मटका जुगारावरील छाप्यानंतर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर

सिंधुदुर्गांतील भावी पिढीच्या भविष्यासाठी मंत्री नितेश राणे आक्रमक


दिवसभर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात अनेक ठिकाणी पोलिसांची छापेमारी; गुटका, दारू, मटका, जुगार अड्ड्यांवर सिंधुदुर्ग पोलिसांची छापेमारी व अटक सत्र सुरू


सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथील मटका अड्ड्यावर पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वतः धाड टाकल्यानंतर सिंधुदुर्ग पोलीस ॲक्शन मोडवर गेले आहेत. जिल्ह्यातील सर्व मटका जुगार अड्डे थांबवले गेले असून दर दिवशी होणारा लाखो रुपयांचा चुराडा या कारवाईमुळे थांबविला गेला आहे. कणकवलीचे पोलीस निरीक्षक यांचे या प्रकरणात झालेले निलंबन जिल्ह्यातील सर्व अवैध धंद्यांना रोखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यां विरोधात जिल्ह्यात पोलिसांनी छापेमारी सुरू केली आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी केली जात आहे व यात गुंतलेल्या संशयित गुन्हेगारांचे अटक सत्र सुरू झाले आहे.


जिल्ह्यातील दारू मटका जुगार या अवैध धंद्यांवर पोलीस दलाने छापेमारी सुरू केली आहे. अनेक ठिकाणी या कारवाया पोलिसांनी केल्या आहेत. कणकवलीमधील घेवारी यांच्या मटका अड्ड्यावर पालकमंत्री नितेश राणे यांनी घातलेली धाड जिल्ह्यातील सर्व बेकायदेशीर कृत्ये रोखण्यासाठी दिशा देणारी ठरली आहे. बेकायदेशीर दारू,मटका जुगार, चरस गांजा अशा नशेली पदार्थांच्या रॅकेटमुळे सिंधुदुर्गची भावी पिढी बरबाद होता नये यावर पोलिसांनी अंकुश ठेवावा, असे स्पष्ट आदेश पालकमंत्री नितेश राणे यांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन दिले होते. माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा बेकायदेशीर कृत्यामुळे लाखो रुपयांचा चुराडा होत आहे. भावी पिढीचे त्यात मोठे नुकसान होत आहे. याबाबत गांभीर्याने घ्यावे, असे स्पष्ट निर्देशाने दिले होते. आता पोलिसांनी जिल्ह्यातील असे बेकायदेशीर अड्डे व ते चालवणारे नेटवर्क मोडण्यासाठी संपूर्ण जिल्हाभर छापेमारी सुरू केली आहे.


पोलीस दलाचे प्रमुख जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणी व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा अशा यंत्रणेकडून शनिवारी पूर्ण दिवस जिल्हाभर या कारवाया करण्यात आल्या आहेत. संशयित आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल झाले असून अटक सत्र ही सुरू झाल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली.

Comments
Add Comment

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Nasik News: नामांकित शाळेत बॉम्ब असल्याचा धक्कादायक मेल, शाळा प्रशासनात खळबळ!

नाशिक: नाशिक शहरातील एका नामांकित शाळेला मध्यरात्री पावणे दोन वाजता थरकाप उडवणारा मेल प्राप्त झाला. या मेलमध्ये

अखेर Vantara आरोपमुक्त! न्यायालयातील विजयासह रिलायन्सकडून प्रतिकिया म्हणाले....' भारताच्या...

मोहित सोमण:आज अखेर रिलायन्स फाउंडेशनच्या 'वनतारा' या देशातील सर्वात मोठ्या प्राणी पुनर्वसन प्रकल्पाला (Rehabilitation Centre)

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

अरे बापरे ITR भरताना शेवटच्या दिवशीच वेबसाईट हँग? करदात्यांची तक्रार 'हे' उपाय करुन पहा

प्रतिनिधी:आज आयटीआर भरायचा शेवटचा दिवस आहे.सकाळपासूनच मात्र आयटीआर संकेतस्थळावरील करदात्यांना तांत्रिक