शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही- पंतप्रधानांची ग्वाही, अमेरिकेच्या ५० टक्के टॅरिफवर व्यक्त केला वज्र निर्धार

अहमदाबाद : शेतकरी, लघु उद्योजक आणि पशुपालकांचे हित हेच माझ्यासाठी सर्वोच्च असल्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अहमदाबाद येथे दिले. अमेरिका भारतावर २७ ऑगस्टपासून ५० टक्के टॅरिफ लादत असतानाही, भारतातील शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होऊ देणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.


पंतप्रधान म्हणाले की, कितीही दबाव आला तरीही माझे सरकार लघू उद्योजक, शेतकरी आणि पशुपालकांचे हित जपेल. आम्ही सहनशक्ती वाढवत आहोत आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांचे नुकसान होणार नाही याची मी खात्री देतो असे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूरचा आणि काँग्रेसच्या धोरणांचा उल्लेख करत सांगितले की, जगाने पाहिले आहे की आम्ही पहलगाम नरसंहाराचा बदला २२ मिनिटांत घेतला.


गुजरात ही दोन मोहनांची भूमी आहे – सुदर्शनधारी आणि चरखाधारी. एकाने देशाला सैन्यशक्तीचे प्रतीक बनवले, तर दुसऱ्याने आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवला. पंतप्रधान मोदी हे २५ आणि २६ ऑगस्ट रोजी गुजरातच्या दौऱ्यावर असून, त्यांनी अहमदाबादमध्ये सुमारे 3 किलोमीटरचा रोड शो केला. नरोडा ते निकोल मार्गावर झालेल्या या रोड शोमध्ये त्यांनी जनतेला हात हलवत अभिवादन केले.


यावेळी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधानांनी या दौऱ्यात 5477 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. यामध्ये साबरमती ते काटोसनदरम्यान धावणाऱ्या नव्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने