लोकसभेत सादर झालेली ३ विधेयके काही मिनिटांत संयुक्त संसदीय समितीकडे


नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत बुधवार २० ऑगस्ट रोजी तीन महत्त्वाची विधेयके सादर केली. ही विधेयके सादर होताच विरोधकांनी सभागृहात प्रचंड घोषणाबाजी आणि गोंधळ सुरू केला. या गोंधळातच अवघ्या काही मिनिटांत ही तिन्ही विधेयके सयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय झाला.





भारतीय संविधानात १३० वी दुरुस्ती सुचविणारे विधेयक, केंद्रशासित प्रदेशांचे सरकार (दुरुस्ती) विधेयक आणि जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना दुरुस्ती विधेयक ही तीन विधेयके केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत सादर केली. ही विधेयके सादर होताच विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालून कामकाजात व्यत्यय आणला.


सरकारने विधेयक आणून सुचविलेल्या १३० व्या दुरुस्तीनुसार पाच वर्षांपेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा असलेल्या गुन्ह्यात अटक झालेल्या कोणत्याही मंत्र्याला (केंद्र किंवा राज्य) किमान ३० दिवस पोलीस किंवा न्यायालयीन कोठडीत राहिल्यास तत्काळ पदमुक्त केले जाईल. यासाठी कोणाच्याही स्वतंत्र शिफारशीची आवश्यकता नसेल. या विधेयकाला विरोधकांनी तीव्र विरोध केला. काही विरोधी खासदार अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेत आले. त्यांनी घोषणाबाजी केली. विधेयकाची सरकारी प्रत फाडली. काहींनी तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिशेने फाडलेले कागद फेकले. अमित शाह यांनी सरकार ही तिन्ही विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे सादर करण्याचा प्रस्ताव ठेवत आहे, असे म्हणत होते त्यावेळीही विरोधक गोंधळ घालत होते. विरोधकांचा भर कामकाज करण्याऐवजी सभागृहात गोंधळ घालण्याकडे असल्याचे चित्र यामुळे निर्माण झाले होते.


Comments
Add Comment

Jammu Kashmir Drug Case : पंजाबनंतर आता जम्मू-काश्मीर ड्रग्जचे नवे हॉटस्पॉट! १३ लाखांहून अधिक युवक ड्रग्जच्या आहारी

जम्मू काश्मीर : पंजाबनंतर आता जम्मू-काश्मीर अंमली पदार्थांच्या विळख्यात (Jammu Kashmir Drug Case) अडकत असल्याचे धक्कादायक

India Population : अधिक मुले जन्माला घाला, सरकारकडून मिळणार आर्थिक मदत; पण वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणार नवे प्रश्न

आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू (N. Chandrababu Naidu) यांनी राज्यातील घटता जन्मदर रोखण्यासाठी

Sasaram-Patna Passenger Train Catches Fire : सासाराम-पाटणा पॅसेंजरच्या डब्याला पहाटे भीषण आग, प्लॅटफॉर्मवर उडाली एकच धावपळ!

बिहार : बिहारमधील सासाराम जंक्शन रेल्वे स्थानकावर आज पहाटे एक मोठी दुर्घटना टळली. सासारामहून पाटण्याकडे

ICEYE भारतात उपग्रह उत्पादन सुरू करणार

नवी दिल्ली : अंतराळ-आधारित गुप्तचर क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी 'आय-साय' (ICEYE) पुढील एका वर्षात भारतात आपले

Fire : रतलामजवळ राजधानी एक्सप्रेसला आग

रतलाम : तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला (गाडी क्रमांक १२४३१) मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा