सायबर हल्लेखोरांच्या यादीत भारत जगात अव्वल

नवी दिल्ली: भारतासाठी एक अत्यंत चिंताजनक बाब समोर आली आहे. स्विस सायबर सुरक्षा फर्म 'अ‍ॅक्रोनिस'ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, सायबर हल्ल्यांच्या यादीत भारताने ब्राझील आणि स्पेनला मागे टाकले असून, सायबर हल्लेखोरांचे भारत सर्वात मोठे लक्ष्य बनले आहे.


अहवालात दिलेल्या माहितीनुसार, २०२५ मध्ये भारतात सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषतः विंडोज ऑपरेटिंग सिस्टम वापरणाऱ्या उपकरणांवर होणाऱ्या मालवेअर हल्ल्यांचे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे. मे महिन्यात हे प्रमाण १२.४ टक्के होते, जे जूनमध्ये वाढून १३.२ टक्क्यांवर पोहोचले आहे. हा आकडा जगभरातील देशांपेक्षा जास्त आहे.



याशिवाय, अधिकृत ईमेलवर होणाऱ्या सायबर हल्ल्यांमध्येही वाढ झाली आहे. २०२४ च्या सुरुवातीला २० टक्के असलेले हे हल्ले २०२५ च्या पहिल्या सहामाहीत २५.६ टक्क्यांवर पोहोचले आहेत. सायबर गुन्हेगार आता क्रेडिट कार्ड आणि पासवर्डसारखी वैयक्तिक माहिती चोरण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) सारख्या अत्याधुनिक साधनांचा वापर करत आहेत.


अहवालात असेही म्हटले आहे की, जनरेटिव्ह एआयमुळे सायबर गुन्हेगारांसाठीचे तांत्रिक अडथळे कमी झाले आहेत. यामुळे फिशिंग ईमेल, बनावट इनव्हॉइस आणि अगदी डीपफेक स्कॅमही शोधणे अधिक कठीण झाले आहे. कोविड-१९ नंतरच्या 'हायब्रिड वर्क मॉडेल'मुळे अनेक कंपन्यांच्या सिस्टीम असुरक्षित बनल्या आहेत, असे 'अ‍ॅक्रोनिस'चे भारत आणि दक्षिण आशियाचे महाव्यवस्थापक राजेश छाब्रा यांनी सांगितले.


भारतातील उत्पादन, माहिती तंत्रज्ञान, सेवा आणि दूरसंचार उद्योग हे सायबर हल्ल्यांच्या सर्वात मोठ्या धोक्यात आहेत. मालवेअर हल्ल्यांद्वारे हॅकर्स डिव्हाइसचा ताबा घेतात. भारताच्या वाढत्या डिजिटल व्यवहारांमध्ये सायबर सुरक्षिततेकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

Comments
Add Comment

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र

Narendra Modi : 'सेमीकंडक्टरपासून अणुऊर्जेपर्यंत...'; जाणून घ्या पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला

Independence Day 2026 : तिरंगा, २१ तोफांची सलामी आणि ‘वंदे मातरम्’चा निनाद; लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाचा दिमाखदार सोहळा

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील ऐतिहासिक लाल

Independence Day 2026 : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त Google Doodleची खास कलाकृती; भारतीय वस्त्रकलेतून दिसली सांस्कृतिक विविधता

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त Google ने आपल्या होमपेजवर खास आणि रंगीबेरंगी Doodle सादर करून