'राज को राज रहने दो' असं का म्हणाले एकनाथ शिंदे ?


मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या घरी जऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. या निमित्ताने एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात काही वेळ बातचीत झाली. राज ठाकरेंशी चर्चा केल्यानंतर एकनाथ शिंदे पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले. याप्रसंगी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना 'राज को राज रहने दो' असे सूचक उत्तर देत एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंशी झालेल्या चर्चेची माहिती देणे टाळले. यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.





राज ठाकरेंच्या घरी गणपती दर्शनाला यंदा पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आले होते. यानंतर पुन्हा एकदा ठाकरे बंधू महापालिका निवडणुकांसाठी युती करणार असल्याची चर्चा जोर धरू लागली. या पार्श्वभूमीवर आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंच्या घरी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. दोन्ही नेत्यांनी राज ठाकरेंशी बातचीत केली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.





काही दिवसांपूर्वी बेस्ट पतपेढीची निवडणूक झाली. या निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती असूनही त्यांचा दारुण पराभव झाला. अनेक वर्षे बेस्ट पतपेढीची सत्ता राखणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या समर्थकांचा पराभव झाला. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंच्या घरी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. दोन्ही नेत्यांनी राज ठाकरेंशी चर्चा केली.


Comments
Add Comment

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत