Mumbai Rain Local Train : मुंबईच्या लाईफलाईनची महत्वाची अपडेट; तिनही मार्गावरील रेल्वेच्या गाड्या किती मिनिटांनी लेट? जाणून घ्या

मुंबई : मुंबईसह उपनगरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईत मागील २४ तासांत अतिवृष्टीची नोंद झाली असून, शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर आणि रत्नागिरीसाठी आज रेड अलर्ट जारी केला आहे. गेल्या ४८ तासांपासून एमएमआरसाठी सतत रेड अलर्ट होता आणि मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील तीन तासांसाठीही अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




मुंबईत मुसळधार पावसाचा तिसरा दिवस; लोकल सेवा अजून विस्कळीत


मुंबई उपनगरात सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू होता. काही भागांसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे, तर दुपारी अनेक भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज होता. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईची लाईफलाइन असलेली लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. आज तिसऱ्या दिवशीही लोकल सेवा सुरळीत होऊ शकलेली नाही, परिणामी प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाचा जोर थोडा ओसरला आहे, तरीही लोकल वाहतुकीवर परिणाम कायम आहे.



सध्याची मुंबई लोकलची काय स्थिती?


मुंबईत मुसळधार पावसामुळे शहराची लाईफलाइन असलेली लोकल सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली होती. आज पावसाचा जोर थोडा ओसरला असला तरी, मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा अजूनही विस्कळीतच आहे. प्रवाशांना तिन्ही मार्गांवर अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे जनजीवनावर मोठा परिणाम दिसून येत आहे.




पश्चिम रेल्वे गाड्या रद्द, सेवा १०–१५ मिनिटं उशिरानं सुरू


मुंबईत मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या अप आणि डाऊन मार्गावरील १७ लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पहाटे ३.४० ते ५.३१ दरम्यानच्या गाड्या रद्द केल्या गेल्या, ज्यात चर्चगेटकडे जाणाऱ्या सहा आणि विरारकडे जाणाऱ्या चार गाड्या आहेत. सध्या पश्चिम रेल्वे लाईनवरची लोकल सेवा १० ते १५ मिनिटे उशिरानं सुरू होत आहे, कारण रुळांवर पाणी साचल्यामुळे प्रवासावर अडथळा निर्माण झाला आहे.




मुंबई लोकल: मध्य रेल्वे २०-२५, हार्बर १५-२०मिनिटं उशिरानं सुरू


मुंबईत दोन दिवस मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. अजूनही मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे पूर्ववत झालेली नाही; सध्या गाड्या २० ते २५ मिनिटे उशिरानं धावत आहेत. तर हार्बर रेल्वे १५ ते २० मिनिटे उशिरानं सुरू आहे. मुसळधार पावसामुळे रुळांवर पाणी साचल्याने प्रवाशांना विलंबाचा सामना करावा लागत आहे.

Comments
Add Comment

“जो जीता वही सिकंदर” शरद पवारांच्या बिनबुडाच्या आरोपानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार!

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होताच राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचं चित्र समोर

मुंबई महापालिकेच्या १० कंत्राटी समुदाय संघटकांनी दिला राजीनामा

नव्याने कंत्राटी भरती करण्याऐवजी ५५ संघटकांना पुन्हा ११ महिन्यांची मुदत दिली वाढवून मुंबई (खास

भांडुपमध्ये मनसे गळाला लावणार तीन प्रभाग

खासदार कन्येला कुठल्या प्रभागात स्थान भाजपाच्या गडात की मनसेच्या वाट्याला जाणाऱ्या प्रभागात मुंबई (सचिन

Maharashtra Weather Updates : स्वेटर बाहेर काढा! वीकेंडला मुंबईकर गारठणार, पारा घसरला; थंडीचा जोर वाढल्याने 'हुडहुडी' भरणार, कसं असेल राज्याचं हवामान?

मुंबई : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्याच्या अनेक भागांत झालेल्या पावसानंतर, आता महाराष्ट्रासह संपूर्ण

बांगलादेशी, रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई कडक करा: मंगलप्रभात लोढा यांची मागणी

मुंबई : एकीकडे मालाड आणि मालवणी परिसरात बांग्लादेशी आणि रोहिंगे घुसखोर राहत असल्याचे निदर्शनाला येत असतानाच

मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, तुमच्या मार्गावरही आहे का?

मुंबई: मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवांचा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी रविवारी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. १६