उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ट्विस्ट, मुख्यमंत्री फडणवीसांचा शरद पवारांना फोन

भाजपकडून एनडीएने उपराष्ट्रपती पदासाठी सी.पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे. राधाकृष्णन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून या निवडणुकीची सर्व जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवण्यात आली आहे.


याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांच्याशी संपर्क करून पाठिंब्याची मागणी केली मात्र या फडणवीसांच्या पाठिंब्याला पवारांनी नकार दर्शवला आहे. राष्ट्रवादी काँगेसची बैठक झाली आणि या बैठीकीनंतर शरद पवारांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.


यावेळी शरद पवार यांनी आमच्या बैठका झाल्या असून सुदर्शन यांचा फॉर्मही भरलं असं पवार यांनी स्पष्ट केला आहे. उपराष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी फडणवीसांनी मला फोन केला आणि राधाकृष्णन यांना पाठिंबा द्यावा अशी फडणवीसांनी मला विनंती केली आहे असंही शरद पवार यांनी म्हटलंय.


यावेळी शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना सी.पी. राधाकृष्णन हे आमच्या विचाराचे नाहीत असं म्हणत पवारांनी स्पष्ट नकार दिलाय. “उद्धव ठाकरे, शरद पवार यांना मी फोन केला. मी निवेदन केलं की, महाराष्ट्राचे राज्यपाल जे मुंबईचे मतदार आहेत, त्यांना उपराष्ट्रपतीपदाचं उमेदवार बनवलं आहे.


उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक पक्षीय नसते. त्या निवडणुकीसाठी व्हीप नसतो. महाराष्ट्राच्या अस्मितेला आपण मानता, त्यामुळे महाराष्ट्राचा एक मतदार या देशाचा उपराष्ट्रपती बनणार आहे. त्यांना समर्थन द्या अशी विनंती मी केली. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, सर्वांशी चर्चा करुन आम्ही निर्णय घेऊ. शरद पवार म्हणाले की, “विरोधी पक्षांनी एकत्र येऊन उमेदवार ठरवलाय, आम्ही त्याच्यासोबत जाऊ” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा