उत्तराखंडमध्ये ढगफुटी आणि मुसळधार पावसाचा कहर

डेहराडून : उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा पावसाने रौद्र रूप धारण केले आहे. टिहरी जिल्ह्यातील गेंवाली भिलंगना येथे गुरुवारी रात्री ढगफुटीची घटना घडली आहे. प्राप्त माहितीनुसार, सध्या कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे नुकसान झाले ता आहे.


राजस्व विभागाचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. तसेच आरोग्य, वीज, जल संस्था, जल निगम, सार्वजनिक बांधकाम विभाग, वेपकोस व पशुवैद्यकीय पथकेही मदतीसाठी पाठवण्यात आली आहेत. मुसळधार पावसामुळे कालेश्वर येथे डोंगरावरून आलेला मलबा थेट घरांमध्ये घुसला आहे. सध्या जेसीबीच्या साहाय्याने मलबा हटवण्याचे काम सुरू आहे. पोलिस यंत्रणाही घटनास्थळी उपस्थित आहे. दरम्यान, चमोली जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग अनेक ठिकाणी बंद झाला आहे. हे मार्ग पुन्हा सुरू करण्यासाठी संबंधित पथके घटनास्थळी काम करत आहेत.


रुद्रप्रयाग जिल्ह्यात अलकनंदा आणि मंदाकिनी नद्यांच्या संगमावर पाण्याची पातळी सातत्यानं वाढत आहे. अलकनंदा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. नदीचं पाणी आता घरांपर्यंत पोहोचले आहे, ज्यामुळे प्रशासनाने काही घरं तात्काळ रिकामी केली आहेत. परिस्थिती इतकी गंभीर आहे की रुद्रप्रयागमधील प्रसिद्ध हनुमान मंदिरदेखील पाण्यात बुडाले आहे. तसेच केदारघाटीतील लवारा गावाजवळील मोटर पुल जोरदार प्रवाहात वाहून गेला आहे. छेनागाड भागातही परिस्थिती गंभीरच आहे.


उत्तराखंडमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगराळ जिल्ह्यांमध्ये भूस्खलन आणि पाणी साचण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. चमोली जिल्ह्यात भारत-चीन सीमेला जोडणारा मलारी राष्ट्रीय महामार्ग लाता गावाजवळ डोंगर कोसळल्यामुळे बंद झाला आहे. यामुळे डझनभर गावांचा संपर्क तहसील मुख्यालयाशी तुटला आहे. सद्यस्थितीत रस्ता पुन्हा सुरू करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान हवामान खात्याने देहरादून, बागेश्वर, नैनीताल आणि पिथौरागड येथे जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. इतर भागांसाठी येलो अलर्ट देण्यात आले आहे. पुढील 2 दिवस राज्यभरात वेगवेगळ्या भागांत मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे संपूर्ण उत्तराखंडला येलो अलर्टवर ठेवण्यात आले आहे.


Comments
Add Comment

पूनम पांडे होणार मंदोदरी, दिल्लीत रामलीला सुरू होण्याआधी भडकलं महाभारत

नवी दिल्ली : देशात ठिकठिकाणी रामलीला कार्यक्रम सोमवार २२ सप्टेंबरच्या संध्याकाळपासून सुरू होत आहे. पण हा

जीएसटी दर कपातीत सुमारे ३७५ वस्तू होणार स्वस्त

मुंबई : जीएसटी दर कपातीनंतर आता स्वयंपाकघरातील वस्तूंसोबत इलेक्ट्रॉनिक्स, औषधे, उपकरणे आणि वाहनांपर्यंत सुमारे

'घटस्थापनेच्या दिवसापासून सुरू होणार GST उत्सव'

नवी दिल्ली : घटस्थापनेच्या दिवसापासून अर्थात सोमवार २२ सप्टेंबर २०२५ पासून देशात GST उत्सव सुरू होत आहे. यामुळे

घटस्थापनेच्या दिवशी पंतप्रधान मोदी अरुणाचल प्रदेशचा दौरा करणार

नवी दिल्ली : घटस्थापनेच्या दिवशी अर्थात सोमवारी २२ सप्टेंबर २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अरुणाचल प्रदेश

PM Modi Address to Nation: पंतप्रधान मोदी आज करणार महत्वपूर्ण घोषणा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ५.०० वाजता देशाला संबोधित करणार आहेत. यात ते अनेक महत्वपूर्ण

अमूलने ७०० हून अधिक उत्पादनांचे दर कमी केले, २२ सप्टेंबरपासून नवीन किंमती लागू

नवी दिल्ली: अमूल (Amul) या लोकप्रिय ब्रँडची मार्केटिंग करणारी कंपनी गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF)