जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधूचा प्रवास उपांत्यपूर्व फेरीतच थांबला

पॅरिस : भारताची स्टार बॅडमिंटनपटू आणि दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेती पी. व्ही. सिंधूचे जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२५ मधील पदकाचे स्वप्न भंगले. शुक्रवारी (२९ ऑगस्ट) झालेल्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सिंधूला इंडोनेशियाच्या कुसुमा वारदानीकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवासह सिंधूने स्पर्धेतून बाहेर पडली, ज्यामुळे तिचे ऐतिहासिक सहावे जागतिक पदक जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.


या सामन्यात कुसुमा वारदानीने सिंधूचा २१-१४, १३-२१, २१-१६ अशा फरकाने पराभव केला. हा सामना १ तास ८ मिनिटे चालला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच कुसुमाने आक्रमक खेळ दाखवत पहिला गेम २१-१४ अशा फरकाने जिंकला.


दुसऱ्या गेममध्ये सिंधूने जोरदार पुनरागमन केले. तिने आपल्या आक्रमक खेळाने कुसुमाला बॅकफूटवर ढकलले. दमदार स्मॅश आणि नेटजवळच्या अचूक फटक्यांचा वापर करत तिने हा गेम २१-१३ असा सहज जिंकून सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली.


निर्णायक तिसऱ्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये चुरशीची लढत झाली. दोन्ही खेळाडूंनी प्रत्येक गुणासाठी संघर्ष केला. मात्र, कुसुमाने अखेरच्या क्षणी बाजी मारली. तिने सिंधूला मागे टाकत हा गेम २१-१६ असा जिंकला आणि उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले.


या पराभवामुळे सिंधूचे सहावे जागतिक पदक जिंकून इतिहास रचण्याचे स्वप्न तुटले. सिंधूने यापूर्वी २०१९ मध्ये सुवर्णपदक, २०१७ आणि २०१८ मध्ये रौप्यपदके, तर २०१३ आणि २०१४ मध्ये कांस्यपदके जिंकली आहेत. या स्पर्धेतील सिंधूची कामगिरी आत्मविश्वास वाढवणारी होती, विशेषतः तिने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या वांग झी यीला उपांत्यपूर्व फेरीत हरवले होते.


सध्या, पुरुष दुहेरीमधील सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही भारताची एकमेव जोडी स्पर्धेत कायम आहे. त्यांचे पदक जिंकण्याची आशा अजूनही जिवंत आहे.

Comments
Add Comment

क्रिकेटच्या 'थाला'ला हाऊसिंग बोर्डाची नोटीस; केवळ १५ दिवसांची मुदत

क्रिकेटचा थाला अशी ओळख असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला झारखंड राज्य गृहनिर्माण

वेस्ट इंडिज-भारताच्या सामन्याचा पावसावर ठरणार निकाल

रन रेटवर ठरणार उपांत्य फेरीचा दावेदार नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर ८ फेरीचे सामने अंतिम टप्प्यात असून

अर्शदीपने मोडला बोल्टचा विक्रम

बुमराहलाही टाकले मागे नवी दिल्ली : भारतीय संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने टी-२० विश्वचषकात आपल्या

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात फटकेबाजी करत इंग्लंडने मारली बाजी

कोलंबो : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतीली इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना

IPL 2026 : आयपीएल कधी सुरू होणार ? हाती आली महत्त्वाची माहिती

मुंबई : मिनी ऑक्शन झाला त्यावेळी आयपीएल २०२६ ही स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून सुरू होईल असे सूतोवाच बीसीसीआयने केले

मुंबईत कबड्डी स्पर्धांसाठी मैदाने होणार अल्प दरात उपलब्ध

महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ असून कबड्डीची पंढरी म्हणून