Cyber Fraud: ६० कोटींची सायबर फसवणूक! ९४३ बँक खात्यांचा वापर, १२ आरोपींना ठोकल्या बेड्या

देशातील सर्वात मोठ्या सायबर फसवणुकीच्या रॅकेटपैकी एक घटना 


मुंबई: मुंबई पोलिसांनी एका मोठ्या सायबर फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे. या फसवणुकीमध्ये एका जोडप्यासह १२ जणांना अटक करण्यात आली आहे. यासाठी संबंधित आरोपींनी बँक खाती आणि सिम कार्ड खरेदी करून देशभरातील अनेक लोकांची फसवणूक केली आहे. ज्यामध्ये तब्बल  ६०.८२ कोटी रुपये लांपास केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या मते, आरोपींनी बँक खाती आणि सिम कार्ड खरेदी करून ही फसवणूक केली. सदर कारस्थानासाठी संबंधित आरोपींनी तब्बल ९४३ बँक खात्याचा वापर केल्याची माहिती सूत्रकडून मिळाली आहे. , त्यापैकी १८० खाती फसवणुकीसाठी वापरण्यात आली आहे. ही टोळी डिजिटल अरेस्ट आणि ऑनलाइन शॉपिंग फसवणुकीत  बिलंदर होती.


वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने १२ ऑगस्ट रोजी कांदिवली परिसरात छापा टाकला आणि पाच आरोपींना अटक केली. तपासात असे दिसून आले की या टोळीने आतापर्यंत ९४३ बँक खाती खरेदी केली आहेत, त्यापैकी १८० खाती फसवणुकीसाठी वापरली गेली. आरोपी ७ ते ८ हजार रुपयांना बँक खाती आणि सिम कार्ड खरेदी करायचे आणि नंतर डिजिटल अरेस्ट, ऑनलाइन शॉपिंग आणि शेअर ट्रेडिंग फसवणूक यासारख्या गुन्ह्यांमध्ये त्यांचा वापर करत असत.



महाराष्ट्रातच १०.५७ कोटी रुपयांची फसवणूक


या फसवणूकीच्या मुद्द्यावर बोलताना, मुंबई पोलिसांचे उपायुक्त राज तिलक रोशन म्हणाले की, ही टोळी गेल्या वर्षापासून देशभरातील लोकांना फसवण्यासाठी सक्रिय होती. आरोपींनी महाराष्ट्रातच १०.५७ कोटी रुपयांची फसवणूक केली, तर मुंबई शहरातच त्यांनी १.६७ कोटी रुपयांची सायबर फसवणूक केली. उर्वरित रक्कम इतर राज्यातील लोकांची फसवणूक करत हडप करण्यात आली.



१२ सायबर फसवणूक करणाऱ्यांना अटक


पोलिसांच्या तपासात असेही समोर आले आहे की टोळीतील काही आरोपी त्यांचे बँक खाती आणि सिम कार्ड विकून प्रचंड पैसे कमवत होते. टोळीचे नेते त्यांचा ऑनलाइन फसवणुकीत वापर करत होते. आतापर्यंत पोलिसांनी १२ जणांना अटक केली आहे आणि अनेक बँक खाती गोठवण्यात आली आहेत. पोलिसांचे म्हणणे आहे की हे देशातील सर्वात मोठ्या सायबर फसवणुकीच्या रॅकेटपैकी एक आहे आणि या नेटवर्कशी संबंधित आणखी लोकांचा शोध अद्याप सुरू आहे.

Comments
Add Comment

BMC : स्वच्छतेबाबत महापालिकेचा वॉर रुम; महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत स्वच्छतेसंदर्भातील कामकाज प्रभावीपणे होत असल्याच

Gargai Water Project : उबाठाला द्यायचे नाही मुंबईकरांना अतिरक्त पाणी; गारगाई पाणी प्रकल्पाला केला विरोध

- गारगाई पाणी प्रकल्पाला महापालिकेची मंजुरी, बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर मुंबई (विशेष

Metro-3 'Aqua Line' : मेट्रो-३ ‘अॅक्वा लाईन’चा प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार

मुंबई : मुंबईची नवी जीवनवाहिनी ठरणाऱ्या मेट्रो-३ म्हणजेच ‘अॅक्वा लाईन’ने मुंबईकर विद्यार्थी आणि पर्यटकांना एक

Reduce Plastic : तुमचा पहिला टूथब्रश आजही पृथ्वीवर कोठेतरी पडून आहे

प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक घटकाला योगदान द्यावे लागेल: राज्यपाल जिष्णु देव वर्मा देशात दरवर्षी

Green Asha Indian Ship : इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाज ‘ग्रीन आशा’ मुंबईत दाखल

- होर्मुझ पार करत १५ हजार टन एलपीजीचा पुरवठा मुंबई : इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्

Mumbai Local : आता बिनधास्त प्रवास करा, महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलानं सुरू केला 'हा' नवा उपक्रम

मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना आता घाबरण्याची गरज नाही कारण चर्चगेट ते डहाणू दरम्यान लोकलनं प्रवास