शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही- पंतप्रधानांची ग्वाही, अमेरिकेच्या ५० टक्के टॅरिफवर व्यक्त केला वज्र निर्धार

अहमदाबाद : शेतकरी, लघु उद्योजक आणि पशुपालकांचे हित हेच माझ्यासाठी सर्वोच्च असल्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अहमदाबाद येथे दिले. अमेरिका भारतावर २७ ऑगस्टपासून ५० टक्के टॅरिफ लादत असतानाही, भारतातील शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होऊ देणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.


पंतप्रधान म्हणाले की, कितीही दबाव आला तरीही माझे सरकार लघू उद्योजक, शेतकरी आणि पशुपालकांचे हित जपेल. आम्ही सहनशक्ती वाढवत आहोत आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांचे नुकसान होणार नाही याची मी खात्री देतो असे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूरचा आणि काँग्रेसच्या धोरणांचा उल्लेख करत सांगितले की, जगाने पाहिले आहे की आम्ही पहलगाम नरसंहाराचा बदला २२ मिनिटांत घेतला.


गुजरात ही दोन मोहनांची भूमी आहे – सुदर्शनधारी आणि चरखाधारी. एकाने देशाला सैन्यशक्तीचे प्रतीक बनवले, तर दुसऱ्याने आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवला. पंतप्रधान मोदी हे २५ आणि २६ ऑगस्ट रोजी गुजरातच्या दौऱ्यावर असून, त्यांनी अहमदाबादमध्ये सुमारे 3 किलोमीटरचा रोड शो केला. नरोडा ते निकोल मार्गावर झालेल्या या रोड शोमध्ये त्यांनी जनतेला हात हलवत अभिवादन केले.


यावेळी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधानांनी या दौऱ्यात 5477 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. यामध्ये साबरमती ते काटोसनदरम्यान धावणाऱ्या नव्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

Comments
Add Comment

तेल आयात सोडा, ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून भारताचा रशियाबरोबर विमान निर्मितीचा ऐतिहासिक करार

देशात तयार होणार सुखोई सुपरजेट नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि भारतामधील व्यापारी संबंध ताणले

चक्रीवादळ 'मोंथा'मुळे देशभरातील हवामान बदलणार

पुढील पाच दिवसांत काही राज्यांना पावसाचा इशारा! मुंबई : बंगालच्या खाडीत उफाळलेलं मोंथा चक्रीवादळ, अरबी

फॉरेन्सिकचं ज्ञान वापरून खून लपवण्याचा प्रयत्न, पण हुशार पोलिसांनी बिंग फोडले!

नवी दिल्ली : यूपीएससीची तयारी करणाऱ्या ३२ वर्षीय तरुणाची त्याच्याच प्रेयसीनं हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार

पाकिस्तान-अफगाणिस्तानात तणाव असतानाच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू घेणार राफेलमधून झेप!

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या, म्हणजेच २९ ऑक्टोबर २०२५ रोजी, हरियाणातील अंबाला हवाई दल

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 'बंपर' भेट!; ८वा वेतन आयोग अखेर मंजूर; 'या' तारखेपासून होणार लागू, किमान वेतनात होणार 'इतकी' वाढ!

नवी दिल्ली: केंद्र सरकारने अखेर आज ८ व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे. यामुळे ५० लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी

दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल ३ वर मोठा अपघात; एअर इंडियाच्या बसला आग

नवी दिल्ली : दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल ३ वर मोठा अपघात झाला. टर्मिनल ३ वर एअर इंडियाच्या बसला आग लागली. सुदैवाने