प्रवासी गाड्यांच्या विक्रीत महाराष्ट्रच नंबर वन

प्रतिनिधी:प्रवासी गाड्यातील विक्रीत महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागला आहे. एप्रिल ते जून महिन्यात प्रवासी गाड्यांची (Passenger Vehicles PV) विक्री १० लाखांवर पोहोचली आहे. एसआयएएम (Society of Indian Automobile Manufactures SIAM) अहवालातील माहितीनुसार, एप्रिल ते जून तिमाहीत १०.१२ लाख प्रवासी गाड्या विकल्या गेल्या आहेत. पश्चिम विभागीय क्षेत्रात (Western Zone) मध्ये सर्वाधिक ३.२१ लाख गाड्यांची विक्री झाली आहे. सर्वाधिक विक्री महाराष्ट्रात झाली असून ही विक्री तब्बल १.१ ९ लाख युनिट्स गाड्यांची होती.


अहवालातील माहितीनुसार, महाराष्ट्राने प्रवासी विक्रीत प्रथम क्रमांक पटकावला असून त्यानंतर उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक, हरियाणा यांचा क्रमांक लागतो. दुचाकी गाड्यांच्या श्रेणीत देशभरात ४६.७५ लाख युनिट्सची विक्री नोंदवली आहे. सर्वाधिक विक्री प श्चिम भारतातील राज्यात नोंदवली गेली आहे जी एकूण १४.१९ लाख युनिट्सची विक्री नोंदवली. दुचाकी विक्रीत उत्तर प्रदेशाचा ८.१८ लाखांची विक्री नोंदवली गेली आहे. व्यवसायिक वाहनात महाराष्ट्रात ३२००० युनिट्सची विक्री नोंदवली गेली आहे.


माहितीनुसार देशभरात या काळात २.२३ लाख युनिट्स गाड्यांची विक्री नोंदवली गेली आहे. तिचाकीचा विक्रीत वाढ झाली असून ती या कालावधीत १.६५ लाख युनिट्स विक्रीसह वाढ नोंदवली गेली आहे. जुलै २०२५ मध्ये कंपन्यांकडून डीलर्सना एकूण प्रवासी वा हनांची पाठवणी जुलै २०२४ मध्ये ३४१५१० युनिट्सवरून किंचित कमी होऊन ३४०७७२ युनिट्सची विक्री झाली आहे.

Comments
Add Comment

Pralhad Joshi : प्रल्हाद जोशींकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा राष्ट्रपतींकडून मंजूर

नवी दिल्ली : नीट-यूजी परीक्षेतील कथित गैरप्रकारांनंतर मोठ्या प्रमाणात झालेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या

Narendra Modi : पंतप्रधान 26 जुलैला विकसित व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम मधील सहभागींशी साधणार संवाद

पंतप्रधान 26 जुलैला विकसित व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम मधील सहभागींशी साधणार संवाद नवी दिल्ली : पंतप्रधान

Prataprao Jadhav : श्री संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त ₹150 चे स्मृती नाणे व टपाल तिकीट जारी करण्याची केंद्राकडे मागणी

नवी दिल्ली : केंद्रीय आयुष मंत्रालय (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव

Heavy Rainfall Warning : राज्यात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा, कोकण, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रात सतर्कतेचे आवाहन

मुंबई : राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला असून

Nitesh Rane : दोन वेळा शेतकरी कर्जमुक्ती देणारे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या इतिहासातील एकमेव मुख्यमंत्री;मंत्री नितेश राणेंचे वक्तव्य

कणकवली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्यात प्रथमच दोन वेळा

Nitesh Rane : एआयच्या मदतीने कोकणातील शेतकरी सक्षम करणार, मत्स्यव्यावसायिकांनाही शेतकरी योजनांचा लाभ देणार

कणकवली : हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील शेती आणि शेतकरी अधिक सक्षम करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)