रत्नागिरीच्या रस्त्यांवर लवकरच धावणार ई-बसेस, एसटी महामंडळाची ई-क्रांतीकडे वाटचाल

एसटी महामंडळाने प्रदूषण आणि डिझेलच्या वाढत्या खर्चाला आळा घालण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, रत्नागिरी जिल्ह्याचा एसटीचा ताफा लवकरच प्रदूषणमुक्त ई-बसेसनी सज्ज होणार आहे. पहिल्या टप्प्यात ३० प्रदूषणरहित ई-बसेस लवकरच रत्नागिरीच्या रस्त्यांवर धावताना दिसतील, अशी माहिती एसटी महामंडळाच्या रत्नागिरी विभागाचे नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली. यामुळे डिझेलवरील लाखो रुपयांचा खर्च वाचणार असून, प्रवाशांना प्रदूषणमुक्त प्रवासाचा अनुभव मिळेल.

एसटी महामंडळाने डिझेलच्या खर्चाला पर्याय म्हणून ई-बसेससोबतच सीएनजी बसेसचा वापरही वाढवला आहे. लवकरच रत्नागिरी विभागासाठी ६० नवीन सीएनजी बसेस दाखल होणार आहेत. यापूर्वीच चिपळूण विभागाला ३० सीएनजी बसेस मंजूर झाल्या आहेत.

विशेष म्हणजे, या सीएनजी बसेस १ किलो सीएनजीमध्ये ४ किलोमीटरचे अंतर कापतात आणि त्यांची क्षमता २८० किलोमीटर इतकी आहे. ई-बसेस सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. महावितरण कंपनीकडून हे काम वेगाने पूर्ण केले जात आहे. पहिले चार्जिंग स्टेशन रत्नागिरीतील माळनाका आगारात तयार होत आहे. पुढील टप्प्यात खेड आणि दापोली आगारांमध्येही चार्जिंग स्टेशन्स लवकरच उभारली जातील.

एकदा चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण झाले की, या ३० ई-बसेस टप्प्याटप्प्याने एसटीच्या ताफ्यात समाविष्ट केल्या जातील, असे बोरसे यांनी सांगितले. अलीकडच्या काळात ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेल्या एसटीचा कायापालट सुरू झाला आहे.

एसटीमध्ये आता चांगल्या गाड्यांची भर पडत असल्यामुळे प्रवाशांचा एसटीकडे कल वाढत असून, उत्पन्नातही वाढ होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या शिवशाही, स्लीपर आणि सिटी बसेस अशा सुमारे ७२० बसेस धावत आहेत.

एमआयडीसीच्या सहकार्याने येथील अनेक बसस्थानके हाय-टेक केली जात असल्याचेही सांगण्यात आले.
दरम्यान, रत्नागिरी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी सांगितले की, “प्रवाशांना उत्तम आणि सुरक्षित सेवा देण्याच्या दृष्टीने एसटी महामंडळ आता नव्या युगाकडे वाटचाल करत आहे. लवकरच रत्नागिरीच्या रस्त्यांवर ई-बसेस धावताना दिसतील.”
Comments
Add Comment

Kokan Railway trains : कोकण रेल्वेच्या पाच गाड्यांना संगमेश्वर येथे थांबा मिळण्याची शक्यता!

रत्नागिरी : कोकण रेल्वेसंदर्भात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत संगमेश्वर रेल्वे स्थानकासाठी दिलासादायक

​Sawantwadi : सावंतवाडी शहराला वादळाचा तडाखा

रामेश्वर प्लाझा इमारतीचे पत्रे उडाले पंचम खेमराज महाविद्यालयाच्या जुने इमारतीचे अतोनात नुकसान सावंतवाडी :

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज

Ratnagiri : चार वाहनांना धडक देऊन ट्रक कोसळला विहिरीत

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे हातखंबा येथे चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर

Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गाचा नवा मार्ग निश्चित; कोकणातील 'या' ९ गावांतून सुसाट धावणार गाड्या!

मुंबई : राज्यातील प्रस्तावित 'शक्तीपीठ महामार्गा'बाबत (शेतकऱ्यांनी दर्शवलेला तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक