पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे निवासी आयुक्त आर. विमला यांचे आवाहन

  27

नवी दिल्ली : महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ ‘मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियम येथे सुरू असलेल्या गणेशमूर्ती विक्री प्रदर्शनास निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला  यांनी भेट देऊन पाहणी केली.


‘गणेश उत्सव’ हा राज्य उत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे. राजधानी दिल्लीत मराठी तसेच मराठी भाषिक भाविकही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करीत असून महाराष्ट्र शासनाच्या लघुउद्योग विकास महामंडळाकडून दरवर्षी पर्यावरणपूरक अशा गणेश मूर्तींचे विक्री प्रदर्शन लावण्यात येते. ही  खुप समाधानाची बाब असल्याचे नमूद करून विमला यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.   शाडू मातीच्या गणेशमूर्तीमुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाते. निसर्गाशी आपली नाळ घट्ट राहावी यासाठी अशा उपक्रमांना प्रोत्साहन देणे अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले


आर. विमला यांनी ठाण्याचे मूर्तिकार मंदार सुर्यकांत शिंदे यांच्या कलाकृतींचे विशेष कौतुक करताना म्हटले, “या गणेशमूर्ती अतिशय आकर्षक, सुंदर आणि मनोहारी असून त्यातून परंपरा, कला आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम त्यांच्या सृजनशीलतेत दिसून येतो. ”त्याचप्रमाणे, “लालबागचा गणपती आणि पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतीकृती पाहून मन प्रसन्न झाले. अशा अप्रतिम कलाकृतींमुळे महाराष्ट्राची समृद्ध परंपरा आणि भक्तीभाव दिल्लीकरांना जवळून अनुभवता येतो,”  अशा भावना व्यक्त केल्या.


यावेळी शिंदे यांनी आर. विमला यांना ‘ श्री’ ची मूर्ती भेट देऊन स्वागत व सन्मान  केला. मूर्तिकार शिंदे यांच्या कलाकृतींसह अनेक नामवंत मूर्तिकारांच्या मूर्ती या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत.


‘मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममधील हे प्रदर्शन २७ ऑगस्टपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. येथे ६ इंचांपासून ते ३ फूट उंचीपर्यंतच्या सुमारे ५०० शाडू मातीच्या गणेशमूर्ती विक्रीसाठी उपलब्ध असून, त्यांची किंमत ६०० ते ३०,००० रुपयांपर्यंत आहे. सजावटीसाठी लागणारे साहित्यदेखील येथे मिळत आहे.


गेल्या तीस वर्षांपासून महाराष्ट्र एम्पोरियममध्ये गणेशमूर्ती विक्री प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. अधिक माहितीसाठी ०११-२३३६३३६६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आयोजकांनी सांगितले.

Comments
Add Comment

Online Gaming Regulation Bill 2025: ऑनलाइन गेमिंगवर अखेर बंदी; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर

नवी दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकारने ऑनलाइन मनी गेमिंगवर बंदी घालणारे विधेयक मांडले होते. लोकसभा आणि

जर पाकिस्तान अजूनही डंपर असेल तर ते त्यांचे अपयश आहे - राजनाथ सिंह

नवी दिल्ली : अलीकडेच आसिम मुनीर त्यांच्या विधानामुळे पाकिस्तानमध्येच नव्हे तर संपूर्ण

सायबर हल्लेखोरांच्या यादीत भारत जगात अव्वल

नवी दिल्ली: भारतासाठी एक अत्यंत चिंताजनक बाब समोर आली आहे. स्विस सायबर सुरक्षा फर्म 'अ‍ॅक्रोनिस'ने नुकत्याच

बिहार विधानसभा निवडणूक: मतदार यादीतील नावांसाठी आधार कार्ड आता वैध

नवी दिल्ली: बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विशेष मतदार पुनरावृत्ती (Special

भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय बदलला; नसबंदी करुन रेबीज नसल्यास सोडण्याचे आदेश!

नवी दिल्ली: भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने आपल्या ११ ऑगस्टच्या आधीच्या आदेशात बदल करत एक

Chhattisgarh News : देशभक्तीचा बळी! तिरंगा फडकवल्याने तरुणाची हत्या; नक्षलवाद्यांच्या क्रूरतेने गावात शोककळा, एकमेव शिक्षित तरुण ठार

छत्तीसगड : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या (Naxalite Attack) अमानुष कृत्यामुळे पुन्हा एकदा भीती आणि संतापाची लाट उसळली