'गणेशोत्सवात किती पडणार पाऊस ? पावसाविषयी हवामान खात्याचा नवा अंदाज जाहीर


मुंबई : गणेशोत्सवात किती पाऊस पडणार ? या अनेकांना सतावत असलेल्या प्रश्नाचे उत्तर हवामान खात्याने दिले आहे. हवामान खात्याने ४ सप्टेंबर २०२५ पर्यंतचा राज्यातील प्रमुख जिल्ह्यांतील पावसाबाबतचा नवा अंदाज जाहीर झाला केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार गणेशोत्सवादरम्यान कोकण विभागात पावसाची शक्यता आहे.


उत्तर कोकण म्हणजे, मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये २८ ऑगस्टपर्यंत सरासरी २० ते ४० मिलीमीटर पाऊस दररोज पडण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये २८ ऑगस्टपर्यंत पावसाचे प्रमाण थोडे कमी असेल. त्यानंतर २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान संपूर्ण कोकण विभागात दररोज सरासरी २० ते ४० मिलीमीटर पावसाची शक्यता आहे.


प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार रायगड, रत्नागिरी येथे रविवार २४ ऑगस्ट ते मंगळवार २६ ऑगस्ट या कालावधीत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे या जिल्ह्यांमध्ये २६ ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो, तर पालघर जिल्ह्यात २६ ऑगस्टला काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. धुळे आणि जळगाव येथे नंदुरबार येथे २४ ऑगस्ट रोजी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. २५ ऑगस्टला धुळे, नंदुरबार आणि जळगाव या तीनही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. या कालावधीत वाऱ्यांचा वेग ३० ते ४० किलोमीटर प्रति तास असू शकेल. पुणे, कोल्हापूर आणि सातारा घाट परिसरात २६ ऑगस्टला काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.


नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, मुंबई ठाणे पालघरसह विदर्भ, खान्देशातील जिल्ह्यात २६ ते २८ ऑगस्टदरम्यान मध्यम पावसाची शक्यता आहे. रविवार, २४ ऑगस्ट रोजी 'मॅडन ज्युलिअन ऑस्सिलेशन' या घटकाच्या प्रवेशामुळे बंगालच्या उपसागरात हवेचे कमी दाब क्षेत्र निर्माण होऊन त्याचा वायव्य दिशेकडे प्रवास होईल. यामुळे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर उगम पावणाऱ्या नद्यांबरोबरच विदर्भ खान्देशांतील नद्यांच्या पात्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे.


Comments
Add Comment

Mantralaya Water : 'मंत्रालयातील पाणी पूर्णपणे सुरक्षित'; टाक्यांची स्वच्छता, वॉटर प्युरिफायर सर्व्हिसिंग पूर्ण, BMCचा अहवाल दिलासा देणारा

मुंबई : मंत्रालयातील पाणीपुरवठ्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनंतर सार्वजनिक बांधकाम

Monsoon Update : राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा; कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात अलर्ट

मुंबई(Mumbai) : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचे स्वरूप विस्कळीत राहिले होते. मात्र आता राज्यातील अनेक

Chandrashekar Bawankule : नायब तहसीलदार ते अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा

 महसूल विभागाच्या सेवा नियमांत ५० वर्षांनी बदल; मुख्यमंत्र्यांकडून प्रस्तावाला मान्यता मुंबई : महसूल

MIDC Maharashtra : वैभववाडी 'MIDC'ला मूर्त रूप, पायाभूत सुविधांची कामे तातडीने सुरू करण्याचे मंत्री उदय सामंतांचे निर्देश

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत मंत्रालयात बैठक मुंबई :

Mumbai Police : CJPच्या आंदोलनानंतर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; ८ पोलीस ठाण्यांत ९०० हून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील CJP आंदोलनानंतर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत शहरातील आठ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

NITI Aayog Investment Index : नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

५६.६ गुणांसह गुजरात पहिले; तामिळनाडूचा तिसरा क्रमांक मुंबई(Mumbai) : देशातील राज्यांमध्ये गुंतवणुकीला पोषक वातावरण,