रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारणीचे अनेक प्रकार घडतात. रिक्षाचालक किंवा बस वाहतूकदारांकडून प्रवाशांशी उद्धट वर्तनाचे प्रकारही घडतात.



आता प्रवाशांना त्याबद्दलची थेट तक्रार व्हॉट्सअ‍ॅपवर करता येणार आहे. या संदर्भातील तक्रार नागरिकांनी 8275101779 या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर वाहन आणि प्रवासाच्या तपशिलासह करावी, असे आवाहन रत्नागिरीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी केले आहे. खासगी बसने किती जास्तीत जास्त किती भाडे आकारावे आणि मीटरप्रमाणे व शेअर रिक्षाचे दर किती असावेत याबाबतचे दरतक्ते आरटीओ कार्यालयाने प्रसिद्ध केले आहेत.



त्याचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध नागरिकांनी तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. जादा भाडे आकारणाऱ्या खासगी कंत्राटी प्रवासी बस आणि रिक्षा यांच्याविरुद्ध तक्रार करताना वाहन क्रमांक आणि प्रवासाचा तपशीलही पाठवावा. dyrto.08-mh@gov.in हा ई-मेल आयडी अथवा 8275101779 या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर तक्रार दाखल करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणातर्फे तयार करण्यात आलेला भाडेदर तक्ता (मीटरप्रमाणे आणि शेअर रिक्षा) जिल्ह्यातील विविध रिक्षाथांब्यांवर प्रदर्शित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एसटी) त्या त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्यःस्थितीचे भाडेदर विचारात घेऊन खासगी कंत्राटी परवाना वाहनाचे भाडे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति किलोमीटर भाडेदराच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक राहणार नाहीत.

कमाल भाडेदर २७ एप्रिल २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आले आहेत. ते आरटीओ कार्यालयाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा प्रसिद्ध केले आहेत.
Comments
Add Comment

Eknath Shinde : शिंदेंकडून निलेश राणेंचं तोंडभरून कौतुक! "इलाका किसी का भी हो, धमाका निलेश राणेच करणार"; मालवण हा सेनेचाच बालेकिल्ला

मालवणमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांचे

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे धुक्यामुळे भीषण अपघात

शिवशाही बस, ट्रकमध्ये धडक; १ ठार, ११ जखमी प्रमोद जाधव माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे.

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी

Narayan Rane : 'कोण आदित्य ठाकरे?' "बाळासाहेबांनंतर शिवसेना राहिली नाही! नारायण राणेंचा उद्धव गटावर हल्लाबोल

चिपळूण : भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज चिपळूण दौऱ्यादरम्यान शिउबाठा नेतृत्वावर अत्यंत कडक शब्दांत टीका

साळीस्ते खून प्रकरणात नवा ट्विस्ट! मृतदेह डॉक्टर पेशातील व्यक्तीचा असल्याची चर्चा ?

कणकवली: साळीस्ते येथे गुरुवारी दुपारी १२:३० एका पुरुषाचा मृतदेह काहीसा कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ माजली