उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी भरला अर्ज


नवी दिल्ली : जगदीश धनखड यांनी तब्येतीच्या कारणास्तव राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी आज म्हणजेच बुधवार २० ऑगस्ट रोजी सकाळी उमेदवारी अर्ज भरला. सीपी राधाकृष्णन यांच्यासाठी २० जणांनी प्रस्तावक आणि २० जणांनी अनुमोदक म्हणून उमेदवारी अर्जावर सही केली आहे. प्रस्तावकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सही सर्वात आधी आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपाध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्यासह एनडीएतील निवडक घटक पक्षाच्या नेत्यांनीही प्रस्तावक म्हणून सीपी राधाकृष्णन यांच्या उमेदवारी अर्जावर सही केली आहे.





जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर देशात पुन्हा एकदा उपराष्ट्रपती निवडले जात आहेत. ही निवडणूक केवळ संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या म्हणजेच राज्यसभेच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाची नाही तर त्याचे निकाल येणाऱ्या वर्षांच्या संसदीय कामकाजावरही परिणाम करू शकते. उपराष्ट्रपती या पदासाठी संविधानाच्या कलम ६६ अंतर्गत निवडणूक होते. इलेक्टोरल कॉलेज म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभेतील निवडून आलेले आणि नामांकित सदस्यच मतदान करतात. या निवडणुकीत गुप्त पद्धतीने मतदान होते.


जिंकण्यासाठी उमेदवाराला एकूण वैध मतांपैकी ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवावी लागतात. उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. उपराष्ट्रपती हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च घटनात्मक पद आहे.


या निवडणुकीत एनडीएकडून सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सीपी राधाकृष्णन यांची निवड बिनविरोध व्हावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. मात्र विरोधात इंडी आघाडीने उमेदवार उभा केला तर निवडणूक होणार आहे. सध्या निवड बिनविरोध व्हावी यासाठी केंद्राच्यावतीने संरक्षणमंत्री राजनाथ सिंह विरोधी पक्षांशी संपर्क साधत आहेत. विरोधी पक्षाकडून बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र या उमेदवारीची घोषणा अद्याप झालेली नाही.


Comments
Add Comment

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या