उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी भरला अर्ज


नवी दिल्ली : जगदीश धनखड यांनी तब्येतीच्या कारणास्तव राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी आज म्हणजेच बुधवार २० ऑगस्ट रोजी सकाळी उमेदवारी अर्ज भरला. सीपी राधाकृष्णन यांच्यासाठी २० जणांनी प्रस्तावक आणि २० जणांनी अनुमोदक म्हणून उमेदवारी अर्जावर सही केली आहे. प्रस्तावकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सही सर्वात आधी आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपाध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्यासह एनडीएतील निवडक घटक पक्षाच्या नेत्यांनीही प्रस्तावक म्हणून सीपी राधाकृष्णन यांच्या उमेदवारी अर्जावर सही केली आहे.





जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर देशात पुन्हा एकदा उपराष्ट्रपती निवडले जात आहेत. ही निवडणूक केवळ संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या म्हणजेच राज्यसभेच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाची नाही तर त्याचे निकाल येणाऱ्या वर्षांच्या संसदीय कामकाजावरही परिणाम करू शकते. उपराष्ट्रपती या पदासाठी संविधानाच्या कलम ६६ अंतर्गत निवडणूक होते. इलेक्टोरल कॉलेज म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभेतील निवडून आलेले आणि नामांकित सदस्यच मतदान करतात. या निवडणुकीत गुप्त पद्धतीने मतदान होते.


जिंकण्यासाठी उमेदवाराला एकूण वैध मतांपैकी ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवावी लागतात. उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. उपराष्ट्रपती हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च घटनात्मक पद आहे.


या निवडणुकीत एनडीएकडून सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सीपी राधाकृष्णन यांची निवड बिनविरोध व्हावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. मात्र विरोधात इंडी आघाडीने उमेदवार उभा केला तर निवडणूक होणार आहे. सध्या निवड बिनविरोध व्हावी यासाठी केंद्राच्यावतीने संरक्षणमंत्री राजनाथ सिंह विरोधी पक्षांशी संपर्क साधत आहेत. विरोधी पक्षाकडून बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र या उमेदवारीची घोषणा अद्याप झालेली नाही.


Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात