बोईसर MIDC मध्ये वायू गळती, ४ कामगारांचा मृत्यू, तर अनेकांची प्रकृती चिंताजनक

पालघर: बोईसर तारापूर एमआयडीसीतील कारखान्यात वायुगळती झाल्याची घटना घडली आहे. या वायू गळतीमुळे ८ कामगारांना बाधा झाली असून, त्यामधील ४ कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर इतर कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, बोईसर तारापूर एमआयडीसीतील प्लॉट नंबर एफ १३ मधील मेडली फार्मासिटिकल्स लिमिटेड कंपनी दुपारच्या सुमारास वायुगळतीची दुर्घटना घडली. ज्यात सदर ठिकाणी काम करत असलेल्या ८ जणांना बाधा झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. कामगारांची प्रकृती बिघडल्यानंतर त्या सर्वांना तातडीने नजीकच्या शिंदे या खाजगी रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले. मात्र त्यांपैकी ४ कामगारांचा मृत्यू झाला. तसेच उर्वरित कामगारांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


यापूर्वीही बोईसर तारापूर एमआयडीसीत वायुगळतीची घटना घडलेली आहे. काही महिन्यांपूर्वी कॅम्लीन फाईन सायन्सेस लिमिटेड कंपनीत वायू गळती झाल्याने ११ कामगारांना त्याची बाधा झाली. कंपनीत डायमिथाईल सल्फेटची गळती झाल्याने कामगारांना डोळे चुरचुरणे आणि जळजळ होणे यांसारख्या समस्या जाणवल्या होत्या. त्यावेळी बाधित कामगारांना  तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र आज घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून, यात जीवितहानी झाल्याकारणामुळे, बोईसर तारापूर एमआयडीसीतील कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment

राज्यभरात आज दसरा मेळावे, शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे, नेस्कोमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे, तर बीडमध्ये पंकजा मुंडेंचा मेळावा

मुंबई : राज्यभरात आज विविध राजकीय नेत्यांचे दसरा मेळावे होत आहेत.  यंदा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि

८ ऑक्टोबरपासून राज्यातून मान्सून निरोप घेणार

मुंबई (प्रतिनिधी) : २९ सप्टेंबरपासून राज्यातील बहुतांश भागात हवामान स्थिर आहे. मात्र २ ते ७ ऑक्टोबर दरम्यान

सेंट झेवियरमधील भूमिगत पाण्याच्या साठवण टाकीचे नियोजन फसले

मुंबई (सचिन धानजी) : मुंबईतील सर्वात मोठे पुरप्रवण क्षेत्र म्हणून ओळखल्या जात असलेल्या हिंदमाता सिनेमा

अतिवृष्टी, पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ११ वी ऑनलाईन प्रवेशासाठी आणखी एक संधी

मुंबई : राज्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांसाठी इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश

कोस्टल रोड- मार्वे रोड जोडणाऱ्या मार्गावरील पुलांच्या बांधकामाला आता गती, मागवल्या तब्बल २२०० कोटी रुपयांच्या निविदा

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्प अर्थात कोस्टल रोड मार्वे रोडशी जोडणारे नवीन मार्ग आणि

राज्यातील पूरपरिस्थितीमुळे १० टक्के एसटी भाडेवाढीचा निर्णय रद्द

मुंबई : राज्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने केलेली १० टक्के दरवाढ रद्द