उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी भरला अर्ज


नवी दिल्ली : जगदीश धनखड यांनी तब्येतीच्या कारणास्तव राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी आज म्हणजेच बुधवार २० ऑगस्ट रोजी सकाळी उमेदवारी अर्ज भरला. सीपी राधाकृष्णन यांच्यासाठी २० जणांनी प्रस्तावक आणि २० जणांनी अनुमोदक म्हणून उमेदवारी अर्जावर सही केली आहे. प्रस्तावकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सही सर्वात आधी आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपाध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्यासह एनडीएतील निवडक घटक पक्षाच्या नेत्यांनीही प्रस्तावक म्हणून सीपी राधाकृष्णन यांच्या उमेदवारी अर्जावर सही केली आहे.





जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर देशात पुन्हा एकदा उपराष्ट्रपती निवडले जात आहेत. ही निवडणूक केवळ संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या म्हणजेच राज्यसभेच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाची नाही तर त्याचे निकाल येणाऱ्या वर्षांच्या संसदीय कामकाजावरही परिणाम करू शकते. उपराष्ट्रपती या पदासाठी संविधानाच्या कलम ६६ अंतर्गत निवडणूक होते. इलेक्टोरल कॉलेज म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभेतील निवडून आलेले आणि नामांकित सदस्यच मतदान करतात. या निवडणुकीत गुप्त पद्धतीने मतदान होते.


जिंकण्यासाठी उमेदवाराला एकूण वैध मतांपैकी ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवावी लागतात. उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. उपराष्ट्रपती हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च घटनात्मक पद आहे.


या निवडणुकीत एनडीएकडून सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सीपी राधाकृष्णन यांची निवड बिनविरोध व्हावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. मात्र विरोधात इंडी आघाडीने उमेदवार उभा केला तर निवडणूक होणार आहे. सध्या निवड बिनविरोध व्हावी यासाठी केंद्राच्यावतीने संरक्षणमंत्री राजनाथ सिंह विरोधी पक्षांशी संपर्क साधत आहेत. विरोधी पक्षाकडून बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र या उमेदवारीची घोषणा अद्याप झालेली नाही.


Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला