कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरुंचे निधन



मऊ : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचे अपघाती निधन झाले. ते मऊ कुशीनगर, उत्तरप्रदेश येथे जात असताना शनिवार २३ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी बदामी त्रिपाठी यांचेही निधन झाले. त्रिपाठी यांचा चालक वैभव मिश्रा गंभीर जखमी आहे, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रा. हरेराम त्रिपाठी हे भारतीय दर्शनशास्त्र, नव्यन्याय आणि न्यायशास्त्राचे विद्वान होते. होते. त्यांनी सात जून २०२३ रोजी कुलगुरुपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यांच्या काळात त्यांनी विद्यापीठासाठी ७० कोटी रुपयांचे अनुदान मिळवले. तसेच संशोधन प्रकल्प आणि कार्यशाळांसाठीही त्यांनी अनुदान मिळवले. त्यांच्या काळात वारंगा आंतरराष्ट्रीय परिसरातील डॉ. हेडगेवार शैक्षणिक भवनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते एक ऑगस्ट २०२५ रोजी झाले. याशिवाय संशोधन छात्रावास आणि डॉ. तोतडे सभागृह देखील त्यांच्या काळात पूर्ण झाले. त्यांनी कालच सहा प्राध्यापकांना पदोन्नतीचे पत्र दिले होते.

त्रिपाठी श्री लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यांनी संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरुपदही भूषवले होते. त्यांना भारत सरकारतर्फे महर्षी बादरायण राष्ट्रपती पुरस्कार, शांकर वेदान्त पुरस्कार आणि पाणिनी सन्मान असे अनेक पुरस्कार मिळाले होते. तसेच उत्तर प्रदेश संस्कृत संस्थेने त्यांना विशिष्ट सेवा पुरस्काराने सन्मानित केले होते.

 

 

Comments
Add Comment

स्मार्ट सिटीच्या धर्तीवर अयोध्येचा विकास

लखनऊ / अयोध्या : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा परिणाम म्हणून अयोध्येचा स्मार्ट सिटी

विधेयक मंजुरीसाठी राष्ट्रपती, राज्यपालांवर वेळेचं बंधन नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना राज्य किंवा केंद्र

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच जिल्हा परिषदांचा कार्यक्रम

आरक्षणासाठी निवडणूक आयोग पुन्हा लॉटरी काढण्याची शक्यता नवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

CM Nitish Kumar Bihar : CM नितीश कुमारांकडे फक्त २१ हजारांची रोख रक्कम! पाटण्यात नावावर घर नाही, तरीही नितीश कुमार यांची एकूण संपत्ती किती?

पाटणा : बिहारच्या राजकारणाला गेल्या दोन दशकांपासून एकच चेहरा व्यापून राहिला आहे, तो म्हणजे नितीश कुमार यांचा. ते

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे मोठे विधान! राज्यातील राजकारणावर चर्चांना उधाण

कर्नाटक: एकीकडे बिहारमध्ये आज नितीशकुमार यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर दुसरीकडे

शिक्षकांच्या मानसिक छळाला कंटाळून सांगलीच्या विद्यार्थ्याची मेट्रो स्टेशनवर उडी मारून आत्महत्या

दिल्ली : सांगली जिल्ह्यातील दहावीचा विद्यार्थी शौर्य प्रदीप पाटीलने शिक्षकांच्या सातत्यपूर्ण मानसिक छळाला