पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५ लाखांच्या भव्य दहीहंडी उत्सवात घडलेल्या अपघातात पवईतील गोविंदा पथकातील आनंद सुरेश दांडगे (वय 26) गंभीर जखमी झाला होता. पण त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.


दिनांक 16 ऑगस्ट रोजी झालेल्या या दहीहंडी उत्सवात पवईच्या गोखले नगर गोविंदा पथकाने सहभाग घेतला होता. आनंद दांडगे हा चौथ्या थरावर चढला असताना, "तीन एक्के" घेऊन खाली उतरताना तोल गेल्याने तो थेट खाली कोसळला. या अपघातात त्यांच्या डोक्याला व मानेला गंभीर दुखापत झाली होती.


त्याला तत्काळ कन्नमवार नगर आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढे विक्रोळीतील सुश्रुषा रुग्णालयात हलवण्यात आले.


गेल्या सात दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र 23 ऑगस्ट रोजी दुपारी 2.31 वाजता डॉक्टरांनी त्यांला मृत घोषित केले.मृत्यूची बातमी कळताच दांडगे कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. तसेच परिसरातील नागरिकांनीही शोक व्यक्त केला आहे.


या प्रकरणी विक्रोळी पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून, शवविच्छेदनासाठी मृतदेह राजावाडी रुग्णालय, घाटकोपर येथे पाठवण्यात आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा अपघाताचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


दरम्यान, मुंबईत यावर्षीचा दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला असला तरी त्यात तब्बल 318 गोविंदा जखमी झाले. तर दोन जणांचा मृत्यू झाला होता. तर विक्रोळीत झालेल्या दुर्घटनेमुळे ही संख्या तीन वर गेली आहे.


Comments
Add Comment

वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात मुंबई पुष्पोत्सवाचा शुभारंभ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई पुष्पोत्सवाप्रमाणेच येत्या काळात पूर्व आणि पश्चिम उपनगरांतही पुष्पोत्सव सुरू

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला दिला पाठिंबा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव नगरसेवक निवडून आला असून या नगरसेवकानेही आता

राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्शांची आता मोजणी

प्रत्येक भूखंडाला मिळणार भू आधार क्रमांक ७/१२ आणि नकाशांचा मेळ बसणार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा

"मुंबईच्या सुवर्णकाळाची सुरुवात...", मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी, ६ फेब्रुवारी २०२६

उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, असे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग

वांद्रे–वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडवर हेलिपॅड उभारा

मंत्री आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस