राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती

वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी


मुंबई : राज्यात सप्टेंबरपासून १५ हजार ६३१ पोलीस शिपाई, चालक, सशस्त्र पोलीस शिपाई, बॅण्डस्मन व कारागृह शिपाई या पदांसाठी एकत्रित भरती राबविली जाणार आहे. सुरुवातीला मैदानी चाचणी होणार असून त्यात उत्तीर्ण झालेल्यांमधून एका पदासाठी १० उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरतील. अर्ज भरण्यास सप्टेंबरमध्ये सुरुवात होऊन ऑक्टोबरमध्ये मैदानी चाचणी होतील.


राज्याच्या गृह विभागाने १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ या काळातील रिक्त होणाऱ्या पोलिसांची पदे भरण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या पदभरतीसाठी राज्यभरातून १५ लाखांहून अधिक अर्ज येतील असा अंदाज आहे. दरम्यान, आता भरतीचा उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ‘प्रशिक्षण व खास पथके’चे अपर पोलीस महासंचालक एक सेवा पुरवठादार कंपनी निवड करणार आहेत. त्या माध्यमातून अर्ज स्वीकृती व अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांची यादी गृह विभागाला देईल. त्यानंतर मैदानी चाचणी सुरू होईल. पोलीस भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना एका पदासाठी एकच अर्ज करता येणार आहे.


पोलीस भरतीसाठीच्या जागा




  • पदनाम रिक्त पदे

  • पोलीस शिपाई १२,३९९

  • पोलीस शिपाई चालक २३४

  • बॅण्डस्मन २५

  • सशस्त्र पोलीस शिपाई २,३९३

  • कारागृह शिपाई ५८०

  • एकूण पदे १५,६३१


वयोमर्यादा संपलेल्यांना एक विशेष संधी


२०२२ व २०२३ मध्ये वयोमर्यादा संपलेल्या उमेदवारांना आगामी पोलीस भरतीसाठी एक विशेष संधी दिली जाणार आहे. ते उमेदवार देखील पोलीस भरतीसाठी अर्ज करू शकणार असल्याचे गृह विभागाच्या आदेशात नमूद आहे. दरम्यान, उमेदवारांना यंदा पोलीस भरतीसाठी अर्ज करताना खुल्या प्रवर्गासाठी ४५० रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३५० रुपये परीक्षा शुल्क असणार आहे. गतवर्षी हे शुल्क एक हजार रुपये होते.

Comments
Add Comment

मार्चच्या 'या' तारखेपासून बेस्ट बससेवेत बदल; काही मार्गांमध्ये फेरबदल तर काही ठिकाणी एसी सेवा

मुंबई : मुंबईकरांची सेवा करणारी बेस्ट बसच्या मार्गात आणि तिच्या फेऱ्यांमध्ये मुंबईकरांच्या सोयीनुसार परिवहन

1 March Rules Change : १ मार्चपासून बदलणार तुमच्या आयुष्याशी संबंधित 'हे' नियम; रेल्वे तिकीट बुकिंग पासून ते LPG सुद्धा...

येत्या १ मार्चपासून सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित अनेक महत्त्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत.

दोन वर्षांत दादर-पुणे हिरकणी बसच्या ७८ टक्के फेऱ्यांमध्ये घट…

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या दादर – पुणे मार्गावरील हिरकणी बसच्या फेऱ्यांमध्ये कमालीची घसरण झाली आहे. दोन

मुंबईत ७०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ?

उबाठाच्या प्रस्तावाला सत्ताधारी भाजप- शिवसेनेची मंजुरी मुंबई : मुंबईतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना

होळीसाठी मुंबई-रत्नागिरी दरम्यान ६ अतिरिक्त गाड्या

'दिवा-चिपळूण' गाडीच्या तारखेत बदल पनवेल-रत्नागिरी मार्गावर मेमू स्पेशल धावणार मुंबई : येत्या होळी सणानिमित्त

राज्य शासनाकडे पालिकेची ११ हजार कोटींची थकबाकी

वसुलीसाठी नेमलेली समिती कागदावरच? मुंबई : मुंबईतील राज्य शासनाच्या अखत्यारितील विविध कार्यालयांकडून सहाय्यक