मुंबई-गोवा महामार्गावर चालत्या एलपीजी टँकरमधून गॅस गळती

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास चरवेली-कापडगावदरम्यान जयगडवरून कर्नाटककडे जाणाऱ्या एलपीजी गॅस टँकरमधून अचानक गॅस गळती सुरू झाल्याने परिसरात काहीकाळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. महामार्गावरून धावणाऱ्या या टँकरची गळती मागून येणाऱ्या वाहनचालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चालकाला इशारा दिला.


चालकाने तत्काळ टँकर रस्त्यालगत थांबवला आणि सुमारे अर्ध्या तासानंतर आतील गॅसचा दाब कमी झाल्यावर गळती थांबली. या वेळी परिसरात गॅसचा तीव्र वास पसरला होता, मात्र सुदैवाने तेथे मानवी वस्ती नसल्याने मोठी दुर्घटना टळली.


मिळालेल्या माहितीनुसार, टँकरच्या टाकीतील एलपीजी गॅसचा दाब उष्णतेमुळे वाढल्याने गॅस ओव्हरफ्लो होऊन वरील पाइपमधून बाहेर येऊ लागला. घटनास्थळी कंपनीचे प्रतिनिधी दाखल झाले आणि त्यांनी उन्हामुळे टँकरचे तापमान वाढल्याने हा ओव्हरफ्लो झाल्याचे स्पष्ट केले.


त्यानंतर टँकरवर थंड पाणी टाकून तापमान कमी करण्यात आले आणि पुढील प्रवासास परवानगी देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र यादव, पाली पोलीस दूरक्षेत्राचे उपनिरीक्षक मोहन कांबळे तसेच महामार्ग पोलीस मदत केंद्र, हातखंब्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.


त्यांनी वाहतूक कोंडी टाळत सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या. सदर टँकरची गॅस वाहतूक क्षमता १२ टन असून त्यामध्ये जवळपास ११.७६ टन गॅस भरलेला होता. प्रवासादरम्यान उष्णतेमुळे तापमान वाढून झालेली ही गळती अत्यंत धोकादायक ठरू शकली असती. गळतीदरम्यान जर टँकरच्या संपर्कात कोणतीही ज्वलनशील वस्तू आली असती, तर भीषण स्फोट होऊन मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याची शक्यता होती.

Comments
Add Comment

Mumbai-Goa Highway Accident : उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक; दोन जणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर...

पोलादपूर: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. पोलादपूरजवळ झालेल्या या अपघातात दोन

Raigad Crime :मुंबईकर मुलीची माणगावमध्ये निर्घृण हत्या, मृतदेह जंगलात फेकला, परिसरात भीतीचं वातावरण

MANGAON : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात एका १५ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून

Konkan Railway Alert : मांडवी, तेजस, मत्स्यगंधासह अनेक गाड्यांच्या वेळेत १५ जूनपासून मोठे बदल...

Mumbai-Goa Trains : कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. पावसाळ्याचा विचार

सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचे नाव

 मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मुदतवाढ मुंबई : कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि देशाचे

जहाज बांधणी क्षेत्रात २०३० पर्यंत ४० हजार नोकऱ्या- मंत्री नितेश राणे

रत्नागिरी, रायगड आणि पालघरच्या किनाऱ्यावर उभे राहणार विशाल 'शिप बिल्डिंग' प्रकल्प मुंबई (सुहास शेलार) :

Kokan Railway News : कोकणवासियांसाठी खुशखबर! पावसाळ्यापूर्वी कोकण रेल्वेची मोठी तयारी, युद्धपातळीवर कामे सुरू

नवी मुंबई : कोकणवासियांसाठी आणि कोकण रेल्वे (Konkan Railway) मार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एक महत्त्वाची