Accident : बीडमध्ये भीषण अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

बीड: बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीडजवळील नामलगाव फाटा येथील उड्डाणपुलाजवळ भरधाव कंटेनरने सहा जणांना चिरडले. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी आठच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. अपघातातील सर्व लोक पेंडगाव येथे दर्शनासाठी जात असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे, मात्र त्यांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांना चिरडले. धडक इतकी जोरदार होती की, चार जणांचा जागीच मृत्यू झाला.


या अपघातानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपूर्वी याच महामार्गावर, गढी उड्डाणपुलाजवळ अशाच प्रकारच्या अपघातात पाच ते सहा लोकांचा मृत्यू झाला होता. वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, कंटेनर चालकाला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.


Comments
Add Comment

Katrina Kaif Pregnancy : कुणी तरी येणार येणार गं! विकी-कतरिनाकडे लवकरच येणार गोड पाहुणा, बेबी बंपचा फोटो शेअर करत म्हणाले...

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांनी त्यांच्या चाहत्यांसोबत

नवरात्रोत्सव आणि महालक्ष्मी यात्रेकरिता १ ऑक्टोबरपर्यंत बेस्टतर्फे जादा बससेवा

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई शहरातील 'महालक्ष्मी यात्रा' या वर्षी २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत संपन्न होत आहे.

राज्यात बीड, सोलापूरमध्ये मुसळधार पाऊस, पुढील २४ तासांत अतिवृष्टीचा इशारा

सोलापूर/बीड: महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील अनेक

अरुण गवळी तुरुंगातून बाहेर, आता लेक योगिता गवळी राजकारणात सक्रिय!

मुंबई: अनेक वर्षांनी तुरुंगातून बाहेर आलेले माजी आमदार अरुण गवळी यांनी आता राजकारणात सक्रिय होणार नसल्याचे

मत्स्यव्यवसाय विकासासाठी बजेट वाढवा; मंत्री नितेश राणे यांच्याकडे मत्स्यशेतकऱ्यांची मागणी

मुंबई : राज्यातील मत्स्यशेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांचे सक्षमीकरण यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश

परिवहन सेवेचे पुढचे पाऊल ‘पॉड टॅक्सी’

‘लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’साठी पॉड टॅक्सी सेवा नागरिकांच्या सेवेत आणावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई :