उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ट्विस्ट, मुख्यमंत्री फडणवीसांचा शरद पवारांना फोन

भाजपकडून एनडीएने उपराष्ट्रपती पदासाठी सी.पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे. राधाकृष्णन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून या निवडणुकीची सर्व जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवण्यात आली आहे.


याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांच्याशी संपर्क करून पाठिंब्याची मागणी केली मात्र या फडणवीसांच्या पाठिंब्याला पवारांनी नकार दर्शवला आहे. राष्ट्रवादी काँगेसची बैठक झाली आणि या बैठीकीनंतर शरद पवारांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.


यावेळी शरद पवार यांनी आमच्या बैठका झाल्या असून सुदर्शन यांचा फॉर्मही भरलं असं पवार यांनी स्पष्ट केला आहे. उपराष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी फडणवीसांनी मला फोन केला आणि राधाकृष्णन यांना पाठिंबा द्यावा अशी फडणवीसांनी मला विनंती केली आहे असंही शरद पवार यांनी म्हटलंय.


यावेळी शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना सी.पी. राधाकृष्णन हे आमच्या विचाराचे नाहीत असं म्हणत पवारांनी स्पष्ट नकार दिलाय. “उद्धव ठाकरे, शरद पवार यांना मी फोन केला. मी निवेदन केलं की, महाराष्ट्राचे राज्यपाल जे मुंबईचे मतदार आहेत, त्यांना उपराष्ट्रपतीपदाचं उमेदवार बनवलं आहे.


उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक पक्षीय नसते. त्या निवडणुकीसाठी व्हीप नसतो. महाराष्ट्राच्या अस्मितेला आपण मानता, त्यामुळे महाराष्ट्राचा एक मतदार या देशाचा उपराष्ट्रपती बनणार आहे. त्यांना समर्थन द्या अशी विनंती मी केली. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, सर्वांशी चर्चा करुन आम्ही निर्णय घेऊ. शरद पवार म्हणाले की, “विरोधी पक्षांनी एकत्र येऊन उमेदवार ठरवलाय, आम्ही त्याच्यासोबत जाऊ” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य