उदयगिरी आणि हिमगिरी, २ निलगिरी-क्लास फ्रिगेट्स भारतीय नौदलात दाखल


नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात नौदलाने मंगळवारी आयएनएस हिमगिरी आणि आयएनएस उदयगिरी या दोन निलगिरी-क्लास फ्रिगेट्स भारतीय नौदलात दाखल करुन घेतल्या. या दोन नवीन स्टेल्थ फ्रिगेट्समध्ये ७५ टक्क्यांहून अधिक स्वदेशी आहे. यामुळे संरक्षण उत्पादनात मोदी सरकारच्या 'आत्मनिर्भरता' मोहिमेला चालना मिळण्यास मदत झाली आहे. देशाच्या संरक्षण क्षमतेत वाढ झाली आहे. संरक्षणाच्या बाबतीतले भारताचे स्वावलंबित्व वाढले आहे.


आयएनएस उदयगिरी मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने (एमडीएल) बांधली आहे तर आयएनएस हिमगिरी कोलकाता येथील गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्सने (जीआरएसई) बांधली आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा भारताचे वाढते जहाजबांधणी कौशल्य आणि भारतातील प्रमुख संरक्षण शिपयार्डमधील समन्वय सिद्ध झाला. उदयगिरी आणि हिमगिरी या प्रोजेक्ट १७ (शिवालिक) श्रेणीतील फ्रिगेट्स आहेत. या दोन्ही जहाजांमध्ये आधुनिक डिझाइन, रडारपासून अस्तित्व लपविणारे स्टेल्थ तंत्रज्ञान, शस्त्रे आणि सेन्सर सिस्टीम आहे. निळ्याशार पाण्यात मोठी मोहीम यशस्वी करण्याचे सामर्थ्य आहे. आयएनएस उदयगिरी ही भारताची आतापर्यंतची सर्वाधिक वेगवान फ्रिगेट आहे.


दोन्ही फ्रिगेट्सना पूर्वीच्या आयएनएस उदयगिरी (एफ३५) आणि आयएनएस हिमगिरी (एफ३४) वरून नावे देण्यात आली आहेत. तब्बल तीस वर्षांच्या सेवेनंतर जुन्या आयएनएस उदयगिरी आणि आयएनएस हिमगिरी या फ्रिगेट्स निवृत्त झाल्या आणि आता नव्या आयएनएस हिमगिरी आणि आयएनएस उदयगिरी या दोन निलगिरी-क्लास फ्रिगेट्स भारतीय नौदलात दाखल झाल्या. दोन्ही फ्रिगेट्सची रचना भारतीय नौदलाच्या वॉरशिप डिझाइन ब्युरोने (WDB) केली आहे. उदयगिरी हे वॉरशिप डिझाइन ब्युरोने डिझाइन केलेले १०० वे जहाज आहे.


कार्यान्वीत होताच आयएनएस उदयगिरी आणि आयएनएस हिमगिरी या फ्रिगेट्स नौदलाच्या पूर्वेकडील ताफ्यात सहभागी झाल्या आहेत. हिंद महासागरातील देशाच्या हितांचे रक्षण करण्यासाठी या फ्रिगेट्स काम करतील.


...........

‘उदयगिरी’ची वैशिष्ट्ये


उदयगिरी ही नौका मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड येथे बांधली गेली आहे. हिमगिरी ही नौका कोलकाता येथील गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स यांनी तयार केली आहे. ‘उदयगिरी’ ही भारतीय नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोची १०० वी डिझाईन केलेली युद्धनौका आहे. या युद्धनौकेचे वजन सुमारे ६ हजार ७०० टन असून, या शिवालिक वर्गातील आधीच्या फ्रिगेट्सपेक्षा मोठ्या व अधिक प्रगत आहेत. या नौकांमध्ये सी किंग हेलिकॉप्टर तैनात करण्याची क्षमता आहे.जे पाणबुड्या व पृष्ठभागीय लक्ष्य शोधू शकतात व नष्ट करू शकतात. या दोन्ही युद्धनौकांच्या निर्मितीत २०० हून अधिक भारतीय कंपन्यांचा सहभाग होता, ज्यामुळे ४,००० थेट व १०,००० अप्रत्यक्ष रोजगार निर्माण झाले. या प्रकल्पामुळे नौदलाच्या स्थानीय डिझाईन व निर्मिती क्षमतेला चालना मिळाली असून, पुढील वर्षी भारतीय नौदल अन्य स्वदेशी युद्धनौका जसे की - आईएनएस सूरत (विध्वंसक), आईएनएस नीलगिरी (फ्रिगेट), आईएनएस वाघशीर (पानबुडी), आईएनएस अर्नाळा (एएसडब्ल्यु क्राफ्ट), आणि आईएनएस निस्तार (डायव्हिंग सपोर्ट व्हेसल) यांचे जलावतरण करणार आहे.




Comments
Add Comment

Eknath shinde delhi amit shah : दिल्लीत शिंदे, मुंबईत 'खलबतं'! नाराज एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला; तिकडे CM फडणवीस आणि अजित पवारांची तातडीची गुप्त बैठक

मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य

पीएम किसान हप्ता अडकला? जाणून घ्या कारण आणि उपाय

मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

Vande Bharat Sleeper : 'स्लीपर वंदे भारत' पुढच्या महिन्यात धावणार! रेल्वे मंत्र्यांचे बुलेट ट्रेनवरही निर्णायक वक्तव्य

नवी दिल्ली : देशातील रेल्वे प्रवासाला आधुनिक गती देणारी महत्त्वपूर्ण माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini

बिहार विधानसभेत एनडीएच्या मंत्र्यांची आकडेवारी निश्चित, मात्र अध्यक्षपदासाठी पेच

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता एनडीएकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला

आसाममध्ये चाललंय तरी काय? बोगस डॉक्टरने केले २५ वर्षांपासून हजारो रुग्णांवर उपचार!

आसाम: आसाममध्ये बोगस डॉक्टर गेल्या अडीज वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही