Bihar Election : मोदींवर अपशब्दांचा वर्षाव अन् शाहांचा इशारा..."जितक्या शिव्या द्याल, तितकं कमळ बहरणार!"

बिहार : बिहारमध्ये या वर्षाअखेर होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेस यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्यांनाही चांगलाच वेग आला आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी हे मतदार हक्क यात्रा घेऊन बिहार दौऱ्यावर आहेत. त्यांच्या सभांमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, या दौऱ्यादरम्यान मोठा वाद उद्भवला. काँग्रेसच्या मंचावरून बोलताना युथ काँग्रेसच्या एका स्थानिक नेत्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या आईवरून शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली असून भाजपने यावरून काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे. “काँग्रेसला जनतेच्या प्रश्नांना उत्तर देता येत नाही म्हणून वैयक्तिक पातळीवर अशा घाणेरड्या शब्दांचा वापर केला जातो. ही मानसिकता बिहारच्या जनतेला नक्कीच मान्य होणार नाही,” अशी टीका अमित शाह यांनी केली आहे. यामुळे बिहारमधील निवडणूक रंगत अधिकच वाढली असून पुढील काही दिवसांत हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



गुवाहाटीत अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल


आसामची राजधानी गुवाहाटी येथे आयोजित सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. आपल्या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आंतरराष्ट्रीय मान्यतेचा उल्लेख करत, “आजपर्यंत २७ देशांनी नरेंद्र मोदींना सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. असा नेता ज्याचा संपूर्ण जग आदर करतो, तो भारताचा पंतप्रधान आहे,” असे सांगितले. मात्र, त्याचवेळी अमित शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर निशाणा साधला. “भारतीय राजकारणात द्वेष आणि तिरस्काराचे नकारात्मक राजकारण सुरू करण्याचे काम राहुल गांधी करत आहेत. बिहारमध्ये सुरू असलेल्या काँग्रेसच्या ‘घुसखोर बचाओ यात्रेतून’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिवंगत मातेसाठी अपशब्द वापरण्यात आले. हे काँग्रेस नेत्यांचे सर्वात घृणास्पद कृत्य आहे,” असे शाह म्हणाले. शाह यांनी यावेळी स्पष्ट इशारा दिला की, बिहारच्या जनतेसमोर काँग्रेसची खरी मानसिकता उघड होत आहे. “जनतेला या प्रकारचे निकृष्ट आणि वैयक्तिक टीकेवर आधारित राजकारण कधीच मान्य होणार नाही. लोक फक्त विकासाच्या आणि सुरक्षेच्या राजकारणावर विश्वास ठेवतात,” असेही ते म्हणाले. या वक्तव्यामुळे बिहार निवडणुकीतील राजकीय वातावरण आणखी तापले असून भाजप आणि काँग्रेस यांच्यातील संघर्ष चुरशीचा झाला आहे.





“द्वेषाचे राजकारण देशाला खालच्या पातळीवर नेईल”


शाह म्हणाले, “राहुल गांधी यांनी आपल्या भाषणांमधून द्वेषाचे राजकारण सुरू केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत मातेबद्दल वापरलेले अपशब्द हा केवळ राजकीय अपमान नाही तर भारतीय संस्कृतीचा ही अवमान आहे.” शाह यांनी यावेळी या वक्तव्याचा तीव्र निषेध करत सांगितले की, “मी संपूर्ण देशातील जनतेला सांगू इच्छितो, की राहुल गांधी यांनी सुरू केलेले हे निरर्थक, नकारात्मक आणि द्वेषपूर्ण राजकारण सार्वजनिक जीवन उंचावणार नाही. उलटपक्षी ते समाजात फूट आणि राजकारणात घसरण घडवून आणेल.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, काँग्रेस नेत्यांनी देशाच्या प्रगतीपेक्षा वैयक्तिक टीका आणि द्वेष याला प्राधान्य दिले आहे. “भारतीय जनता अशा प्रकारच्या राजकारणाला कधीही मान्यता देणार नाही. देश विकासाच्या मार्गावर चालतो आहे आणि जनतेला हवे तेच म्हणजे प्रगती आणि स्थैर्य, न की द्वेष आणि तिरस्कार,” असेही शाह म्हणाले.



“काँग्रेस नेत्यांच्या अपशब्दांमुळे भाजपचं कमळ अधिक बहरणार”


काँग्रेसचे नेते गेल्या अनेक वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अपशब्दांचा वर्षाव करत आहेत. “हे द्वेषाचे राजकारण आजचे नाही. मोदीजी सत्तेत आल्यानंतर सोनिया गांधी, राहुल गांधी, दिग्विजय सिंह, मणिशंकर अय्यर, जयराम रमेश, रेणुका चौधरी जवळपास प्रत्येक काँग्रेस नेत्याने त्यांच्यावर आक्षेपार्ह भाष्य केले आहे,” असे शाह म्हणाले. त्यांनी पुढे उदाहरणे देत सांगितले की, काहींनी मोदींना ‘मृत्यूचा व्यापारी’ म्हटलं, काहींनी ‘विषारी साप’ तर काहींनी ‘नीच’, ‘रावण’, ‘भस्मासुर’ आणि ‘विषाणू’ अशी शब्दावली वापरली. “काँग्रेस नेत्यांना खरंच असं वाटतं का की, अशा अपमानास्पद भाषेमुळे तुम्हाला जनादेश मिळेल?” असा सवाल शाह यांनी उपस्थित केला. शाह म्हणाले की, “मी आज काँग्रेसला सांगू इच्छितो – भाजपला जितक्या शिव्या द्याल, तितकंच कमळ अधिक जोमाने उमलून आकाशाला भिडेल. कारण जनतेला विकास, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रहित हवं आहे, शिवीगाळ आणि नकारात्मक राजकारण नव्हे,” असा ठाम इशाराही त्यांनी यावेळी दिला.


Comments
Add Comment

EPFO 3.0: PF क्लेम आता 3 दिवसांत पूर्ण होणार, कसं ते जाणून घेऊया...

नवी दिल्ली: देशातील लाखो नोकरदारांसाठी श्रम मंत्रालयाने 'EPFO 3.0' ही अत्यंत महत्त्वाची आणि फायदेशीर योजना सुरू केली

IDFC FIRST Bank: बँकिंग क्षेत्रात ५९० कोटींचा घोटाळा; माजी मॅनेजरने बायकोच्या जोडीने मारला बँकेच्या तिजोरीवर डल्ला

मुंबई: बँकिंग क्षेत्रात सध्या एका मोठ्या घोटाळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या चंदीगड

PM Modi Israel Visit : पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या इस्रायल दौऱ्यासाठी रवाना; इस्रायली संसदेला संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजेच बुधवार २५ फेब्रुवारी रोजी सकाळी दोन दिवसांच्या इस्रायल

सरकारची पोर्नोग्राफिक कंटेंटविरुद्ध मोठी कारवाई, 'या' ५ ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी

मुंबई: ओटीटी क्षेत्रात पोर्नोग्राफीच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले

Vidarbha Railway: गोंदिया ते जबलपूर रेल्वे प्रकल्पाला केंद्र सरकारची मंजुरी

मुंबई: गोंदिया ते जबलपूर रेल्वे प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार असून या मार्गाच्या दुहेरीकरणाला अखेर केंद्र

गोंदिया-जबलपूर मार्ग दुहेरीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी

महाराष्ट्रासह चार राज्यात मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्प नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली