९१ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच लालबागच्या राजा येथे होणार लाईव्ह कॉन्सर्ट! राहुल वैद्य ठरला पहिला गायक

मुंबई:आजपासून गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2025) ला सुरुवात झाली असून, हा उत्सव भक्तिपूर्वक वातावरणात आणि तितक्याच उत्साहाने साजरा करण्यासाठी गणेशभक्तांची देखील पूर्णपणे तयारी झाली आहे. दरम्यान मुंबईच्या प्रतिष्ठित गणपती मंडळांपैकी एक असलेल्या लालबागचा राजा येथे गणेश चतुर्थीच्या निमित्ताने खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, यापूर्वी कधीच झाले नव्हते असे अद्भुत लाईव्ह कॉन्सर्ट लालबागच्या राजाला होणार आहे. विशेष म्हणजे, ९१ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे होणार असून, याचा पहिला मान प्रसिद्ध मराठी आणि हिंदी पार्श्वगायक राहुल वैद्य याला मिळाला आहे.


लालबागचा राजा सार्वजनिक मंडळ हे गणेशोत्सव काळातील सर्वात गर्दीचे ठिकाण असते. हा गणपती नवसाला पावतो अशी अनेकांची धारणा आहे, आणि यामुळेच देशभरातून हजारो भाविक लालबागच्या राजाला दर्शनाला येतात. मात्र यावर्षी राजाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी गणेश चतुर्थीला मंडळ प्रशासनाने गणेश भक्तिपर सुमधुर गाण्याचे लाईव्ह कॉन्सर्ट ठेवले आहे. ज्यात गाण्याचा पहिला मान गायक राहुल वैद्य याला मिळाला आहे.


राहुलने त्याच्या इंस्टाग्रामवर या संदर्भात एक पोस्टर शेअर करत माहिती दिली, ज्यात त्याने  लिहिले, "९१ वर्षांच्या इतिहासात मुंबईतील अत्यंत प्रतिष्ठित लालबागचा राजा येथे सादरीकरण करणारा पहिला कलाकार होण्यापासून मला खूप आनंद झाला! २७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ वाजता जिओहॉटस्टारवर लाईव्ह पहा."


राहुलने आपल्याला मिळालेल्या या संधीचे सोने करण्यासाठी पूर्णपणे तयारी केली असल्याचे सांगितले. एएनआयशी बोलताना तो म्हणाला "जेव्हाही मला सादरीकरणाची संधी मिळते आणि जेव्हाही माझा संगीत कार्यक्रम असतो तेव्हा मी खूप उत्साही असतो. मात्र यावेळी, काही तरी वेगळेच वाटते आहे, कारण मी ज्या ठिकाणी सादरीकरण करणार आहे त्या ठिकाणामुळे माझा उत्साह आणखीच वाढला आहे. लालबागचा राजा हे सर्वात मंगलदायी आणि आशीर्वादित असा रंगमंच आहे जो कोणीही अनुभवू शकतो."

Comments
Add Comment

तेल आयात सोडा, ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून भारताचा रशियाबरोबर विमान निर्मितीचा ऐतिहासिक करार

देशात तयार होणार सुखोई सुपरजेट नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि भारतामधील व्यापारी संबंध ताणले

चक्रीवादळ 'मोंथा'मुळे देशभरातील हवामान बदलणार

पुढील पाच दिवसांत काही राज्यांना पावसाचा इशारा! मुंबई : बंगालच्या खाडीत उफाळलेलं मोंथा चक्रीवादळ, अरबी

कबुतर खान्यांसाठी जैन समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली मुंबई महापालिका आयुक्तांची भेट, केली ही मागणी...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतरखान्यांसाठी जनतेला तथा नागरिकांना त्रास होणार नाही, अशा पर्यायी जागांचा

उद्धव ठाकरे हे स्वतःच 'अजगर'- बावनकुळेंचा जोरदार हल्ला, 'आयत्या बिळावर नागोबा' म्हणत शेलारांची टीका

मुंबई : सध्या महाराष्ट्रातील राजकारण अ‍ॅनाकोंडा, अजगर या शब्दांच्या टीकेवरून चांगलेच तापले आहे. उद्धव ठाकरेंनी

पाकिस्तान-अफगाणिस्तानात तणाव असतानाच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू घेणार राफेलमधून झेप!

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या, म्हणजेच २९ ऑक्टोबर २०२५ रोजी, हरियाणातील अंबाला हवाई दल

महाराष्ट्रात सागरी क्षेत्रात गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : राज्याने जहाज बांधणी, दुरुस्ती, पुनर्वापर आणि तोडणीविषयी स्वतंत्र धोरण तयार केले आहे. सागरी क्षेत्रातील