आळंदीत इंद्रायणीला पूर, जुना पूल आणि घाटावर जाण्यास बंदी


आळंदी : मुसळधार पावसामुळे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीतील इंद्रायणी नदीला पूर आला आहे. मंदिराच्या दिशेने जाणारा भक्ती-सोपान पूल आणि दर्शन बारीचा पूल पाण्याखाली गेले आहेत. पाण्याचा प्रवाह वाढतच चालला आहे, नदी पात्र सोडून वाहू लागली आहे. पुढचा संभाव्य धोका पाहता जुना पूल आणि इंद्रायणीच्या घाटावर भाविकांना बंदी घालण्यात आली आहे.


पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नदीचे पाणी घाटावर आले आहे तसेच मंदिराच्या परिसरात शिरले आहे. मंदिरात जात असलेल्या भाविकांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


पिंपरी चिंचवडमध्ये पवना नदीकिनारी असलेले केजुबाई मंदिर पाण्याखाली गेले आहे. पवना धरणातून पंधरा हजार सातशे मिलिमीटर पाण्याचा विसर्ग पवना नदीत सुरू आहे. पवनेचे पाणी चिंचवडचे ग्रामदैवत असलेल्या मोरया गणपतीच्या भेटीला आले आहे.


Comments
Add Comment

समृद्धी महामार्गावरील निष्काळजीपणानंतर खिळे काढले, वाहतूक पुन्हा सुरळीत

पुणे: नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग हा पुन्हा चर्चेत आला आहे. या महामार्गावर सतत वेगवेगळ्या कारणांमुळे अपघात

बंजारा समाजाचा धडक मोर्चा; मराठा समाजाप्रमाणे बंजारा समाजालाही हैदराबाद गॅझेट लागू करा

सोलापूर : बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून त्यांना अनुसूचित जमाती (एसटी) मधून आरक्षण द्यावे, अशी मागणी

भावी पिढीला प्रदूषणमुक्त पर्यावरण देण्यासाठी 'नो पीयूसी... नो फ्युएल' उपक्रम राबवणार! म्हणजे नेमकं काय करणार? जाणून घ्या

मुंबई: भविष्यातील पिढीला प्रदूषण मुक्त पर्यावरण देण्यासाठी सध्याच्या पिढीने स्वतः वर पर्यावरण पूरक काही

मनोज जरांगे यांची आणखी एक नवी मागणी... ओबीसी नेत्यांमध्ये मोठी खळबळ

संभाजीनगर: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबईतील आझाद मैदानात ५ दिवस उपोषण करत, सरकारकडून आपल्या मागण्या पूर्ण

मंत्रालयातच फसवणूक! सरकारी नोकरीच्या नावाखाली घेतली मुलाखत, आणि...

नागपूर: सरकारी नोकरीचे स्वप्न प्रत्येकांचे असते, त्यासाठी तरुणवर्ग विविध भरती प्रक्रियेची तयारी करतात, मुलाखती

मराठ्यांना कुणबी दाखले देण्यास सुरुवात

भुजबळांचे गैरसमज दूर करणार, शासननिर्णय व आश्वासनांची पूर्तता करण्याचे मंत्रिमंडळ उपसमितीचे