कल्याणमध्ये ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी: ठाकरे गट आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का

कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिकेत आज मोठा राजकीय भूकंप झाला. शिवसेना (शिंदे गट) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. कल्याणमध्ये राबवलेले ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे.


कल्याण ग्रामीणचे तालुका प्रमुख मुकेश पाटील, प्रकाश म्हात्रे, ठाकरे गटाच्या नगरसेविका प्रेमा म्हात्रे आणि प्रमिला पाटील, संघर्ष समितीच्या नगरसेविका शैलजा भोईर, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कोळेगावचे सरपंच लालचंद भोईर, सरपंच सुनील भोईर आणि गुरुनाथ जाधव यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ठाण्यात झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याला आमदार राजेश मोरे, शिवसेना सचिव राम रेपाळे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे आदी उपस्थित होते.





यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. ते म्हणाले की, "मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी आमचे कौटुंबिक नाते आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात हे सर्वजण काम करतात." त्यांनी ठाकरे गटावरही जोरदार टीका केली. "विधानसभा निवडणुकीत जनतेने आम्हाला ८० पैकी ६० जागा जिंकवून दिल्या, जे आमचे विरोधक शक्य नाही म्हणत होते. ‘ब्रँडचा बँड वाजवण्याचे काम जनता करत असते," असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.


ईव्हीएमच्या मुद्द्यावरूनही शिंदे यांनी टीकास्त्र सोडले. "जेव्हा ते निवडणूक जिंकतात तेव्हा ईव्हीएम चांगला असतो आणि जेव्हा पराभव होतो, तेव्हा ईव्हीएम खराब असतो. मात्र, बेस्ट कर्मचारी पतपेढीची निवडणूक बॅलेट पेपरवर झाली होती," असे सांगत त्यांनी ठाकरे गटाची कोंडी केली.


"मागील अडीच वर्षांत आम्ही सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले. महायुतीच्या काळात आम्ही स्थगिती सरकारचे सर्व ‘स्पीडब्रेकर’ काढून टाकले, त्यामुळे जनतेने २३२ जागांचे ऐतिहासिक बहुमत दिले," असे शिंदे म्हणाले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती प्रचंड मताधिक्याने जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

विरोध डावलून सात वर्षांपूर्वीच बांधलेला उड्डाणपूल पाडण्यास बीएमसीची मंजूरी

मुंबई: बीएमसीने गोरेगावमधील वीर सावरकर (एमटीएनएल) उड्डाणपूल पाडण्यासाठी तत्त्वतः परवानगी दिली आहे. सात

खूशखबर! मुंबईतील तलावांमध्ये ९८ टक्के जलसाठा

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार, मुंबईला पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या तलावांमधील पाणी पातळी ९८

एलफिस्टन ब्रिज भागातील बाधित दोन इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन परिसरातील म्हाडाच्या उपलब्ध सदनिकांमध्ये होणार

मुंबई : येथील शिवडी-वरळी उन्नत मार्गामधील एलफिस्टन ब्रिज परिसरातील बाधित दोन इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन

राज्याच्या आर्थिक प्रगतीत उद्योग क्षेत्राचा वाटा मोठा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये गुंतवणूकदार आणि उद्योग क्षेत्राचा मोठा वाटा आहे. उद्योग क्षेत्राच्या व

Vastu Tips : पूजाघरात या चुका टाळा, अन्यथा घरात नांदेल गरिबी आणि समस्या!

मुंबई : प्रत्येक घरात पूजाघर किंवा देवघर हे एक पवित्र स्थान मानले जाते. या जागेतून घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि

जगातील पहिले महिला नौकायन अभियान मुंबईत सुरू

मुंबई: ११ सप्टेंबर २०२५ रोजी इतिहासाची नोंद झाली, जेव्हा जगातील पहिले त्रि-सेवा सर्व-महिला नौकायन अभियान, "समुद्र