सेंच्युरी मिलची जागा गिरणी कामगारांच्या घरांसाठी मिळण्याचा मार्ग मोकळा

  15

सेंच्युरी मिल व्यवस्थापनाने जागा देणार; गिरणी कामगार संघर्ष समितीच्या मागणीला यश


मुंबई : वरळी येथील सेंच्युरी मिल मधील ४८८८.७८ चौ.मी.जागा गिरणी कामगारांच्या घरासाठी सीमांकन करून सुद्धा, वाडिया आणि सेंच्युरी मिल व्यवस्थापन यांच्या वादामुळे सेंच्युरी कामगारांच्या घरासाठी मिळत नव्हती. हा वाद मिटल्यामुळे, या जागेची मागणी केल्याने नुकत्याच मॉनेटरी कमिटीत झालेल्या सुनावणीमध्ये ही जागा घरासाठी सेंच्युरी मिल व्यवस्थापनाने देण्याची तयारी दर्शवली आहे.


गिरणी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रवीण घाग हे गेले १२ वर्ष ही जागा गिरणी कामगारांच्या घरासाठी मिळावी म्हणून मॉनेटरी कमिटीकडे दाद मागत आहेत. नुकताच नसली वाडिया आणि सेंच्युरी मिल व्यवस्थापनाचा या जागेसंबंधी असलेला वाद मिटला आहे. हे समजताच प्रवीण घाग आणि सेंच्युरी एकता मंचचे अध्यक्ष नंदू पारकर व जितेंद्र राणे यांनी यासंबंधी या सुनवणीवेळी हा प्रश्न उपस्थित केला आणि ही जागा मिळावी म्हणून जोरदार मागणी केली.


म्हाडाचे कार्यकारी अभियंता गावित यांनी सुद्धा ही जागा गिरणी कामगारांसाठी आहे, असे लेखी कळविले आहे. यामुळे सेंच्युरी मिल व्यवस्थापनाच्या प्रतिनिधी सुनीता थापलियाल यांनी सांगितले की, या जागेच्या विकासाची प्रक्रिया चालू करून गिरणी कामगारांना त्यांची घरे दिली जातील.


यामुळे या जागेवर वरळी येथे सेंच्युरी मिल गिरणी कामगारांना आणखीन ५८८ घरे मिळतील. मॉनेटरी कमिटीने दिलेल्या आदेशाप्रमाणे सेंच्युरी मिल व्यवस्थापनाने घेतलेल्या या भूमिकेमुळे गिरणी कामगार संघर्ष समिती व सेंच्युरी मिल एकता मंच या संघटनांनी समाधान व्यक्त केलेे.


यापूर्वी २०१२ साली एकूण १७९८०.६९चौ. मी.जागेपैकी १३०९१.९० चौ मी.जागा मिळाली होती. एवढ्या जागेवर कामगारांसाठी घर बांधणी होऊन कामगारांना २१३० घरे मिळाली आहेत. सेंच्युरी मिल पात्र गिरणी कामगारांची संख्या ८६८४ इतकी आहे. सेंच्युरी मिल चाळीतील राहत असलेल्या जागेपैकी सहा एकर जागा सुप्रीम कोर्टात झालेल्या निवाडाप्रमाणे ही जागा बीएमसीकडे गेली.


तेव्हा या जागेचा बीएमसीकडून विकास केला जाईल तेव्हा त्या जागेवरील सेंच्युरी मिल चाळ रहिवाशांचा कायद्याप्रमाणे पुनर्विकास करून उर्वरित जागेचा वापर बीएमसीने सेंच्युरी मिल कामगारांच्या घरासाठीच करावा, अशी मागणी केली.

Comments
Add Comment

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड, पालिकेआधी भाजपचा मोठा निर्णय, कोण आहेत अमित साटम?

मुंबई पालिका निवडणुकीच्याआधी भाजपने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड झाली आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

मुंबईत सकाळी मुसळधार पाऊस, तासाभरात २० मिमी. पावसाची नोंद

मुंबई : मागच्या आठवड्याच्या सुरुवातीला पावसानं मुंबईला झोडपलं. यानंतर चार दिवस विश्रांती घेऊन पाऊस पुन्हा हजर

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या खात्यावर मुख्यमंत्र्यांची नाराजी, बैठकीला शिंदे उपस्थित नसल्याची माहिती

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीच्या बातम्या समोर येत असताना

Health: मुलांची उंची आणि चांगले आरोग्य वाढवण्यासाठी उपयुक्त पदार्थ

मुंबई : मुलांच्या योग्य शारीरिक वाढीसाठी त्यांना योग्य आहार देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः त्यांची उंची

Mumbai Rain Update: चार दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईसह उपनगरात पावसाचा पुन्हा जोर

मुंबई: बाप्पाच्या आगमनाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना मुंबईसह उपनगरात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली