 'शिंदे समितीने तेरा महिने अभ्यास केला. आता अहवाल द्यावा, आता एक मिनिटही देणार नाही, उद्या सकाळपर्यंत प्रमाणपत्र हातात द्या', असंही जरांगे म्हणाले.


जरांगेंनी ही मागणी केल्यानंतर शिंदे समितीने तातडीने एक बैठक घेण्याचा निर्णय घेतला. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिंदे समितीची बैठक झाली. ही बैठक थोड्या वेळापूर्वीच संपली पण जरांगेंना अपेक्षित निर्णय झालाच नाही. 


Comments
Add Comment

वरळीत शिउबाठाची दादागिरी; भाजपच्या कामगार संघटनेचा फलक लावण्यास विरोध

मुंबई : विधानसभा निवडणुकीत वरळीची जागा कशीबशी जिंकलेल्या शिउबाठाला अद्याप राजकीय स्थितीचे भान आलेले दिसत नाही.

पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आरे कॉलनी व दिंडोशी वन क्षेत्रातील रहिवाश्यांना घरे द्या'

मुंबई : आरेमध्ये तसेच दिंडोशी येथील वन क्षेत्रात गेली अनेक वर्ष वास्तव्य रहिवाशी हि देखील माणसे असून ते मुलभूत

फडणवीस सरकारची ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या दिशेने वाटचाल

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; महायुती सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त विशेष संवाद मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र

डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्वीकारला महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून डॉ. अविनाश ढाकणे यांनी

१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरू

गडकरी यांची लोकसभेत माहिती मुंबई : देशातील वाहनचालकांना आणि प्रवाशांना मोठी दिलासा देणारी घोषणा केंद्रीय

महावितरणमध्ये एआय तंत्रज्ञानाच्या आधारित डिजीटलायझेशन

तांत्रिक किचकट अडचणी दूर होणार मुंबई : राज्यात सौर ऊर्जेसह नवीनीकृत ऊर्जा स्त्रोतांच्या ‘डिजिटल ट्वीन’