जरांगेंच्या आंदोलनाला तिसऱ्या दिवशीही मिळाली परवानगी!

मुंबई: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मुंबईत लाखोंचा जनसमुदाय घेऊन आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) बेमुदत उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस होता.  दिनांक २९ ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर मुंबई पोलिसांनी केवळ एक दिवसासाठी जरांगे यांना आंदोलन करण्यास परवानगी दिली होती. त्यांनंतर आज एका दिवसासाठी ही मुदत वाढवून दिली होती. जी संध्याकाळी ६ वाजता संपली आहे. त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आणखी एका दिवसाची परवानगी दिली असल्याकारणामुळे तिसऱ्या दिवशीही मुंबईत जरांगे समर्थकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळणार आहे.


मनोज जरांगे पाटील यांनी जोवर मराठा समाजाच्या मागण्या सरकार मान्य करत नाही, तोवर मुंबई सोडणार नसल्याचा एल्गार केला आहे. त्यामुळे आंदोलनाला परवानगी मिळो वा ना मिळो जरांगे जागेवरून हटणार नसल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र, या आंदोलनामुळे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेवर आणि प्रशासनावर प्रचंड ताण पडला आहे. याच पार्श्वभूमीवर या प्रकरणावर लवकरात लवकर मार्ग काढण्याचा प्रयत्न फडणवीस सरकार करत आहे. त्यामुळे आज किंवा उद्या सरकारचे काही प्रतिनिधी जरांगे पाटलांची भेट घेणार असल्याची माहितीही समोर आली आहे.



शिंदे समिती आणि जरांगेची भेटीत काय ठरले?  


कुणबी नोंदी शोधण्यासाठी निवृत्ती न्यायमूर्ती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे समितीची स्थापना करण्यात आली आहे. आज निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. यावेळी शिंदे समितीने मागण्यांची अंमलबजावणीसाठी काही वेळ मागितला. मात्र जरांगे पाटलांनी हैदराबाद आणि सातारा संस्थानचं गॅझेटिअर लागू करण्यासाठी एक मिनिटही वेळ देणार नाही असं विधान केलं आहे.


दरम्यान, शिंदे समितीने मनोज जरांगेकडे वेळ मागितला.  मात्र जरांगे यांनी कोणताही प्रकारचा वेळ देण्यास थेट नकार दिला आहे. ते म्हणाले,  शनिवार-रविवारच्या आत काही झालं नाही तर हे आंदोलन कायम राहील.



सदावर्तेकडून जरांगेना अटक करण्याची मागणी


गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे पाटलांनी अटक करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, कायद्यासमोर जरांगेला मोठं समजू नये. आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंत जरांगे ऐकला नाही तर चुकीची प्रथा पडेल. नियम मोडले जातील. यामुळे आगामी काळातील आंदोलनांमध्येही नियम मोडण्याची प्रथा पडेल. हे कायद्याचं राज्य आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काय म्हणातात यापेक्षा कायदा काय म्हणतो हे पाहून, वरिष्ठ पोलिस निरिक्षण आझाद मैदान यांनी सहा वाजल्यानंतर जरांगेला अटक करून, माननीय मॅजिस्टेट यांच्यासमोर उभे करा. कारण कायद्याची पायमल्ली महाराष्टाला परवडणारी नाहीये.

Comments
Add Comment

मेट्रो-११ मार्गिकेच्या कामाला वेग, 'जायका'कडून ५ हजार ५०० कोटींचे कर्ज

मुंबई : वडाळ्यातील आणिक आगार ते गेटवे ऑफ इंडिया या भुयारी मेट्रो ११ मार्गिकेतील आर्थिक अडचणी आता दूर होणार आहेत.

तीन कोटींपेक्षा अधिक मुद्रांक शुल्क बुडविल्याप्रकरणी मुंबईचे सह-दुय्यम निबंधक निलंबित

मुंबई : शासनाचे ३ कोटी ८२ लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) बुडवून नियमबाह्य नोंदणी केल्याप्रकरणी

आरेतील बेकायदा बांधकामांवर आता 'सॅटेलाईट' नजर; 'नेत्रम' ॲपद्वारे अतिक्रमणांचा होणार बिमोड

पालकमंत्री आशिष शेलार यांची विधान परिषदेत माहिती; दोषी अधिकाऱ्यांवरही उगारणार बडगा मुंबई : आरे दुग्ध

नोंदणी सेवेतील लायसन्स नूतनीकरणासाठी अलर्ट प्रणाली; माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांची विधान परिषदेत माहिती

मुंबई : राज्यातील नोंदणी महानिरीक्षक कार्यालयांतर्गत होणारे आधार-आधारित व्यवहार भविष्यात खंडित होऊ नयेत,

यवतमाळ आश्रमशाळा विद्यार्थिनी मृत्यू प्रकरणी कारवाई; संस्थेला'कारणे दाखवा' नोटीस; आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांची विधान परिषदेत माहिती

मुंबई : यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील जीवनदीप अनुदानित आश्रमशाळेतील एका विद्यार्थिनीच्या दुर्दैवी मृत्यू

नाशिक म्हाडाच्या २० टक्के घरकुल योजनेतील कारभाराचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

 महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा दोनशेपेक्षा अधिक विकासकांवर गुन्हे मुंबई :  नाशिक शहरात