Accident : बीडमध्ये भीषण अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

बीड: बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीडजवळील नामलगाव फाटा येथील उड्डाणपुलाजवळ भरधाव कंटेनरने सहा जणांना चिरडले. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी आठच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. अपघातातील सर्व लोक पेंडगाव येथे दर्शनासाठी जात असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे, मात्र त्यांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांना चिरडले. धडक इतकी जोरदार होती की, चार जणांचा जागीच मृत्यू झाला.


या अपघातानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपूर्वी याच महामार्गावर, गढी उड्डाणपुलाजवळ अशाच प्रकारच्या अपघातात पाच ते सहा लोकांचा मृत्यू झाला होता. वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, कंटेनर चालकाला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.


Comments
Add Comment

BMC Election : दोन दिवसांत सुमारे ७ हजार उमदेवारी अर्जांची विक्री, दोन उमेदवारांनी भरले अर्ज

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने बुधवारी २४ डिसेंबर २०२५

Eknath Shinde : एकनाथ शिंदे-गणेश नाईक यांच्यात मनोमिलन? - मंत्रालयात बंद दाराआड चर्चा

नवी मुंबई पालिकेसह ठाण्यातील जागावाटपाचा तीढा सुटणार मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाणे आणि नवी मुंबईतील

Chandrashekhar Bawankule : ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणूक फंडा - चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : "ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणुकीचा फंडा असून, जनतेला याची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी मुंबई

Devendra Fadanvis : राज्य मंत्रिमंडळाचा मोठा धडाका! नगराध्यक्षांची ताकद वाढली; आता मिळणार थेट...वाचा सविस्तर

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या

या वर्षीचा ख्रिसमस ठरतोय खास का ? जाणून घेऊया कारण

अंकांचा अनोखा योग जुळून आला आहे .तारीख बघा २५ /१२/२५ आहे ना आश्चर्यकारक डिसेंबर महिना सुरु झाला की सर्वांना आतुरता