उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी भरला अर्ज


नवी दिल्ली : जगदीश धनखड यांनी तब्येतीच्या कारणास्तव राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी आज म्हणजेच बुधवार २० ऑगस्ट रोजी सकाळी उमेदवारी अर्ज भरला. सीपी राधाकृष्णन यांच्यासाठी २० जणांनी प्रस्तावक आणि २० जणांनी अनुमोदक म्हणून उमेदवारी अर्जावर सही केली आहे. प्रस्तावकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सही सर्वात आधी आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपाध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्यासह एनडीएतील निवडक घटक पक्षाच्या नेत्यांनीही प्रस्तावक म्हणून सीपी राधाकृष्णन यांच्या उमेदवारी अर्जावर सही केली आहे.





जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर देशात पुन्हा एकदा उपराष्ट्रपती निवडले जात आहेत. ही निवडणूक केवळ संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या म्हणजेच राज्यसभेच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाची नाही तर त्याचे निकाल येणाऱ्या वर्षांच्या संसदीय कामकाजावरही परिणाम करू शकते. उपराष्ट्रपती या पदासाठी संविधानाच्या कलम ६६ अंतर्गत निवडणूक होते. इलेक्टोरल कॉलेज म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभेतील निवडून आलेले आणि नामांकित सदस्यच मतदान करतात. या निवडणुकीत गुप्त पद्धतीने मतदान होते.


जिंकण्यासाठी उमेदवाराला एकूण वैध मतांपैकी ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवावी लागतात. उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. उपराष्ट्रपती हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च घटनात्मक पद आहे.


या निवडणुकीत एनडीएकडून सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सीपी राधाकृष्णन यांची निवड बिनविरोध व्हावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. मात्र विरोधात इंडी आघाडीने उमेदवार उभा केला तर निवडणूक होणार आहे. सध्या निवड बिनविरोध व्हावी यासाठी केंद्राच्यावतीने संरक्षणमंत्री राजनाथ सिंह विरोधी पक्षांशी संपर्क साधत आहेत. विरोधी पक्षाकडून बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र या उमेदवारीची घोषणा अद्याप झालेली नाही.


Comments
Add Comment

Shreyansh Patel : बुद्धीबळाच्या पटावर अडीच वर्षांच्या चिमुरड्याची 'शह-मात'! श्रेयांश पटेलने रचला विश्वविक्रम

हैदराबाद : बुद्धीबळ म्हणजे संयम आणि तल्लख बुद्धिमत्तेचा खेळ. जिथे मोठ्यांनाही विचार करावा लागतो, तिथे एका अवघ्या

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; १३ एप्रिलला बैठक, वेतन आणि निवृत्तीवेतनावर अंतिम निर्णय होणार

नवी दिल्ली: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसंदर्भात लवकरच एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रीय

TRP of News Channels : वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर केंद्राकडून पुन्हा लगाम! वृत्तवाहिन्यांवरील बंदी आणखी काही आठवड्यांसाठी वाढवली

केंद्र सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांचे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) आणखी चार आठवड्यांसाठी निलंबित

Anant Ambani: अनंत अंबानींनी दिली मोठी देणगी; केरळमधील दोन मंदिरांना ६ कोटी रुपये

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी केरळमधील दोन प्रमुख धार्मिक

Manipur on edge : मणिपूरमध्ये रॉकेट हल्ल्यात दोन चिमुरड्यांचा मृत्यू; संतप्त जमावाचा सुरक्षा दलांवर हल्ला, बिष्णुपूरमध्ये तणाव

इंफाळ : मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केले आहे. बिष्णुपूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे

Amaravati Capital : 'अमरावती' आता आंध्र प्रदेशची 'कायमस्वरूपी' राजधानी; केंद्राचे गॅझेट नोटिफिकेशन जारी!

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) राजधानीबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर केंद्र सरकारने