राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती

वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी


मुंबई : राज्यात सप्टेंबरपासून १५ हजार ६३१ पोलीस शिपाई, चालक, सशस्त्र पोलीस शिपाई, बॅण्डस्मन व कारागृह शिपाई या पदांसाठी एकत्रित भरती राबविली जाणार आहे. सुरुवातीला मैदानी चाचणी होणार असून त्यात उत्तीर्ण झालेल्यांमधून एका पदासाठी १० उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरतील. अर्ज भरण्यास सप्टेंबरमध्ये सुरुवात होऊन ऑक्टोबरमध्ये मैदानी चाचणी होतील.


राज्याच्या गृह विभागाने १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ या काळातील रिक्त होणाऱ्या पोलिसांची पदे भरण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या पदभरतीसाठी राज्यभरातून १५ लाखांहून अधिक अर्ज येतील असा अंदाज आहे. दरम्यान, आता भरतीचा उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ‘प्रशिक्षण व खास पथके’चे अपर पोलीस महासंचालक एक सेवा पुरवठादार कंपनी निवड करणार आहेत. त्या माध्यमातून अर्ज स्वीकृती व अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांची यादी गृह विभागाला देईल. त्यानंतर मैदानी चाचणी सुरू होईल. पोलीस भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना एका पदासाठी एकच अर्ज करता येणार आहे.


पोलीस भरतीसाठीच्या जागा




  • पदनाम रिक्त पदे

  • पोलीस शिपाई १२,३९९

  • पोलीस शिपाई चालक २३४

  • बॅण्डस्मन २५

  • सशस्त्र पोलीस शिपाई २,३९३

  • कारागृह शिपाई ५८०

  • एकूण पदे १५,६३१


वयोमर्यादा संपलेल्यांना एक विशेष संधी


२०२२ व २०२३ मध्ये वयोमर्यादा संपलेल्या उमेदवारांना आगामी पोलीस भरतीसाठी एक विशेष संधी दिली जाणार आहे. ते उमेदवार देखील पोलीस भरतीसाठी अर्ज करू शकणार असल्याचे गृह विभागाच्या आदेशात नमूद आहे. दरम्यान, उमेदवारांना यंदा पोलीस भरतीसाठी अर्ज करताना खुल्या प्रवर्गासाठी ४५० रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३५० रुपये परीक्षा शुल्क असणार आहे. गतवर्षी हे शुल्क एक हजार रुपये होते.

Comments
Add Comment

Maharashtra Government : महाराष्ट्रात आता ‘ड्रोन’ आणि ‘रोबोटिक्स’ची क्रांती

राज्य सरकारकडून 'स्वयंचलित प्रणाली धोरण-२०२६' जाहीर; २५ हजार कोटींची गुंतवणूक, १ लाख रोजगारनिर्मिती

Kalyan Crime : कल्याणमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या दोन धक्कादायक घटना; आरोपी पती अटकेत

कल्याण: शहरात महिलांवरील अत्याचाराच्या दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. एका घटनेत कौटुंबिक वादातून पतीने

Weather Update : जुलैमध्ये पाऊस येणार ? अरबी समुद्रावरील मान्सूनचे ढग गायब

महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात उष्णतेमुळे नागरिक हैराण झालेत त्यात आता अरबी समुद्रामुळे मान्सूनचे ढग गायब झाले

Minister Adv. Shelar : कातळशिल्पांच्या वैज्ञानिक संवर्धनाला नवीन गती देण्यासाठी सामंजस्य करार

मुंबई: कोकणातील जागतिक महत्त्वाच्या कातळशिल्पांच्या वैज्ञानिक अभ्यास, डिजिटल दस्तऐवजीकरण आणि संवर्धनासाठी

Devendra Fadnavis : मुंबई मेट्रोमुळे दुग्धजन्य पदार्थांना मिळणार मोठी बाजारपेठ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; वारणा सहकारी दूध उत्पादक संघाच्या स्टॉलचे उद्घाटन मुंबई : ग्रामीण भागातील

Ashish Shelar : मुंबईत मीडिया हब उभारणार, डिजिटल कंटेंट क्षेत्राला नवी दिशा मिळणार

मुंबई: भारतातील माहितीपट, लघुपट, ॲनिमेशन आणि एआय-निर्मित (AI-generated) चित्रपटांसाठीचा प्रतिष्ठेचा १९ वा मुंबई