भारत-पाकिस्तानची हवाई क्षेत्रं २४ सप्टेंबरपर्यंत एकमेकांसाठी बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, दोन्ही देशांनी एकमेकांच्या विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र २४ सप्टेंबर २०२५ पर्यंत बंद ठेवले आहे. ही बंदी खासगी, व्यावसायिक तसेच लष्करी उड्डाणांवर देखील लागू आहे.


जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ हिंदू नागरिकांची जिहादी दहशतवाद्यांनी टार्गेट किलींग केल्यानंतर , भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर "ऑपरेशन सिंदूर" अंतर्गत कारवाई केली होती. त्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी विमानांसाठी भारतीय हवाई क्षेत्र बंद केले. ही बंदी सुरुवातीला २४ मेपर्यंत होती, मात्र नंतर ती महिन्यागणिक वाढवण्यात आली आहे. भारत सरकारने नव्याने जारी केलेल्या नोटीस टू एअरमॅन (एनओटीएएम) अनुसार, पाकिस्तानी नोंदणीकृत किंवा त्यांच्या एअरलाइन्स/ऑपरेटरद्वारे चालवली जाणारी कोणतीही उड्डाणे २३ सप्टेंबर रात्री ११.५९ वाजेपासून २४ सप्टेंबर सकाळी ५.३० वाजेपर्यंत भारतीय हवाई हद्दीत प्रवेश करू शकणार नाहीत.



दुसऱ्या बाजूला, पाकिस्ताननेही २० ऑगस्ट रोजी एनओटीएएम जारी करून भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र २४ सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.


परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना, भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही बाह्य मध्यस्थी स्वीकारली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या हवाई क्षेत्र बंदीमुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व