रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

  26

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारणीचे अनेक प्रकार घडतात. रिक्षाचालक किंवा बस वाहतूकदारांकडून प्रवाशांशी उद्धट वर्तनाचे प्रकारही घडतात.



आता प्रवाशांना त्याबद्दलची थेट तक्रार व्हॉट्सअ‍ॅपवर करता येणार आहे. या संदर्भातील तक्रार नागरिकांनी 8275101779 या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर वाहन आणि प्रवासाच्या तपशिलासह करावी, असे आवाहन रत्नागिरीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी केले आहे. खासगी बसने किती जास्तीत जास्त किती भाडे आकारावे आणि मीटरप्रमाणे व शेअर रिक्षाचे दर किती असावेत याबाबतचे दरतक्ते आरटीओ कार्यालयाने प्रसिद्ध केले आहेत.



त्याचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध नागरिकांनी तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. जादा भाडे आकारणाऱ्या खासगी कंत्राटी प्रवासी बस आणि रिक्षा यांच्याविरुद्ध तक्रार करताना वाहन क्रमांक आणि प्रवासाचा तपशीलही पाठवावा. dyrto.08-mh@gov.in हा ई-मेल आयडी अथवा 8275101779 या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर तक्रार दाखल करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणातर्फे तयार करण्यात आलेला भाडेदर तक्ता (मीटरप्रमाणे आणि शेअर रिक्षा) जिल्ह्यातील विविध रिक्षाथांब्यांवर प्रदर्शित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एसटी) त्या त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्यःस्थितीचे भाडेदर विचारात घेऊन खासगी कंत्राटी परवाना वाहनाचे भाडे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति किलोमीटर भाडेदराच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक राहणार नाहीत.

कमाल भाडेदर २७ एप्रिल २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आले आहेत. ते आरटीओ कार्यालयाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा प्रसिद्ध केले आहेत.
Comments
Add Comment

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

रत्नागिरीत युनिट टेस्टमध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

रत्नागिरी जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षेतील कमी गुणांमुळे भविष्याच्या चिंतेतून आईने हटकले

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

माणगावमध्ये वाहतूककोंडी, ठिकठिकाणी पोलिस तैनात

मुंबईमधून गणपतीला कोकणात जाणाऱ्या गाड्यांमुळे सलग दुसऱ्या दिवशी माणगाव शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली

गणपतीला कोकणात जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकांवर गर्दी

आज रविवार असल्याने गणपतीला कोकणात जाण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील विविध ठिकाणाहून