केळ्यांचा भाव घसरला; उत्पादकांना मोठा आर्थिक फटका

जळगाव: काही दिवसापूर्वी २ हजाराच्या वर गेलेला केळीचा भाव आता १२०० रूपयांपर्यंत घसरल्यामुळे केळी उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. केळीचे दर घसरल्यानंतर रावेर तालुक्यातील शेतकरी व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन केळी दरवाढीसंदर्भात बऱ्हाणपुरच्या जिल्हा प्रशासनाशी तातडीने चर्चा करावी, अशी अपेक्षा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.


खान्देशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर केळीचे उत्पादन होते. स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समित्या दररोज भाव जाहीर करत असल्या, तरी व्यापारी वर्ग मात्र मध्यप्रदेशातील बुरहानपूर बाजार समितीने जाहीर केलेल्या दरांना प्रमाण मानतात. इतकेच नव्हे तर देशभरातील व्यापारी देखील बऱ्हाणपूरच्या केळी भावावर लक्ष ठेवून असतात. त्यामुळे बऱ्हाणपूरमध्ये केळी भावात थोडासा चढ-उतार झाला तरी त्याचे पडसाद थेट देशभर उमटतात. याच परिस्थितीचा गैरफायदा घेत बऱ्हाणपूर बाजार समितीत केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताशी खेळ केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाव मनमानी पद्धतीने केव्हाही वाढविणे किंवा अचानक कमी करणे, असे व्यवहार तिथल्या यंत्रणेकडून सुरू असल्याने शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.


गेल्या दोन आठवड्यापूर्वी केळी दराला क्विंटलमागे २ हजाराहून अधिकच दर मिळत होता. मात्र आता केळीचे दर ७०० ते ८०० रूपयांनी घसरल्यानंतर शेतकऱ्यांना एका गाडीमागे (१५० क्विंटल) एक लाख रूपयांपेक्षा जास्त आर्थिक झळ बसली आहे. भाव वाढत असताना शेतकरी आणखी चांगल्या भावाच्या आशेने इतके दिवस केळीची कापणी करत नव्हते. मात्र, गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात भाव कमी झाल्यानंतर शेतकरी आता आणखी भाव कमी होण्याच्या भीतीने केळी कापणीसाठी घाई करू लागले आहेत. दरम्यान आता रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी व शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन केळी दरवाढीसंदर्भात बऱ्हाणपूर जिल्हाधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक आयोजित करण्याची मागणी केली. त्यानुसार लवकरच ही बैठक होणार असून, त्यावर केळीच्या दरासंदर्भात काही व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या साखळीवर निर्बंध आणण्यासाठी उपाययोजना हाती घेतल्या जाणार आहेत.

Comments
Add Comment

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद

हाकेंनी जरांगेंसमोर मांडला ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा प्रस्ताव, म्हणाले...

"पाटील, ९६ कुळी, क्षत्रिय तुम्ही राहिले नाहीत, तर मग आपल्यात ११ विवाह जाहीर करू": लक्ष्मण हाकेंचा टोला बीड: ओबीसी

पोलिसांनी १२ मुलांना भीक मागण्यापासून वाचवले

शिर्डी: साईबाबा मंदिराच्या धार्मिक स्थळांवर भीक मागण्यासाठी जबरदस्तीने लावलेल्या १२ मुलांना शिर्डी पोलिसांनी

शिर्डीत बाल हक्कांची पायमल्ली? पोलिसांचा कठोर इशारा!

अल्पवयीन मुलांकडून भिक्षा व विक्री करविणाऱ्या पालकांविरोधात गुन्हे दाखल शिर्डी : जगप्रसिद्ध साईबाबांच्या

बीडमध्ये पत्नीने केलेल्या मारहाणीत पतीचा मृत्यू

बीड : बीडच्या (Beed) अंबाजोगाईमध्ये (Ambajogai) पत्नीने केलेल्या मारहाणीत पतीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.