सेंच्युरी मिलची जागा गिरणी कामगारांच्या घरांसाठी मिळण्याचा मार्ग मोकळा

सेंच्युरी मिल व्यवस्थापनाने जागा देणार; गिरणी कामगार संघर्ष समितीच्या मागणीला यश


मुंबई : वरळी येथील सेंच्युरी मिल मधील ४८८८.७८ चौ.मी.जागा गिरणी कामगारांच्या घरासाठी सीमांकन करून सुद्धा, वाडिया आणि सेंच्युरी मिल व्यवस्थापन यांच्या वादामुळे सेंच्युरी कामगारांच्या घरासाठी मिळत नव्हती. हा वाद मिटल्यामुळे, या जागेची मागणी केल्याने नुकत्याच मॉनेटरी कमिटीत झालेल्या सुनावणीमध्ये ही जागा घरासाठी सेंच्युरी मिल व्यवस्थापनाने देण्याची तयारी दर्शवली आहे.


गिरणी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रवीण घाग हे गेले १२ वर्ष ही जागा गिरणी कामगारांच्या घरासाठी मिळावी म्हणून मॉनेटरी कमिटीकडे दाद मागत आहेत. नुकताच नसली वाडिया आणि सेंच्युरी मिल व्यवस्थापनाचा या जागेसंबंधी असलेला वाद मिटला आहे. हे समजताच प्रवीण घाग आणि सेंच्युरी एकता मंचचे अध्यक्ष नंदू पारकर व जितेंद्र राणे यांनी यासंबंधी या सुनवणीवेळी हा प्रश्न उपस्थित केला आणि ही जागा मिळावी म्हणून जोरदार मागणी केली.


म्हाडाचे कार्यकारी अभियंता गावित यांनी सुद्धा ही जागा गिरणी कामगारांसाठी आहे, असे लेखी कळविले आहे. यामुळे सेंच्युरी मिल व्यवस्थापनाच्या प्रतिनिधी सुनीता थापलियाल यांनी सांगितले की, या जागेच्या विकासाची प्रक्रिया चालू करून गिरणी कामगारांना त्यांची घरे दिली जातील.


यामुळे या जागेवर वरळी येथे सेंच्युरी मिल गिरणी कामगारांना आणखीन ५८८ घरे मिळतील. मॉनेटरी कमिटीने दिलेल्या आदेशाप्रमाणे सेंच्युरी मिल व्यवस्थापनाने घेतलेल्या या भूमिकेमुळे गिरणी कामगार संघर्ष समिती व सेंच्युरी मिल एकता मंच या संघटनांनी समाधान व्यक्त केलेे.


यापूर्वी २०१२ साली एकूण १७९८०.६९चौ. मी.जागेपैकी १३०९१.९० चौ मी.जागा मिळाली होती. एवढ्या जागेवर कामगारांसाठी घर बांधणी होऊन कामगारांना २१३० घरे मिळाली आहेत. सेंच्युरी मिल पात्र गिरणी कामगारांची संख्या ८६८४ इतकी आहे. सेंच्युरी मिल चाळीतील राहत असलेल्या जागेपैकी सहा एकर जागा सुप्रीम कोर्टात झालेल्या निवाडाप्रमाणे ही जागा बीएमसीकडे गेली.


तेव्हा या जागेचा बीएमसीकडून विकास केला जाईल तेव्हा त्या जागेवरील सेंच्युरी मिल चाळ रहिवाशांचा कायद्याप्रमाणे पुनर्विकास करून उर्वरित जागेचा वापर बीएमसीने सेंच्युरी मिल कामगारांच्या घरासाठीच करावा, अशी मागणी केली.

Comments
Add Comment

रस्ते विकासाच्या कामांबाबत मनसेच्या किल्लेदारांचा स्थायी समिती अध्यक्षांना सवाल

अर्थसंकल्पावरील भाषणात घेतला समाचार मुंबई : मुंबईतील अनेक रस्त्यांच्या कामांच्या विकासाची कामे

प्रत्येक उद्यानांमध्ये बोअरवेल खोदण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मुंबई : मुंबईमधील महानगरपालिकेच्या सर्व विद्यमान उद्यानांमध्ये व उद्यानांचा विकास करुन नव्याने तयार करण्यात

गोरेगाव संतोषनगरमध्ये दोन गटात हाणामारी,महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर चालवला गेला 'बुलडोझर'

मुंबई : गोरेगाव पूर्व येथील संतोषनगर परिसरात रविवारी घडलेल्या हिंदू आणि मुस्लिम गटांतील हाणामारीच्या घटनेनंतर

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि