मुंबईकरांना दिलासा: गणेशोत्सवात 'एलिफस्टन पूल' सुरू राहणार; अनंत चतुर्दशीनंतर होणार पाडकाम

मुंबई: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. प्रभादेवी येथील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला एलिफस्टन पूल (Elphinstone Bridge) गणेशोत्सवापर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, १० सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीनंतर हा पूल पाडण्यात येणार आहे.


गणेशोत्सवानंतर सुरू होणार पाडकाम
प्रभादेवी परिसरात गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढते. भाविकांची ये-जा लक्षात घेता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पूल सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १० सप्टेंबरनंतर हा पूल वाहतुकीसाठी बंद करून त्याचे पाडकाम सुरू होईल. हा पूल १२५ वर्षे जुना आणि ब्रिटिशकालीन असून, धोकादायक झाल्यामुळे त्याची पुनर्बांधणी केली जाणार आहे. या ठिकाणी डबलडेकर पूल आणि शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टरची रचना उभी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.


स्थानिकांकडून विरोधाची शक्यता
या पुलाच्या पाडकामामुळे काही इमारतीदेखील जमीनदोस्त होण्याची शक्यता आहे. यामुळे स्थानिक रहिवासी आणि दुकानदारांनी या निर्णयाला विरोध केला आहे. इमारतीतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही, त्यामुळे या पाडकामाचा विरोधाला तोंड द्यावे लागू शकते.


महत्त्वाचा दुवा
एलिफस्टन पूल हा मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. हा पूल परळ आणि प्रभादेवीला पूर्व-पश्चिम दिशेने जोडतो. या पुलाचा वापर परळहून दादर, लोअर परळ, तसेच प्रभादेवीहून लालबाग, शिवडी, परळकडे जाणाऱ्या वाहनांसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो.

Comments
Add Comment

राज्यात आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई  : राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले असून, राज्यातील ८ वरिष्ठ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंका

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तीपत्र मुंबई  : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

महाराष्ट्रात १ एप्रिलपासून वीजदरात कपात

मुंबई : राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून, येत्या १ एप्रिलपासून वीजदरात कपात लागू होणार आहे.

राष्ट्रीय महामार्गांतील प्रकल्पग्रस्तांसाठी ऐतिहासिक निर्णय

राज्यातील २८ हजार प्रलंबित दावे जलद मार्गी लावण्यासाठी ५७ लवादांची नियुक्ती फडणवीस सरकारचा शेतकरी हिताचा

मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या, मध्य, आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक; वेळ पाहूनच बाहेर पडा

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर

राज्यात ‘वन स्टेट, वन पोर्टल’ संकल्पनेला गती; महा सारथी पोर्टलचे मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : राज्यात डिजिटल गव्हर्नन्स अधिक सक्षम व नागरिककेंद्रित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘वन स्टेट, वन