भटक्या कुत्र्याचा पाच वर्षांच्या मुलावर हल्ला


नवी दिल्ली : दिल्लीच्या शकरपूर भागात भटक्या कुत्र्याने पाच वर्षांच्या मुलावर हल्ला केला. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला.


मुलगा खेळत असताना भटक्या कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला. मुलाच्या शरीरावर अनेक ठिकाणी कुत्रा चावल्याच्या खुणा दिसत आहेत. कत्र्याच्या हल्ल्याने घाबरलेला मुलगा ओरडू आणि रडू लागला. मुलाचा आवाज ऐकून परिसरात उपस्थित असलेल्या एका पोलिसाने घटनास्थळी धाव घेतली आणि मुलाची सुटका केली. यानंतर मुलाला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेत उपचार मिळाल्यामुळे मुलाची प्रकृती स्थिर आहे.


काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतल्या भटक्या कुत्र्यांच्या प्रकरणात एक निर्णय दिला आहे. या निर्णयानुसार भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी केली जाईल तसेच त्या कुत्र्यांना विशिष्ट वैद्यकीय इंजेक्शन दिली जातील. यानंतर ज्या भागातून पकडून आणले होते त्याच भागात परत सोडले जाईल. जे कुत्रे आक्रमक असतील त्यांना नसबंदी केल्यानंतर आणि विशिष्ट वैद्यकीय इंजेक्शन दिल्यानंतर कुत्र्यांसाठीच्या आश्रयगृहात ठेवले जाईल. भटक्या कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी खाऊ घालता येणार नाही, यासाठी प्रशासनाला ठिकठिकाणी विशेष व्यवस्था करावी लागेल. नेमून दिलेल्या जागेवर कुत्र्यांना खाऊ घालता येईल, असेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते. अनेकांनी या आदेशाचे स्वागत केले होते. भटक्या कुत्र्यांच्या प्रकरणात एक संतुलीत निर्णय देण्यात आल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली होती. या घटनेला काही दिवस होत नाहीत तोच दिल्लीत भटक्या कुत्र्याने पाच वर्षांच्या मुलावर हल्ला केला.



Comments
Add Comment

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड… यांसारख्या ११ भाषांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' याचा १२७ व भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी

भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी