गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव


नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री आपोआप पदमुक्त होईल अशी तरतूद असलेले विधेयक केंद्र सरकारने तयार केले आहे. या विधेयकात पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनाही गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास आपोआप पदमुक्त करण्याची तरतूद आहे. तुरुंगातून सरकार चालवण्याचा प्रकार घडू नये यासाठी तरतुदी केलेले हे विधेयक केंद्र सरकारने लोकसभेत ठराव मंजूर करुन संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. आता विधेयकावर साधकबाधक चर्चा करण्याची संधी असताना विरोधक संयुक्त संसदीय समितीवर बहिष्कार टाकत आहेत. यामुळे स्वतःच्या गुन्हेगारी प्रकरणात अडकलेल्या नेत्यांना वाचवण्यासाठी विरोधक रडीचा डाव खेळत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी यांनी गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकावर चर्चेसाठी स्थापन होणार असलेल्या संयुक्त संसदीय समितीवर बहिष्कार टाकल्याचे जाहीर केले आहे.


काही महिन्यांपूर्वी आम आदमी पार्टीचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांना भ्रष्टाचाराच्या आरोपात अटक झाली. त्यावेळी केजरीवाल गंभीर आरोपात तुरुंगात असूनही त्यांनी राजीनामा देणे टाळले होते. तुरुंगातून मुख्यमंत्री सरकार चालवत होते. कायद्याचे राज्य या संकल्पनेलाच दिल्लीतल्या घटनेमुळे धक्का लागला होता. यामुळेच नैतिकतेचा मुद्दा मांडत केंद्र सरकारने पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनाही गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास आपोआप पदमुक्त करण्याची तरतूद असलेले विधेयक लोकसभेत सादर केले. गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री आपोआप पदमुक्त होईल अशी तरतूद असलेले विधेयक केंद्र सरकारने सादर केले आहे. या विधेयकाच्या मसुद्यावर सर्व बाजूंनी पुरेसा विचार व्हावा यासाठीच विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा ठराव केंद्राने लोकसभेत मंजूर करुन घेतला. . आता विधेयकावर साधकबाधक चर्चा करण्याची संधी असताना विरोधक संयुक्त संसदीय समितीवर बहिष्कार टाकत आहेत. यामुळे स्वतःच्या गुन्हेगारी प्रकरणात अडकलेल्या नेत्यांना वाचवण्यासाठी विरोधक रडीचा डाव खेळत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.


Comments
Add Comment

25 वर्षांच्या संसारात मिठाचा खडा , 7 लेकरांची आईने चारित्र्याच्या संशयाने जीव गमावला ; काय घडलं ?

Bihar Crime : बिहारमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. २५ वर्षाच्या संसारात मिठाचा खडा पडला. 25 वर्षांपूर्वी ज्या

Konkan Hapus' Fills Delhi : दिल्लीत 'कोकण हापूस'चा सुगंध! निवासी आयुक्त आर. विमला यांच्या हस्ते आंबा महोत्सवाचे दिमाखात उद्घाटन

नवी दिल्ली : दिल्लीच्या बाजारपेठेत अनेक प्रकारचे आंबे उपलब्ध असतात, मात्र तो आंबा अस्सल देवगड किंवा

Srilanka Cricket News : क्रिकेटविश्व हादरलं! 2 खेळाडूंनी हॉटेलच्या बाथरूममध्ये लपून काढले महिला डॉक्टरचे अश्लील व्हिडीओ

क्रीडा विश्वाला हादरवून सोडणारी आणि अत्यंत संतापजनक अशी एक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. दोन क्रिकेटपटूंनी एका

Jabalpur Cruise: जबलपूर क्रूझ दुर्घटनेत 9 जणांचा करुण अंत, माय-लेकाचा 'तो' क्षण काळीज पिळवटून टाकणारा; नेमकं काय घडलं ?

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील जबलपूर इथलं लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या बर्गी धरणावर गुरुवारी रात्री एका

LPG Gas Price Hike : महागाईचा भडका! तब्बल ९९३ रुपयांनी महागला गॅस सिलेंडर; जाणून घ्या एका सिलेंडरसाठी किती रुपये मोजावे लागणार?

मुंबई : मे महिन्याच्या सुरुवातीलाच तेल कंपन्यांनी सर्वसामान्यांना मोठा धक्का दिला आहे. १९ किलोच्या व्यावसायिक

Madhya Pradesh Narmada cruise accident : बरगी धरणात क्रूझ बुडाले, ४ जणांचा मृत्यू,१०-१५ बेपत्ता

मध्यप्रदेशच्या जबलपूर येथील बरगी धरण परिसरात अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यांमुळे एक मोठा अपघात घडला.