आळंदीत इंद्रायणीला पूर, जुना पूल आणि घाटावर जाण्यास बंदी


आळंदी : मुसळधार पावसामुळे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीतील इंद्रायणी नदीला पूर आला आहे. मंदिराच्या दिशेने जाणारा भक्ती-सोपान पूल आणि दर्शन बारीचा पूल पाण्याखाली गेले आहेत. पाण्याचा प्रवाह वाढतच चालला आहे, नदी पात्र सोडून वाहू लागली आहे. पुढचा संभाव्य धोका पाहता जुना पूल आणि इंद्रायणीच्या घाटावर भाविकांना बंदी घालण्यात आली आहे.


पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नदीचे पाणी घाटावर आले आहे तसेच मंदिराच्या परिसरात शिरले आहे. मंदिरात जात असलेल्या भाविकांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


पिंपरी चिंचवडमध्ये पवना नदीकिनारी असलेले केजुबाई मंदिर पाण्याखाली गेले आहे. पवना धरणातून पंधरा हजार सातशे मिलिमीटर पाण्याचा विसर्ग पवना नदीत सुरू आहे. पवनेचे पाणी चिंचवडचे ग्रामदैवत असलेल्या मोरया गणपतीच्या भेटीला आले आहे.


Comments
Add Comment

परतीच्या पावसाने भात कापणी उद्ध्वस्त

रायगड : रायगड जिल्ह्यासह कोकणात सध्या भात कापणीचा हंगाम सुरू असतानाच परतीच्या पावसाने बळीराजाचे हाल केले आहेत.

कल्याणमध्ये धुंवाधार पाऊस, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, दिवाळीच्या उत्साहावर पाणी, वीज गायब!

ठाणे: ऐन दिवाळीच्या धामधुमीत, मंगळवारी (२१ ऑक्टोबर २०२५) कल्याण शहरात हवामानाने अचानक रूप बदलले आणि जोरदार

संगमनेरमध्ये ९५०० बोगस मतदारांची नोंद!

बाळासाहेब थोरात यांचा खळबळजनक आरोप संगमनेर : संगमनेर विधानसभा निवडणुकीत साडे नऊ हजार बोगस मतदारांची नोंद झाली

सलग आगीच्या घटनांनी खळबळ! नवी मुंबई व पनवेलकर चिंतेत

रायगड : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई व पनवेल परिसरात सलग लागलेल्या दोन आगीच्या घटनांनी नागरिकांमध्ये

राजगडची उमराटकर वस्ती उजळली; तब्बल ७८ वर्षांनी वीज मिळाली

पुणे : राजगडच्या दुर्गम वस्त्यांमध्ये तब्बल ७८ वर्षांनी वीज आली आहे. उमराटकर-मोरे वस्तीला जणू काही दिवाळी भेट

Maharashtra Weather Update : यंदाची दिवाळी पावसातचं? राज्यभर पुढील ४ दिवस वादळी पावसाचे थैमान; IMD चा 'हा' इशारा वाचून घ्या.

मुंबई : देशभरातून नैऋत्य मोसमी पावसाने (Southwest Monsoon) माघार घेतल्यामुळे दिलासा मिळाला असतानाच, आता महाराष्ट्रावर