भारत-पाकिस्तानची हवाई क्षेत्रं २४ सप्टेंबरपर्यंत एकमेकांसाठी बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, दोन्ही देशांनी एकमेकांच्या विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र २४ सप्टेंबर २०२५ पर्यंत बंद ठेवले आहे. ही बंदी खासगी, व्यावसायिक तसेच लष्करी उड्डाणांवर देखील लागू आहे.


जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ हिंदू नागरिकांची जिहादी दहशतवाद्यांनी टार्गेट किलींग केल्यानंतर , भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर "ऑपरेशन सिंदूर" अंतर्गत कारवाई केली होती. त्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी विमानांसाठी भारतीय हवाई क्षेत्र बंद केले. ही बंदी सुरुवातीला २४ मेपर्यंत होती, मात्र नंतर ती महिन्यागणिक वाढवण्यात आली आहे. भारत सरकारने नव्याने जारी केलेल्या नोटीस टू एअरमॅन (एनओटीएएम) अनुसार, पाकिस्तानी नोंदणीकृत किंवा त्यांच्या एअरलाइन्स/ऑपरेटरद्वारे चालवली जाणारी कोणतीही उड्डाणे २३ सप्टेंबर रात्री ११.५९ वाजेपासून २४ सप्टेंबर सकाळी ५.३० वाजेपर्यंत भारतीय हवाई हद्दीत प्रवेश करू शकणार नाहीत.



दुसऱ्या बाजूला, पाकिस्ताननेही २० ऑगस्ट रोजी एनओटीएएम जारी करून भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र २४ सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.


परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना, भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही बाह्य मध्यस्थी स्वीकारली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या हवाई क्षेत्र बंदीमुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Andhra Pradesh Accident : आंध्र प्रदेशात खासगी ट्रॅव्हलची डंपरला जोरदार धडक; १३ जणांचा होरपळून मृत्यू

आंध्र प्रदेशातील मार्कापुरम जिल्ह्यात आज पहाटेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रायवरमजवळ एका खासगी

PM Narendra Modi : जगात मोदींचीच हवा! पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा बनले जगातील सर्वात लोकप्रिय नेते

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून समोर आले आहेत.

खराब जेवण देणं पडलं महागात, भारतीय रेल्वेने आकारला ६० लाख रुपयांचा दंड

मुंबई: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. निकृष्ट दर्जाचे अन्न

रशियाकडून ६ कोटी बॅरल तेल खरेदी, एप्रिल महिन्यात होणार पुरवठा

नवी दिल्ली : आखाती देशातील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तब्बल ६ कोटी बॅरल तेलाची खरेदी केली

देशामध्ये १०० नवीन विमानतळ, २०० हेलीपॅड उभारणार, केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत देशाच्या विमान वाहतूक, इमिग्रेशन आणि

देशभरात पेट्रोल-डिझेल, एलपीजीचा पुरवठा सुरळीत, सर्वपक्षीय बैठकीत सरकारची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली  : पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठकीचे