मुंबईकर झाले चिंतामुक्त, जलाशयांमध्ये पाण्याचा मुबलक साठा


मुंबई : मुंबईकरांची यंदाची पाण्याची चिंता दूर झाली आहे. कारण मागील तीन - चार दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांच्या पाणी पातळीत समाधानकारक अशी वाढ झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधून एकूण ९५.१२ टक्के पाणीसाठा झाला आहे. यामुळे कपातीविना किमान ३५८ दिवसांपर्यंत मुंबईकरांना पाणीपुरवठा करणे शक्य आहे.


भातसाची क्षमता ७,१७,०३७ दशलक्ष लिटर असून या जलाशयात ६,६८,२०१ दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा आहे. अप्पर वैतरणाची क्षमता २,२७,०४७ दशलक्ष लिटर असून या जलाशयात २,०७,७६० दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा आहे. मध्य वैतरणाची क्षमता १,९३,५३० दशलक्ष लिटर असून या जलाशयात १,९०,९९३ दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा आहे. मोडकसागरची क्षमता १,२८,९२५ दशलक्ष लिटर एवढी असून या जलाशयात १,२८,९२५ दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा आहे. तानसाची क्षमता १,४५,०८० दशलक्ष लिटर असून या जलाशयात १,४५,०८० दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा आहे. तुळशीची क्षमता ८०४६ दशलक्ष लिटर एवढी असून या जलाशयात ८०४६ दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा आहे. विहारची क्षमता २७,६९८ दशलक्ष लिटर असून या जलाशयात २७,६९८ दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा आहे.


मुंबईकरांना महापालिकेकडून दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. या नियोजनाचा विचार करता सध्या जलाशयांमध्ये समाधानकारक पाणीसाठा आहे. पुढील काही दिवसांत होणाऱ्या पावसामुळे या साठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईकर पाण्याच्या बाबतीत वर्षभरासाठी चिंतामुक्त झाले आहेत.


Comments
Add Comment

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या