Cyber Fraud: ६० कोटींची सायबर फसवणूक! ९४३ बँक खात्यांचा वापर, १२ आरोपींना ठोकल्या बेड्या

देशातील सर्वात मोठ्या सायबर फसवणुकीच्या रॅकेटपैकी एक घटना 


मुंबई: मुंबई पोलिसांनी एका मोठ्या सायबर फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे. या फसवणुकीमध्ये एका जोडप्यासह १२ जणांना अटक करण्यात आली आहे. यासाठी संबंधित आरोपींनी बँक खाती आणि सिम कार्ड खरेदी करून देशभरातील अनेक लोकांची फसवणूक केली आहे. ज्यामध्ये तब्बल  ६०.८२ कोटी रुपये लांपास केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या मते, आरोपींनी बँक खाती आणि सिम कार्ड खरेदी करून ही फसवणूक केली. सदर कारस्थानासाठी संबंधित आरोपींनी तब्बल ९४३ बँक खात्याचा वापर केल्याची माहिती सूत्रकडून मिळाली आहे. , त्यापैकी १८० खाती फसवणुकीसाठी वापरण्यात आली आहे. ही टोळी डिजिटल अरेस्ट आणि ऑनलाइन शॉपिंग फसवणुकीत  बिलंदर होती.


वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने १२ ऑगस्ट रोजी कांदिवली परिसरात छापा टाकला आणि पाच आरोपींना अटक केली. तपासात असे दिसून आले की या टोळीने आतापर्यंत ९४३ बँक खाती खरेदी केली आहेत, त्यापैकी १८० खाती फसवणुकीसाठी वापरली गेली. आरोपी ७ ते ८ हजार रुपयांना बँक खाती आणि सिम कार्ड खरेदी करायचे आणि नंतर डिजिटल अरेस्ट, ऑनलाइन शॉपिंग आणि शेअर ट्रेडिंग फसवणूक यासारख्या गुन्ह्यांमध्ये त्यांचा वापर करत असत.



महाराष्ट्रातच १०.५७ कोटी रुपयांची फसवणूक


या फसवणूकीच्या मुद्द्यावर बोलताना, मुंबई पोलिसांचे उपायुक्त राज तिलक रोशन म्हणाले की, ही टोळी गेल्या वर्षापासून देशभरातील लोकांना फसवण्यासाठी सक्रिय होती. आरोपींनी महाराष्ट्रातच १०.५७ कोटी रुपयांची फसवणूक केली, तर मुंबई शहरातच त्यांनी १.६७ कोटी रुपयांची सायबर फसवणूक केली. उर्वरित रक्कम इतर राज्यातील लोकांची फसवणूक करत हडप करण्यात आली.



१२ सायबर फसवणूक करणाऱ्यांना अटक


पोलिसांच्या तपासात असेही समोर आले आहे की टोळीतील काही आरोपी त्यांचे बँक खाती आणि सिम कार्ड विकून प्रचंड पैसे कमवत होते. टोळीचे नेते त्यांचा ऑनलाइन फसवणुकीत वापर करत होते. आतापर्यंत पोलिसांनी १२ जणांना अटक केली आहे आणि अनेक बँक खाती गोठवण्यात आली आहेत. पोलिसांचे म्हणणे आहे की हे देशातील सर्वात मोठ्या सायबर फसवणुकीच्या रॅकेटपैकी एक आहे आणि या नेटवर्कशी संबंधित आणखी लोकांचा शोध अद्याप सुरू आहे.

Comments
Add Comment

उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा

मुंबई : रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा शनिवार, २१ मार्च २०२६ रोजी दुपारी २

गिरगावच्या शोभायात्रेत स्वॅग दाखवणं व्हायरल गर्लला पडलं महागात; पोलिसांसह नागरिकही संतापले

गिरगावच्या शोभायात्रेत स्वॅग दाखवणं व्हायरल गर्लला पडलं महागात; पोलिसांसह नागरिकही संतापले मुंबईतील गिरगावसह

मिठीच्या सफाईची घाई; कंत्राटदारांच्या पाया पडणार की खात्यामार्फत करणार?

मुंबई: मुंबईतील २६ जुलैच्या महापुराला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीतील गाळाची सफाई करण्यासाठी आता कंपन्याच पुढे

Bomb Threat : मुंबई प्रेस क्लबला बॉम्बची धमकी; एका ईमेलमुळे खळबळ

- सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर मुंबई : मुंबईत एक धक्कादायक प्रकार समोर आला असून मुंबई प्रेस क्लबला (Mumbai Press Club) धमकीचा

मुंबई महापालिकेत विरोधकांची हवा गुल... काय आहे कारण जाणून घ्या

मुंबई: मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आली असली तरी उबाठा आणि काँग्रेसच्या रुपात सक्षम विरोधी पक्ष असतानाही

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र