मुंबईकरांना दिलासा: गणेशोत्सवात 'एलिफस्टन पूल' सुरू राहणार; अनंत चतुर्दशीनंतर होणार पाडकाम

मुंबई: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. प्रभादेवी येथील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला एलिफस्टन पूल (Elphinstone Bridge) गणेशोत्सवापर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, १० सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीनंतर हा पूल पाडण्यात येणार आहे.


गणेशोत्सवानंतर सुरू होणार पाडकाम
प्रभादेवी परिसरात गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढते. भाविकांची ये-जा लक्षात घेता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पूल सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १० सप्टेंबरनंतर हा पूल वाहतुकीसाठी बंद करून त्याचे पाडकाम सुरू होईल. हा पूल १२५ वर्षे जुना आणि ब्रिटिशकालीन असून, धोकादायक झाल्यामुळे त्याची पुनर्बांधणी केली जाणार आहे. या ठिकाणी डबलडेकर पूल आणि शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टरची रचना उभी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.


स्थानिकांकडून विरोधाची शक्यता
या पुलाच्या पाडकामामुळे काही इमारतीदेखील जमीनदोस्त होण्याची शक्यता आहे. यामुळे स्थानिक रहिवासी आणि दुकानदारांनी या निर्णयाला विरोध केला आहे. इमारतीतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही, त्यामुळे या पाडकामाचा विरोधाला तोंड द्यावे लागू शकते.


महत्त्वाचा दुवा
एलिफस्टन पूल हा मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. हा पूल परळ आणि प्रभादेवीला पूर्व-पश्चिम दिशेने जोडतो. या पुलाचा वापर परळहून दादर, लोअर परळ, तसेच प्रभादेवीहून लालबाग, शिवडी, परळकडे जाणाऱ्या वाहनांसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो.

Comments
Add Comment

Women's Day : जागतिक महिला दिनानिमित्त राज्यात ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीमेचा शुभारंभ

- आरोग्य क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान मुंबई : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक आरोग्य

मध्य रेल्वेवर रविवारी 'मेगाब्लॉक'

मुंबई (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी

पश्चिम रेल्वेच्या ४ विशेष सुपरफास्ट गाड्या!

मुंबई (प्रतिनिधी) : प्रवाशांची वाढती गर्दी आणि प्रवासाची मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने वांद्रे, अहमदाबाद,

टाटा हॉस्पिटलचा कॅन्सरविरुद्ध डिजिटल लढा

मुंबई (प्रतिनिधी) : कर्करोगाच्या वाढत्या रुग्णसंख्येचे प्रमाण पाहता, भारतातील कोट्यवधी लोकांची तपासणी करणे

मुंबईत पाण्याची समस्या, नगरसेवकांनी सुरु झाली रडारड

स्थायी समितीत विशेष सभेचे आयोजन करण्याचे अध्यक्षांचे आश्वासन मुंबई : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व

सिध्दार्थ रुग्णालयाच्या इमारतीचा पुनर्विकास संथगतीने, महापौरांनी व्यक्त केली नाराजी

मुंबई :  गोरेगाव (पश्चिम) येथील सिद्धार्थ रुग्णालयाच्या पुनर्विकास प्रकल्पाची महापौर रितू तावडे यांनी अचानक