गृहनिर्माण क्षेत्रासाठी सणासुदीचा काळ ठरतोय वरदान

चौथ्या तिमाहीत घरांच्या मागणीचा वाटा वार्षिक विक्रीत किमान ३०% असण्याची अपेक्षा 


मुंबई: गणेशोत्सवापासून दिवाळीपर्यंतचा सणासुदीचा कालावधी भारतातील गृहनिर्माण बाजारातील मागणीस नेहमीच चालना देतो आणि वार्षिक विक्रीत जवळपास एकतृतीयांश वाटा उचलतो. २०२५ ची पहिली सहामाही तुलनेने स्थिर राहिली असली, तरी सणा सुदीच्या हंगामात बाजारपेठेत नव्या उत्साहाची लाट आहे. विकासक एकापाठोपाठ महत्त्वाचे प्रकल्प लॉन्च करत असून आकर्षक ऑफर्स सादर करत आहेत, तर खरेदीदारही आपल्या निर्णयाला पुढे नेण्यासाठी उत्सुक आहेत. मध्यम व प्रीमियम सेगमेंटमधील सा तत्यपूर्ण मागणी, ग्राहकांच्या आत्मविश्वासात झालेली लक्षणीय वाढ आणि जीवनशैलीवर आधारित निवास प्रकल्पांकडे वाढलेले आकर्षण अशा सकारात्मक घटकांचा संगम हे सणासुदीचा मोसम वरदान ठरण्याचे प्रमुख कारण आहे. २०२५ च्या चौथ्या तिमाहीत के वळ मोसमी पुनरुज्जीवन होणार नाही, तर या काळात निर्माण झालेली गती २०२६ पर्यंत गृहनिर्माण क्षेत्राच्या वाढीस चालना देईल, असा विश्वास आरईए इंडियाचे (हाऊसिंग डॉटकॉम) मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण शर्मा यांनी व्यक्त केला. भारतातील गृहनिर्मा ण बाजाराने २०२५ च्या पहिल्या सहामाहीत तुलनेने मंदी अनुभवली. सलग दोन वर्षांच्या दमदार वृद्धीनंतरचा हा दुरुस्तीचा टप्पा होता. मात्र, ऐतिहासिक प्रवाह दर्शवितो की सप्टेंबर ते डिसेंबरमधील सणासुदीची तिमाही मागणीत नेहमीच सुधारणा घडवते आणि यं दाही तोच कल कायम राहील, अशी अपेक्षा आहे.


हाऊसिंग डॉटकॉम आउटलुकनुसार गेल्या पाच वर्षांच्या आकडेवारीनुसार सप्टेंबर ते डिसेंबर हा कालावधी घरांच्या विक्रीसाठी सर्वाधिक मजबूत ठरला आहे. या काळात विकासक नवीन प्रकल्प लॉन्च करून आकर्षक ऑफर्स आणि मार्केटिंग मोहिमा राबवतात, तर खरेदीदार मोठ्या खरेदीची योजना आखतात. त्यामुळेच चौथी तिमाही वार्षिक कामगिरीच्या दृष्टीने निर्णायक मानली जाते.गेल्या पाच वर्षांत (२०२०-२४) चौथ्या तिमाहीतील विक्रीने वार्षिक एकूण विक्रीत २५ ते ३० टक्के वाटा उचलला असून, ती प्रत्येक वर्षातील सर्वात दमदार तिमाही ठरली आहे. अगदी आव्हानात्मक काळातही (उदा. २०२० – कोव्हिडनंतरचा कालावधी) चौथ्या तिमाहीत तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत ३२ % वाढ नोंदली गेली असून, हीच सणासुदीच्या मोसमाची खरी ताकद मानली जाते. बहुतांश वर्षांत स णासुदीच्या मोसमातून मिळालेल्या चालनेमुळे तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत चौथ्या तिमाहीत १० ते १५ टक्के अधिक व्यवहार नोंदले जातात.


मागील पाच वर्षांच्या आकडेवारीवरून, २०२५ च्या चौथ्या तिमाहीत घरांच्या मागणीचा वाटा वार्षिक विक्रीत किमान ३०% असेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून, त्यामुळे ही तिमाही पुन्हा एकदा सर्वाधिक दमदार ठरणार आहे. २०२५ ची पहिली सहामाही सं थ राहिली असली तरी चौथ्या तिमाहीत विकासक नवीन प्रकल्प लॉन्च आणि आकर्षक योजना सादर करून बाजारपेठेला नव्या गतीची अपेक्षित चालना देतील.

Comments
Add Comment

Santacruz Chembur Link Road Phase 2 : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज खुला; वाकोला-बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज,

Radhakrishna Vikhe Patil : धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकासासाठी सर्वेक्षण करणार

मुंबई : जलसंपदा विभाग आता मत्स्य व्यवसाय विकास विभागाशी सहक

Madhuri Dixit : कोण होणार करोडपतीच्या एका सीझनसाठी माधुरी घेणार इतके मानधन...

मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि रंजक मनाला जाणारा क्विज शो म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' नेहमीच

Supriya Sule and Vinod Tawde : सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे बैठक सोडून अचानक निघाले, एका कारमधून गेले; चर्चेला उधाण

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच एक

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Bharat Gogawale : नाशिकला गिरीश महाजन आणि रायगडमध्ये भरत गोगावले करणार ध्वजारोहण

मुंबई : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या शासकीय समारंभासाठी राज्य शासनाकडून जिल्हा निहाय ध्वजारोहण