भटक्या कुत्र्याचा पाच वर्षांच्या मुलावर हल्ला


नवी दिल्ली : दिल्लीच्या शकरपूर भागात भटक्या कुत्र्याने पाच वर्षांच्या मुलावर हल्ला केला. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला.


मुलगा खेळत असताना भटक्या कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला. मुलाच्या शरीरावर अनेक ठिकाणी कुत्रा चावल्याच्या खुणा दिसत आहेत. कत्र्याच्या हल्ल्याने घाबरलेला मुलगा ओरडू आणि रडू लागला. मुलाचा आवाज ऐकून परिसरात उपस्थित असलेल्या एका पोलिसाने घटनास्थळी धाव घेतली आणि मुलाची सुटका केली. यानंतर मुलाला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेत उपचार मिळाल्यामुळे मुलाची प्रकृती स्थिर आहे.


काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतल्या भटक्या कुत्र्यांच्या प्रकरणात एक निर्णय दिला आहे. या निर्णयानुसार भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी केली जाईल तसेच त्या कुत्र्यांना विशिष्ट वैद्यकीय इंजेक्शन दिली जातील. यानंतर ज्या भागातून पकडून आणले होते त्याच भागात परत सोडले जाईल. जे कुत्रे आक्रमक असतील त्यांना नसबंदी केल्यानंतर आणि विशिष्ट वैद्यकीय इंजेक्शन दिल्यानंतर कुत्र्यांसाठीच्या आश्रयगृहात ठेवले जाईल. भटक्या कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी खाऊ घालता येणार नाही, यासाठी प्रशासनाला ठिकठिकाणी विशेष व्यवस्था करावी लागेल. नेमून दिलेल्या जागेवर कुत्र्यांना खाऊ घालता येईल, असेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते. अनेकांनी या आदेशाचे स्वागत केले होते. भटक्या कुत्र्यांच्या प्रकरणात एक संतुलीत निर्णय देण्यात आल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली होती. या घटनेला काही दिवस होत नाहीत तोच दिल्लीत भटक्या कुत्र्याने पाच वर्षांच्या मुलावर हल्ला केला.



Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च