Mumbai Rain Local Train : मुंबईच्या लाईफलाईनची महत्वाची अपडेट; तिनही मार्गावरील रेल्वेच्या गाड्या किती मिनिटांनी लेट? जाणून घ्या

मुंबई : मुंबईसह उपनगरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईत मागील २४ तासांत अतिवृष्टीची नोंद झाली असून, शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर आणि रत्नागिरीसाठी आज रेड अलर्ट जारी केला आहे. गेल्या ४८ तासांपासून एमएमआरसाठी सतत रेड अलर्ट होता आणि मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील तीन तासांसाठीही अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




मुंबईत मुसळधार पावसाचा तिसरा दिवस; लोकल सेवा अजून विस्कळीत


मुंबई उपनगरात सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू होता. काही भागांसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे, तर दुपारी अनेक भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज होता. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईची लाईफलाइन असलेली लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. आज तिसऱ्या दिवशीही लोकल सेवा सुरळीत होऊ शकलेली नाही, परिणामी प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाचा जोर थोडा ओसरला आहे, तरीही लोकल वाहतुकीवर परिणाम कायम आहे.



सध्याची मुंबई लोकलची काय स्थिती?


मुंबईत मुसळधार पावसामुळे शहराची लाईफलाइन असलेली लोकल सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली होती. आज पावसाचा जोर थोडा ओसरला असला तरी, मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा अजूनही विस्कळीतच आहे. प्रवाशांना तिन्ही मार्गांवर अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे जनजीवनावर मोठा परिणाम दिसून येत आहे.




पश्चिम रेल्वे गाड्या रद्द, सेवा १०–१५ मिनिटं उशिरानं सुरू


मुंबईत मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या अप आणि डाऊन मार्गावरील १७ लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पहाटे ३.४० ते ५.३१ दरम्यानच्या गाड्या रद्द केल्या गेल्या, ज्यात चर्चगेटकडे जाणाऱ्या सहा आणि विरारकडे जाणाऱ्या चार गाड्या आहेत. सध्या पश्चिम रेल्वे लाईनवरची लोकल सेवा १० ते १५ मिनिटे उशिरानं सुरू होत आहे, कारण रुळांवर पाणी साचल्यामुळे प्रवासावर अडथळा निर्माण झाला आहे.




मुंबई लोकल: मध्य रेल्वे २०-२५, हार्बर १५-२०मिनिटं उशिरानं सुरू


मुंबईत दोन दिवस मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. अजूनही मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे पूर्ववत झालेली नाही; सध्या गाड्या २० ते २५ मिनिटे उशिरानं धावत आहेत. तर हार्बर रेल्वे १५ ते २० मिनिटे उशिरानं सुरू आहे. मुसळधार पावसामुळे रुळांवर पाणी साचल्याने प्रवाशांना विलंबाचा सामना करावा लागत आहे.

Comments
Add Comment

मुंबईतील कचरा खासगीकरणाच्या निविदेला विलंब

खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबई महापालिकेच्या सफाई खात्याच्यावतीने कचरा उचलण्यासाठी वाहनांसह मनुष्यबळ

दुर्गंधी पसरत नाही की कचरा दिसत नाही, मुंबईतल्या अनोख्या कचरापेट्या

सचिन धानजी, मुंबई : मुंबईत आज कुणालाच आपल्या घरासमोर कचरा नको असतो. तसेच सार्वजनिक कचरा पेट्या असल्यास त्या

मुंबईत साथीच्या आजारांचे वाढले प्रमाण

मुंबई : गेल्या पंधरावड्यात साथीच्या आजारांनी पुन्हा डोके वर काढले. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात

'आपली एसटी' ॲपद्वारे कळणार लालपरीचा ठावठिकाणा - प्रताप सरनाईक

मुंबई : प्रत्येक थांब्यावर एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना एसटीचा अचुक ठावठीकाणा काळावा

नवी मुंबई विमानतळामुळे महामार्गावर 'ट्रॅफिक कोंडी'चा धोका!

विमानतळासाठी वाहतूक 'वळवणार'; पाम बीच रोडवरील गर्दी टाळण्यासाठी 'सिक्रेट प्लॅन' लागू नवी मुंबई: नवी मुंबई

तब्बल १५ वर्षांपासून महिला होती त्रस्त, महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी कायमची केली त्रासातून मुक्तता ..

मुंबई (खास प्रतिनिधी) : रजोनिवृत्तीनंतरच्या रक्तस्त्रावाच्या समस्येमुळे त्रस्त असलेल्य ६५ वर्षीय महिलेवर