समुद्र किनाऱ्यांची कचऱ्यातून सुटका

  24

मुसळधार पावसामुळे चौपाट्यांवर पसरलेला कचरा साफ


मागील नऊ दिवसांमध्ये ९५० मेट्रीक टन कचऱ्याची लावली विल्हेवाट


मुंबई (खास प्रतिनिधी) : अतिमुसळधार पावसामुळे मुंबईतील विविध समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला होता. त्यामुळे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने अत्यंत तत्परतेने स्वच्छता मोहीम हाती घेत मुंबईतील स्वराज्यभूमी (गिरगाव), दादर, माहीम, जुहू, वेसावे (वर्सोवा), मढ-मार्वे आणि गोराई या समुद्रकिनाऱ्यांचा परिसर स्वच्छ केला आहे. मागील १५ ते २३ ऑगस्ट २०२५ पर्यंत एकूण ९५२.५ मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. सुमारे ३८० कर्मचाऱ्यांनी एकूण ६ मशिन्सच्या सहाय्याने २४ तास अथक प्रयत्न करून हे सहाही समुद्रकिनारे पूर्ववत स्वच्छ, सुंदर केले.


मंगळवारी १९ आणि बुधवारी २० ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला. या पार्श्वभूमीवर, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, महानगरपालिकेच्या संबंधित विविध विभागांच्या वतीने तत्काळ विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याच अनुषंगाने, पावसामुळे निर्माण झालेला कचरा संकलित करून त्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या देखरेखीखाली आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने, मुंबईतील स्वराज्य भूमी (गिरगाव), दादर, माहीम, जुहू, वेसावे (वर्सोवा), मढ-मार्वे आणि गोराई या समुद्रकिनाऱ्यांच्या परिसरात जमा झालेला कचरा संकलित करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. यामध्ये शनिवारी २३ ऑगस्ट २०२५ पर्यंत या समुद्रकिनाऱ्यांवरून एकूण ९५२.५ मेट्रिक टन कचरा हटविण्यात आला आहे. यासाठी ३८० स्वच्छता कर्मचारी ६ संयंत्रांच्या सहाय्याने २४ तास कार्यरत होते.



समुद्रकिनाऱ्यांवर करण्यात आलेली स्वच्छता आणि मनुष्यबळ



  • स्वराज्यभूमी गिरगाव चौपाटी – २३ मेट्रिक टन (१६ मनुष्यबळ आणि १ मशीन)

  • दादर-माहीम चौपाटी – ३०० मेट्रिक टन (४८ मनुष्यबळ आणि १ मशीन)

  • वेसावे चौपाटी – २०० मेट्रिक टन (१२० मनुष्यबळ आणि १ मशीन)

  • जुहू चौपाटी – ३७५ मेट्रिक टन (१५० मनुष्यबळ आणि १ मशीन)

  • मढ-मार्वे चौपाटी – ३४.५ मेट्रिक टन (३५ मनुष्यबळ आणि १ मशीन)

  • गोराई चौपाटी – २० मेट्रिक टन (१४ मनुष्यबळ आणि १ मशिन)

Comments
Add Comment

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अरण्य’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच मराठी चित्रपट ‘अरण्य’ च्या पोस्टरचे अनावरण करण्यात

मुंबईत अंधेरीमध्ये पाच मजली मासळी बाजार बांधणार ?

मुंबई : मुंबईत अंधेरीमध्ये जे. बी. नगर येथे पाच मजली मासळी बाजार बांधण्याचा १३८ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरी

आरक्षणाची लढाई लढावी, पण... नितेश राणेंचा जरांगेंना इशारा

मुंबई : जे रक्ताने मराठे असतात ते कधीही आईविषयी अपशब्द वापरणार नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर्श

मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत मनोज जरांगेंचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी दर्जा आणि आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना

मरिनड्राईव्हच्या समुद्रात तरुणीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ

मुंबई: मुंबईच्या मरिनड्राईव्ह परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नरिमन पॉईंट येथील समुद्रात एका तरुणीचा

मुंबईत यंदा २७५ कृत्रिम तलावांची निर्मिती

मुंबई (खास प्रतिनिधी) : श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये व्हावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून