गडचिरोली जिल्ह्यात चकमक, एवढे जहाल नक्षलवादी ठार


गडचिरोली : महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात सुरक्षा पथक आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत चार जहाल नक्षलवादी ठार झाले. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये एक पुरुष आणि तीन महिला नक्षलवादी आहे. घटनास्थळावरुन सुरक्षा पथकाने एक एसएलआर रायफल, दोन इन्सास रायफल आणि एक .३०३ रायफल असा मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. चकमक अद्याप सुरू आहे.





गडचिरोलीनारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात गडचिरोली विभागाचे गट्टा दलम, कंपनी क्रमांक दहा आणि इतर माओवादी नक्षलवादी लपले असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेने सुरक्षा पथकास दिली. यानंतर अपर पोलीस अधीक्षक अभियान एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली सी - ६० ची १९ पथके आणि सीआरपीएफ जलद कृती दलाची (CRPF QAT) दोन पथके जंगल परिसरात रवाना झाली. मुसळधार पावसामुळे सुरक्षा पथकाला नक्षलवादी लपून बसलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी दोन दिवस लागले. पण सर्व अडचणींवर मात करत सुरक्षा पथकाने जंगलात शोध मोहीम हाती घेतली. सुरक्षा पथकाचे जवान बघून नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला आणि चकमक झाली. या चकमकीत चार जहाल नक्षलवादी ठार झाले. चकमक अद्याप सुरू आहे. जंगलात लपलेल्या इतर नक्षलवाद्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


Comments
Add Comment

Ganpati Special Trains : चाकरमान्यांचे हाल! ऐन गणपती उत्सवात कोकण-उत्तर महाराष्ट्रातील 3 महत्त्वाच्या गाड्या रद्द

मुंबई : मध्य रेल्वेने मार्गक्षमता, वेळापत्रक आणि परिचालनाचा ताळमेळ साधत दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया या विशेष

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाचा

Pune Weather : पुण्यात रविवारी पावसाच्या सरींची शक्यता; घाटमाथ्यावर यलो अलर्ट

पुणे : रविवार, 16 ऑगस्ट रोजी पुणे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता

Chhagan Bhujbal : जातनिहाय जनगणनेची अधिसूचना जारी करणे हा सामाजिक न्यायाच्या दिशेने ऐतिहासिक निर्णय – मंत्री छगन भुजबळ

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आभार पत्र मुंबई : केंद्र सरकारने जनगणना

Eknath Shinde : स्वातंत्र्यदिनी राज्यातील १२४ आरोग्य संस्थांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

जनतेच्या दारात दर्जेदार उपचार पोहोचवण्याचा निर्धार मुंबई : “हे सरकार फक्त आदेश देणारे नाही, तर जनतेच्या दारात

Wardha Accident : ट्रॅव्हल्स बसमुळे चिरडून वर्ध्यात तीन मुलींचा जागीच मृत्यू

वर्धा : देशभर स्वातंत्रदिनाचा उत्साह असताना वर्ध्याच्या हिंगणघाट शहरातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मेडिकल