भारत-पाकिस्तानची हवाई क्षेत्रं २४ सप्टेंबरपर्यंत एकमेकांसाठी बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, दोन्ही देशांनी एकमेकांच्या विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र २४ सप्टेंबर २०२५ पर्यंत बंद ठेवले आहे. ही बंदी खासगी, व्यावसायिक तसेच लष्करी उड्डाणांवर देखील लागू आहे.


जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ हिंदू नागरिकांची जिहादी दहशतवाद्यांनी टार्गेट किलींग केल्यानंतर , भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर "ऑपरेशन सिंदूर" अंतर्गत कारवाई केली होती. त्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी विमानांसाठी भारतीय हवाई क्षेत्र बंद केले. ही बंदी सुरुवातीला २४ मेपर्यंत होती, मात्र नंतर ती महिन्यागणिक वाढवण्यात आली आहे. भारत सरकारने नव्याने जारी केलेल्या नोटीस टू एअरमॅन (एनओटीएएम) अनुसार, पाकिस्तानी नोंदणीकृत किंवा त्यांच्या एअरलाइन्स/ऑपरेटरद्वारे चालवली जाणारी कोणतीही उड्डाणे २३ सप्टेंबर रात्री ११.५९ वाजेपासून २४ सप्टेंबर सकाळी ५.३० वाजेपर्यंत भारतीय हवाई हद्दीत प्रवेश करू शकणार नाहीत.



दुसऱ्या बाजूला, पाकिस्ताननेही २० ऑगस्ट रोजी एनओटीएएम जारी करून भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र २४ सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.


परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना, भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही बाह्य मध्यस्थी स्वीकारली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या हवाई क्षेत्र बंदीमुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी