जरांगेंच्या आंदोलनाला तिसऱ्या दिवशीही मिळाली परवानगी!

मुंबई: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मुंबईत लाखोंचा जनसमुदाय घेऊन आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) बेमुदत उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस होता.  दिनांक २९ ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर मुंबई पोलिसांनी केवळ एक दिवसासाठी जरांगे यांना आंदोलन करण्यास परवानगी दिली होती. त्यांनंतर आज एका दिवसासाठी ही मुदत वाढवून दिली होती. जी संध्याकाळी ६ वाजता संपली आहे. त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आणखी एका दिवसाची परवानगी दिली असल्याकारणामुळे तिसऱ्या दिवशीही मुंबईत जरांगे समर्थकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळणार आहे.


मनोज जरांगे पाटील यांनी जोवर मराठा समाजाच्या मागण्या सरकार मान्य करत नाही, तोवर मुंबई सोडणार नसल्याचा एल्गार केला आहे. त्यामुळे आंदोलनाला परवानगी मिळो वा ना मिळो जरांगे जागेवरून हटणार नसल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र, या आंदोलनामुळे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेवर आणि प्रशासनावर प्रचंड ताण पडला आहे. याच पार्श्वभूमीवर या प्रकरणावर लवकरात लवकर मार्ग काढण्याचा प्रयत्न फडणवीस सरकार करत आहे. त्यामुळे आज किंवा उद्या सरकारचे काही प्रतिनिधी जरांगे पाटलांची भेट घेणार असल्याची माहितीही समोर आली आहे.



शिंदे समिती आणि जरांगेची भेटीत काय ठरले?  


कुणबी नोंदी शोधण्यासाठी निवृत्ती न्यायमूर्ती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे समितीची स्थापना करण्यात आली आहे. आज निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. यावेळी शिंदे समितीने मागण्यांची अंमलबजावणीसाठी काही वेळ मागितला. मात्र जरांगे पाटलांनी हैदराबाद आणि सातारा संस्थानचं गॅझेटिअर लागू करण्यासाठी एक मिनिटही वेळ देणार नाही असं विधान केलं आहे.


दरम्यान, शिंदे समितीने मनोज जरांगेकडे वेळ मागितला.  मात्र जरांगे यांनी कोणताही प्रकारचा वेळ देण्यास थेट नकार दिला आहे. ते म्हणाले,  शनिवार-रविवारच्या आत काही झालं नाही तर हे आंदोलन कायम राहील.



सदावर्तेकडून जरांगेना अटक करण्याची मागणी


गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे पाटलांनी अटक करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, कायद्यासमोर जरांगेला मोठं समजू नये. आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंत जरांगे ऐकला नाही तर चुकीची प्रथा पडेल. नियम मोडले जातील. यामुळे आगामी काळातील आंदोलनांमध्येही नियम मोडण्याची प्रथा पडेल. हे कायद्याचं राज्य आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काय म्हणातात यापेक्षा कायदा काय म्हणतो हे पाहून, वरिष्ठ पोलिस निरिक्षण आझाद मैदान यांनी सहा वाजल्यानंतर जरांगेला अटक करून, माननीय मॅजिस्टेट यांच्यासमोर उभे करा. कारण कायद्याची पायमल्ली महाराष्टाला परवडणारी नाहीये.

Comments
Add Comment

दादरमधील वाढत्या फटाक्यांच्या दुकानांना कुणाचे अभय? दुकानदारांसह नागरिकांचा जीव धोक्यात

मुंबई (खास प्रतिनिधी) : दीपावलीच्या सणा निमित्त केल्या जाणाऱ्या आतषबाजींकरता मुंबईतील काही प्रमुख दुकानांमध्ये

मालाड पूर्वेत भीषण आग! लाकडी गोदामात लागलेल्या आगीने घेतले रौद्ररूप: नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

मुंबई : मुंबईतील वर्दळीच्या आणि दाट लोकवस्ती असलेल्या मालाड पूर्व भागात आज दुपारी भीषण आगीची घटना घडली.

महालक्ष्मी मंदिर परिसराचे सुशोभीकरण, आयुक्तांनी दिले असे आदेश..

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील प्रमुख श्रद्धास्थानांपैकी एक असलेल्या महालक्ष्मी मंदिर परिसराचे सुशोभीकरण व

ट्रेन तिकीट बुकिंगमध्ये तांत्रिक बिघाड, पेमेंट अडकले? रिफंडसाठी ‘ही’ पद्धत अवलंबा.

दिवाळीसाठी रेल्वेने गावी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम

फटाक्यांच्या दरात २० टक्क्यांनी वाढ

मुंबई  : दिवाळीचा सण अगदीच एक-दोन दिवसांवर आला असताना यंदा देशभरातील बाजारात फटाक्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

आता पोस्ट ऑफिसमध्येही रेल्वे तिकीट मिळणार

मुंबई: दिवाळी आणि छठ पूजा यासारख्या सणांमध्ये रेल्वे तिकिटे मिळविण्यासाठी संघर्ष करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी