उत्तराखंडमध्ये ढगफुटी आणि मुसळधार पावसाचा कहर

डेहराडून : उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा पावसाने रौद्र रूप धारण केले आहे. टिहरी जिल्ह्यातील गेंवाली भिलंगना येथे गुरुवारी रात्री ढगफुटीची घटना घडली आहे. प्राप्त माहितीनुसार, सध्या कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे नुकसान झाले ता आहे.


राजस्व विभागाचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. तसेच आरोग्य, वीज, जल संस्था, जल निगम, सार्वजनिक बांधकाम विभाग, वेपकोस व पशुवैद्यकीय पथकेही मदतीसाठी पाठवण्यात आली आहेत. मुसळधार पावसामुळे कालेश्वर येथे डोंगरावरून आलेला मलबा थेट घरांमध्ये घुसला आहे. सध्या जेसीबीच्या साहाय्याने मलबा हटवण्याचे काम सुरू आहे. पोलिस यंत्रणाही घटनास्थळी उपस्थित आहे. दरम्यान, चमोली जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग अनेक ठिकाणी बंद झाला आहे. हे मार्ग पुन्हा सुरू करण्यासाठी संबंधित पथके घटनास्थळी काम करत आहेत.


रुद्रप्रयाग जिल्ह्यात अलकनंदा आणि मंदाकिनी नद्यांच्या संगमावर पाण्याची पातळी सातत्यानं वाढत आहे. अलकनंदा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. नदीचं पाणी आता घरांपर्यंत पोहोचले आहे, ज्यामुळे प्रशासनाने काही घरं तात्काळ रिकामी केली आहेत. परिस्थिती इतकी गंभीर आहे की रुद्रप्रयागमधील प्रसिद्ध हनुमान मंदिरदेखील पाण्यात बुडाले आहे. तसेच केदारघाटीतील लवारा गावाजवळील मोटर पुल जोरदार प्रवाहात वाहून गेला आहे. छेनागाड भागातही परिस्थिती गंभीरच आहे.


उत्तराखंडमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगराळ जिल्ह्यांमध्ये भूस्खलन आणि पाणी साचण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. चमोली जिल्ह्यात भारत-चीन सीमेला जोडणारा मलारी राष्ट्रीय महामार्ग लाता गावाजवळ डोंगर कोसळल्यामुळे बंद झाला आहे. यामुळे डझनभर गावांचा संपर्क तहसील मुख्यालयाशी तुटला आहे. सद्यस्थितीत रस्ता पुन्हा सुरू करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान हवामान खात्याने देहरादून, बागेश्वर, नैनीताल आणि पिथौरागड येथे जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. इतर भागांसाठी येलो अलर्ट देण्यात आले आहे. पुढील 2 दिवस राज्यभरात वेगवेगळ्या भागांत मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे संपूर्ण उत्तराखंडला येलो अलर्टवर ठेवण्यात आले आहे.


Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात