९१ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच लालबागच्या राजा येथे होणार लाईव्ह कॉन्सर्ट! राहुल वैद्य ठरला पहिला गायक

मुंबई:आजपासून गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2025) ला सुरुवात झाली असून, हा उत्सव भक्तिपूर्वक वातावरणात आणि तितक्याच उत्साहाने साजरा करण्यासाठी गणेशभक्तांची देखील पूर्णपणे तयारी झाली आहे. दरम्यान मुंबईच्या प्रतिष्ठित गणपती मंडळांपैकी एक असलेल्या लालबागचा राजा येथे गणेश चतुर्थीच्या निमित्ताने खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, यापूर्वी कधीच झाले नव्हते असे अद्भुत लाईव्ह कॉन्सर्ट लालबागच्या राजाला होणार आहे. विशेष म्हणजे, ९१ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे होणार असून, याचा पहिला मान प्रसिद्ध मराठी आणि हिंदी पार्श्वगायक राहुल वैद्य याला मिळाला आहे.


लालबागचा राजा सार्वजनिक मंडळ हे गणेशोत्सव काळातील सर्वात गर्दीचे ठिकाण असते. हा गणपती नवसाला पावतो अशी अनेकांची धारणा आहे, आणि यामुळेच देशभरातून हजारो भाविक लालबागच्या राजाला दर्शनाला येतात. मात्र यावर्षी राजाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी गणेश चतुर्थीला मंडळ प्रशासनाने गणेश भक्तिपर सुमधुर गाण्याचे लाईव्ह कॉन्सर्ट ठेवले आहे. ज्यात गाण्याचा पहिला मान गायक राहुल वैद्य याला मिळाला आहे.


राहुलने त्याच्या इंस्टाग्रामवर या संदर्भात एक पोस्टर शेअर करत माहिती दिली, ज्यात त्याने  लिहिले, "९१ वर्षांच्या इतिहासात मुंबईतील अत्यंत प्रतिष्ठित लालबागचा राजा येथे सादरीकरण करणारा पहिला कलाकार होण्यापासून मला खूप आनंद झाला! २७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ वाजता जिओहॉटस्टारवर लाईव्ह पहा."


राहुलने आपल्याला मिळालेल्या या संधीचे सोने करण्यासाठी पूर्णपणे तयारी केली असल्याचे सांगितले. एएनआयशी बोलताना तो म्हणाला "जेव्हाही मला सादरीकरणाची संधी मिळते आणि जेव्हाही माझा संगीत कार्यक्रम असतो तेव्हा मी खूप उत्साही असतो. मात्र यावेळी, काही तरी वेगळेच वाटते आहे, कारण मी ज्या ठिकाणी सादरीकरण करणार आहे त्या ठिकाणामुळे माझा उत्साह आणखीच वाढला आहे. लालबागचा राजा हे सर्वात मंगलदायी आणि आशीर्वादित असा रंगमंच आहे जो कोणीही अनुभवू शकतो."

Comments
Add Comment

महाशिवरात्रीनिमित्त भाविकांसाठी प्रशासनाकडून जादा बसेसची सोय? बस कुठून कुठे धावणार जाणून घ्या..

पुणे : महाशिवरात्रीनिमित्त पुणे महानगर परिवहन मंडळाकडून भाविकांसाठी विशेष जादा बसेसची सोय ही कऱण्यात आली आहे.

Assam Emergency Landing Highway: पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशातील पहिल्या विशेष 'इमर्जन्शी लँडिंग' सुविधेची सुरुवात

आसाम: यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आसाममध्ये राजकारण तापले आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार

Maharashtra Congress: स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दारुण पराभवानंतर काँग्रेसला जाग; संघटनात्मक बदल करणार

राज्यभरातील ३६ जिल्हाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत

मुक्त जागतिक व्यापार करारात भारताच्या हिताशी कोणतीही तडजोड नाही! केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांची ग्वाही

मुंबई : आत्मनिर्भर भारताच्या संकल्पपूर्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देश आज प्रचंड,

Ambulance Network: महाराष्ट्रात ‘अॅम्बुलन्स’चे जाळे मजबूत होणार; १०० कोटींचा अतिरिक्त निधी

अत्याधुनिक उपकरणांसह रुग्णसेवेचा वेग वाढणार मुंबई : आपत्कालीन वैद्यकीय सेवेचा प्रतिसाद अधिक जलद, अचूक आणि

Startup India FoF 2.0 : मोदी सरकारचा 'मास्टरस्ट्रोक'! स्टार्टअप्ससाठी १०,००० कोटींचा 'फंड ऑफ फंड्स २.०' मंजूर; टर्नओव्हरची मर्यादाही वाढवली

नवी दिल्ली : भारतीय स्टार्टअप्सना जागतिक स्तरावर नेण्यासाठी आणि स्वदेशी गुंतवणुकीला बळ देण्यासाठी केंद्र