उत्तराखंडमध्ये ढगफुटी आणि मुसळधार पावसाचा कहर

डेहराडून : उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा पावसाने रौद्र रूप धारण केले आहे. टिहरी जिल्ह्यातील गेंवाली भिलंगना येथे गुरुवारी रात्री ढगफुटीची घटना घडली आहे. प्राप्त माहितीनुसार, सध्या कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे नुकसान झाले ता आहे.


राजस्व विभागाचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. तसेच आरोग्य, वीज, जल संस्था, जल निगम, सार्वजनिक बांधकाम विभाग, वेपकोस व पशुवैद्यकीय पथकेही मदतीसाठी पाठवण्यात आली आहेत. मुसळधार पावसामुळे कालेश्वर येथे डोंगरावरून आलेला मलबा थेट घरांमध्ये घुसला आहे. सध्या जेसीबीच्या साहाय्याने मलबा हटवण्याचे काम सुरू आहे. पोलिस यंत्रणाही घटनास्थळी उपस्थित आहे. दरम्यान, चमोली जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग अनेक ठिकाणी बंद झाला आहे. हे मार्ग पुन्हा सुरू करण्यासाठी संबंधित पथके घटनास्थळी काम करत आहेत.


रुद्रप्रयाग जिल्ह्यात अलकनंदा आणि मंदाकिनी नद्यांच्या संगमावर पाण्याची पातळी सातत्यानं वाढत आहे. अलकनंदा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. नदीचं पाणी आता घरांपर्यंत पोहोचले आहे, ज्यामुळे प्रशासनाने काही घरं तात्काळ रिकामी केली आहेत. परिस्थिती इतकी गंभीर आहे की रुद्रप्रयागमधील प्रसिद्ध हनुमान मंदिरदेखील पाण्यात बुडाले आहे. तसेच केदारघाटीतील लवारा गावाजवळील मोटर पुल जोरदार प्रवाहात वाहून गेला आहे. छेनागाड भागातही परिस्थिती गंभीरच आहे.


उत्तराखंडमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगराळ जिल्ह्यांमध्ये भूस्खलन आणि पाणी साचण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. चमोली जिल्ह्यात भारत-चीन सीमेला जोडणारा मलारी राष्ट्रीय महामार्ग लाता गावाजवळ डोंगर कोसळल्यामुळे बंद झाला आहे. यामुळे डझनभर गावांचा संपर्क तहसील मुख्यालयाशी तुटला आहे. सद्यस्थितीत रस्ता पुन्हा सुरू करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान हवामान खात्याने देहरादून, बागेश्वर, नैनीताल आणि पिथौरागड येथे जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. इतर भागांसाठी येलो अलर्ट देण्यात आले आहे. पुढील 2 दिवस राज्यभरात वेगवेगळ्या भागांत मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे संपूर्ण उत्तराखंडला येलो अलर्टवर ठेवण्यात आले आहे.


Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला