मुंबई, कोकणनंतर आता पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ, पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली


मुंबई : मुंबई तसेच कोकणाला पावसाने झोडपल्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रात हा पाऊस धुमाकूळ घालत आहे. कोल्हापूर येथील पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. सध्याची पाण्याची पातळी ४२ फूट ८ इंट आहे. तसेच जिल्ह्यातील ७९ बंधारे हे पाण्याखाली गेले आहेत. यामुळे तेथे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.


गेल्या दोन दिवसांत पावसाने मुंबई, कोकणला चांगलेच झोडपले होते. या अतिमुसळधार पावसामुळे मुंबईचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. आता पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. कोल्हापुरात प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर पाणी आल्याने नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्यास सांगितले जात आहे.



पंढरपूरमध्ये पूरपरिस्थिती


दुसरीकडे उजनी आणि वीर या दोन्ही धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पंढरपूर शहरातही पूरस्थिती निर्माण झाली आहे. चंद्रभागा नदीचे पाणी पात्रात शिरल्याने जवळील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.



सांगली जिल्ह्यातही पावसाचा जोर


सांगली जिल्ह्यातही पावसाने जोर धरला आहे. तेथे पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी ४२ फुटांवर पोहोचली आहे.


Comments
Add Comment

Ashok Kharat : भोंदू खरातच्या कार्यालयात मिळाल्या महिलांच्या नावाने चेक आणि अंगठीच्या रिंगा

सिन्नर मध्ये रूपाली चाकणकरांनी घेतली कार्यकर्त्यांची बैठक नाशिक :  भोंदू बाबा अशोक खरात याच्या कार्यालयाची

Heatstroke : लातूर - उष्माघातामुळे बळींची संख्या ४ वर

लातूर :  निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. स्वतःच्या शेतात काम करत असताना ७५

Nashik : महापौर-उपमहापौरांकडून रस्ते व विकासकामांची पाहणी

नाशिक : नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील प्रलंबित आणि सुरू असलेल्या विकासकामांचा दर्जा व वेग तपासण्यासाठी आज

मोठी बातमी! खासदार बजरंग सोनवणेंच्या कारला बीडमध्ये भीषण अपघात

बीड : बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या

Sharad Pawar : अजित पवारांच्या मृत्यूनंतर पवार कुटुंब पहिल्यांदाच एकत्र

पुणे : अजित पवारांच्या मृत्यूवेळी पवार कुटुंब एकत्र आपल्याला पाहायला मिळाले होते, त्यानंतर अनेक राजकीय घटना

लग्नाला जाताना कुटुंबावर काळाचा घाला, तिघांचा जागीच मृत्यू, मृतांमध्ये ३ वर्षीय चिमुकलीचा समावेश

Amravati accident : अमरावती जिल्हातील वरूड-मोर्शी महामार्गावर रस्ते अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. खडका फाट्याजवळ