बाप्पाच्या स्वागताला वरुणराजाचे आगमन ! या ठिकाणी यलो अलर्ट जारी

मुंबई : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्यामुळे हवामान विभागाने राज्यातील काही भागांमध्ये पुढील २४ तासांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने २६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत घेतलेल्या आढाव्यानंतर ही सूचना दिली आहे.


हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाट, नंदुरबार, धुळे, जळगाव, नांदेड, हिंगोली, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.


या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने NDRF (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल) व SDRF (राज्य आपत्ती प्रतिसाद दल) यांना अलर्टवर ठेवले आहे. सध्या राज्यात १८ NDRF पथके आणि ६ SDRF पथके कार्यरत ठेवण्यात आली आहेत. मुंबईत २ NDRF पथके नेहमीसाठी तैनात असून, आणखी ३ पथके मान्सूनसाठी सज्ज आहेत. याशिवाय पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी, कराड, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नागपूर आणि पुणे येथेही पथके तैनात आहेत. SDRF चे पथक नागपूर, गडचिरोली, धुळे आणि नांदेड येथे सक्रिय आहेत.


गेल्या २४ तासांत सर्वाधिक पावसाची नोंद रायगड जिल्ह्यात ३४. ७ मिमी झाली आहे. त्यानंतर पालघरमध्ये ३०. ३० मिमी, ठाण्यात ३० मिमी, नंदुरबारमध्ये २७. १ मिमी आणि रत्नागिरीत १७. ५ मिमी पाऊस झाला आहे.


मुंबई उपनगरात या पावसामुळे भिंत कोसळल्याची घटना घडली असून, एक व्यक्ती जखमी झाला आहे. आपत्कालीन स्थिती हाताळण्यासाठी प्रशासनाचा नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत आहे. हवामान विभाग (IMD) आणि राष्ट्रीय अंतराळ संशोधन संस्था (NRSC) यांच्याकडून सतत माहिती घेतली जात असून, ती संबंधित जिल्ह्यांना पाठवली जात आहे.

Comments
Add Comment

Central Railway : मुंबई PRS प्रणाली बंद; PNR फाईल कॉम्प्रेशनमुळे काही रेल्वे सेवा तात्पुरत्या ठप्प

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS) मध्ये PNR फाईल कॉम्प्रेशनच्या तांत्रिक देखभाल कामासाठी

Chief Minister Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केपीआयटीचे अध्यक्ष, ज्येष्ठ उद्योजक रवी पंडित यांना श्रद्धांजली

देशातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाच्या पहिल्या फळीतील मार्गदर्शक उद्योजक हरपला मुंबई : माहिती तंत्रज्ञानाच्या

Mega Block on Central Railway : रविवारी मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक; मेन लाईन आणि ट्रान्स-हार्बरवरील अनेक लोकल सेवा प्रभावित

मुंबई : सेंट्रल रेल्वेच्या मुंबई विभागाकडून रविवार, १० मे २०२६ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीची

नाशिकच्या ‘कॉर्पोरेट जिहाद’नंतर राज्य सरकार अलर्ट मोडवर

‘पॉश’ कायद्याची अंमलबजावणी अनिवार्य; कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले मुंबई : नाशिक येथील

मिरा भाईंदरमधील २५४ एकर जमिनीसाठी; राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार

मुंबई : मिरा भाईंदर येथील मिठागराची तब्बल २५४ एकर मोक्याची शासकीय जमीन एका खासगी कंपनीच्या घशात जाण्याची

Decision of State Govt : जिल्हा बँकांतील ७० टक्के जागा यापुढे स्थानिकांसाठी राखीव

राज्य सरकारचा निर्णय; ३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना नियम लागू मुंबई : राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा