मुंबई, कोकणनंतर आता पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ, पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली


मुंबई : मुंबई तसेच कोकणाला पावसाने झोडपल्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रात हा पाऊस धुमाकूळ घालत आहे. कोल्हापूर येथील पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. सध्याची पाण्याची पातळी ४२ फूट ८ इंट आहे. तसेच जिल्ह्यातील ७९ बंधारे हे पाण्याखाली गेले आहेत. यामुळे तेथे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.


गेल्या दोन दिवसांत पावसाने मुंबई, कोकणला चांगलेच झोडपले होते. या अतिमुसळधार पावसामुळे मुंबईचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. आता पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. कोल्हापुरात प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर पाणी आल्याने नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्यास सांगितले जात आहे.



पंढरपूरमध्ये पूरपरिस्थिती


दुसरीकडे उजनी आणि वीर या दोन्ही धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पंढरपूर शहरातही पूरस्थिती निर्माण झाली आहे. चंद्रभागा नदीचे पाणी पात्रात शिरल्याने जवळील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.



सांगली जिल्ह्यातही पावसाचा जोर


सांगली जिल्ह्यातही पावसाने जोर धरला आहे. तेथे पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी ४२ फुटांवर पोहोचली आहे.


Comments
Add Comment

Sangli Crime : धक्कादायक! 30 लाखांच्या विम्यासाठी मेहुण्यानेच रचला कट; सांगलीतील खुनाचे गूढ उलगडले

सांगली : सांगली (Sangli) जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यात उघडकीस आलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने परिसरात खळबळ

Dimbhe Canal Drowning : डिंभे कालव्यात पोहण्याचा मोह जीवावर; १५ वर्षीय प्रज्वल चासकरचा बुडून दुर्दैवी अंत

MANCHAR PUNE: 'मला पोहता येते' असा आत्मविश्वास बाळगून डिंभे धरणाच्या (हुतात्मा बाबू गेनू जलाशय) डाव्या कालव्यात उडी

बीडमधील अजब प्रकार, अधिक महिन्याचं वाण थेट मांजराच्या पोटात

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील टाकरवण परिसरातील एका गावात अधिक मासानिमित्त घडलेल्या एका अनोख्या घटनेची सध्या जोरदार

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; खासगी ट्रॅव्हल्सची बस ट्रकवर आदळली, २५ प्रवासी जखमी

बुलढाणा : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात (Accident) झाला आहे. रविवारी मेहकर तालुक्यातील पिंपरी माळी गावाजवळ झालेल्या

Mumbai Goa National Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर अल्टो कार २५ फूट दरीत कोसळली; पाच जण गंभीर जखमी

Jalna Bribe Case : पार्टी सुरू व्हायच्या आधीच वाजले बारा! एसीबीने जालनाच्या तहसीलदारांच्या घरात टाकला छापा

जालना: जालना (Jalna) जिल्ह्यातील अंबड येथील तहसीलदार विजय चव्हाण यांना लाच (Bribe) स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक