बोईसर MIDC मध्ये वायू गळती, ४ कामगारांचा मृत्यू, तर अनेकांची प्रकृती चिंताजनक

पालघर: बोईसर तारापूर एमआयडीसीतील कारखान्यात वायुगळती झाल्याची घटना घडली आहे. या वायू गळतीमुळे ८ कामगारांना बाधा झाली असून, त्यामधील ४ कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर इतर कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, बोईसर तारापूर एमआयडीसीतील प्लॉट नंबर एफ १३ मधील मेडली फार्मासिटिकल्स लिमिटेड कंपनी दुपारच्या सुमारास वायुगळतीची दुर्घटना घडली. ज्यात सदर ठिकाणी काम करत असलेल्या ८ जणांना बाधा झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. कामगारांची प्रकृती बिघडल्यानंतर त्या सर्वांना तातडीने नजीकच्या शिंदे या खाजगी रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले. मात्र त्यांपैकी ४ कामगारांचा मृत्यू झाला. तसेच उर्वरित कामगारांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


यापूर्वीही बोईसर तारापूर एमआयडीसीत वायुगळतीची घटना घडलेली आहे. काही महिन्यांपूर्वी कॅम्लीन फाईन सायन्सेस लिमिटेड कंपनीत वायू गळती झाल्याने ११ कामगारांना त्याची बाधा झाली. कंपनीत डायमिथाईल सल्फेटची गळती झाल्याने कामगारांना डोळे चुरचुरणे आणि जळजळ होणे यांसारख्या समस्या जाणवल्या होत्या. त्यावेळी बाधित कामगारांना  तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र आज घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून, यात जीवितहानी झाल्याकारणामुळे, बोईसर तारापूर एमआयडीसीतील कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment

शरद पवारांसाठी राज्यसभा सोडण्यास उबाठा गटाचा नकार

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासाठी राज्यसभा सोडण्यास उबाठा गटाने नकार दिल्यामुळे महाविकास आघाडीत संघर्ष

कृषी योजनांसाठी ८ महिन्यांत ३५ टक्के निधी खर्च; विधान परिषदेत दत्ता भरणे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत योजनांसाठी गेल्या आठ महिन्यांत एकूण ८०९८.४१ कोटी रुपयांची

बदलापूर प्रकरणाची विधान परिषदेत दखल; स्कूल बस नियमावलीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश

मुंबई : बदलापूर येथील एका शाळेत घडलेल्या विनयभंग प्रकरणाचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले असून, राज्य सरकारने

शेतकरी आणि मजुरांना बिबट्यांपासून मिळणार सुरक्षा; विधान परिषदेत सरकारचा मास्टर प्लॅन

मुंबई : राज्यात वाढलेला बिबट्यांचा वावर आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने अत्याधुनिक

एआय तंत्रज्ञानाने रोखणार वाघ-बिबट्यांचे हल्ले; प्रवीण दरेकरांच्या सूचनेवर सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्रप्रकल्पात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (AI) सहाय्याने राबवण्यात आलेला

महाराष्ट्रात मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर होणार कारवाई - शिक्षण मंत्री दादाजी भुसे

सर्व माध्यमे, सर्व भाषिक आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये मराठी बंधनकारक मुंबई : "महाराष्ट्रातील सर्व