राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती

  14

वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी


मुंबई : राज्यात सप्टेंबरपासून १५ हजार ६३१ पोलीस शिपाई, चालक, सशस्त्र पोलीस शिपाई, बॅण्डस्मन व कारागृह शिपाई या पदांसाठी एकत्रित भरती राबविली जाणार आहे. सुरुवातीला मैदानी चाचणी होणार असून त्यात उत्तीर्ण झालेल्यांमधून एका पदासाठी १० उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरतील. अर्ज भरण्यास सप्टेंबरमध्ये सुरुवात होऊन ऑक्टोबरमध्ये मैदानी चाचणी होतील.


राज्याच्या गृह विभागाने १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ या काळातील रिक्त होणाऱ्या पोलिसांची पदे भरण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या पदभरतीसाठी राज्यभरातून १५ लाखांहून अधिक अर्ज येतील असा अंदाज आहे. दरम्यान, आता भरतीचा उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ‘प्रशिक्षण व खास पथके’चे अपर पोलीस महासंचालक एक सेवा पुरवठादार कंपनी निवड करणार आहेत. त्या माध्यमातून अर्ज स्वीकृती व अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांची यादी गृह विभागाला देईल. त्यानंतर मैदानी चाचणी सुरू होईल. पोलीस भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना एका पदासाठी एकच अर्ज करता येणार आहे.


पोलीस भरतीसाठीच्या जागा




  • पदनाम रिक्त पदे

  • पोलीस शिपाई १२,३९९

  • पोलीस शिपाई चालक २३४

  • बॅण्डस्मन २५

  • सशस्त्र पोलीस शिपाई २,३९३

  • कारागृह शिपाई ५८०

  • एकूण पदे १५,६३१


वयोमर्यादा संपलेल्यांना एक विशेष संधी


२०२२ व २०२३ मध्ये वयोमर्यादा संपलेल्या उमेदवारांना आगामी पोलीस भरतीसाठी एक विशेष संधी दिली जाणार आहे. ते उमेदवार देखील पोलीस भरतीसाठी अर्ज करू शकणार असल्याचे गृह विभागाच्या आदेशात नमूद आहे. दरम्यान, उमेदवारांना यंदा पोलीस भरतीसाठी अर्ज करताना खुल्या प्रवर्गासाठी ४५० रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३५० रुपये परीक्षा शुल्क असणार आहे. गतवर्षी हे शुल्क एक हजार रुपये होते.

Comments
Add Comment

रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन

मुंबई : रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारी महाराष्ट्राची हिरकणी संयुक्ता काळे हिची

Modak For Ganesh Chaturthi : गणपती बाप्पासाठी घरपोच मोदक! BMCची खास सेवा, लवकर करा ऑर्डर

मुंबई : गणेशोत्सव जवळ येत असताना संपूर्ण मुंबईत बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर

मुंबईकर झाले चिंतामुक्त, जलाशयांमध्ये पाण्याचा मुबलक साठा

मुंबई : मुंबईकरांची यंदाची पाण्याची चिंता दूर झाली आहे. कारण मागील तीन - चार दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे

सरकारी नोकरीतील १ हजार १८९ ‘लाडक्या बहिणी' संकटात

बोगस लाभार्थ्यांना वगळण्यासाठी महिला व बालकल्याणची विशेष पडताळणी मोहीम मुंबई : गरीब आणि गरजू महिलांना

‘वराह भगवान‘जयंती राज्यभरात साजरी व्हावी!

मंत्री नितेश राणेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी मुंबई: वराह देवाचे हिंदू धर्मात महत्त्वाचे स्थान आहे,

म्हाडाच्या एका घरासाठी तब्बल १९ अर्ज

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीला अर्जदारांचा चांगला प्रतिसाद मुंबई (प्रतिनिधी) : म्हाडा कोकण मंडळाच्या