आठवीच्या विद्यार्थ्याने दहावीच्या विद्यार्थ्यावर केला चाकूने वार ! उपचारादरम्यान मृत्यू

अहमदाबाद: गुजरातच्या अहमदाबादमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे . खोखरा येथील सेव्हन्थ डे स्कूलमध्ये शिकणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यावर एका आठवीच्या विद्यार्थ्याने चाकूने वार केला ज्यात त्याचा मृत्यू झाला . एका किरकोळ वादातून हा हल्ला केल्याचे म्हटले जात आहे . या घटनेनंतर मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी शाळेत घुसून साहित्याची तोडफोड केली व आंदोलन केले. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न शाळेने केल्याचा आरोप पालकांनी केला आहे .


मृत विद्यार्थी त्याच्या चुलत भावासोबत सेव्हन्थ डे स्कूलमध्ये शिकत होता. शाळा सुटल्यानंतर दोघेही पायऱ्या उतरत असताना त्याचे आठवीच्या विद्यार्थ्याशी भांडण झाले. भांडण इतके वाढले की त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यादरम्यान आरोपी विद्यार्थ्याने त्याच्या बॅगेतून चाकू काढला आणि समोरच्या मुलावर हल्ला केला आणि घटनास्थळावरून पळून गेला. पोलिसांनी आरोपी मुस्लिम विद्यार्थ्याला अटक केली आहे आणि हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच उपस्थित असलेल्या इतर विद्यार्थ्यांचे जबाब देखील घेतले आहेत.


पोलिसांनी घेतलेल्या जबाबानुसार हा हल्ला झाल्यानंतर शाळा प्रशासनाने त्वरित जखमी विद्यार्थ्याला दवाखान्यात नेले नाही. सुमारे अर्धा तास हा विद्यार्थी रक्ताच्या थारोळ्यात पडला होता . एकही शिक्षक किंवा कर्मचारी त्याठिकाणी आले नाहीत . पीडित विद्यार्थ्याच्या मित्रांनी त्याला ऑटोरिक्षातून दवाखान्यात नेले . पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला . या घटनेननंतर शाळेने खून झालेल्या ठिकाणी रक्त टँकरच्या साहाय्याने पाणी मागवून धुवून टाकले असेही या जबाबात म्हटले आहे .


घटनेनंतर पालकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे . त्यांनी शाळेबाहेर निदर्शने केली. संतप्त पालकांनी शाळेची तोडफोड केली आणि कर्मचाऱ्यांवरही हल्ला केला . अनेक पालकांनी आरोप केला की, काही विद्यार्थी शाळेत शस्त्रे आणि ड्रग्जसारख्या वस्तू आणत असतात. त्यांच्यावर शाळा प्रशासनाने वेळीच कारवाई केली असती तर आज ही घटना घडली नसती.

Comments
Add Comment

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; १३ एप्रिलला बैठक, वेतन आणि निवृत्तीवेतनावर अंतिम निर्णय होणार

नवी दिल्ली: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसंदर्भात लवकरच एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रीय

TRP of News Channels : वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर केंद्राकडून पुन्हा लगाम! वृत्तवाहिन्यांवरील बंदी आणखी काही आठवड्यांसाठी वाढवली

केंद्र सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांचे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) आणखी चार आठवड्यांसाठी निलंबित

Anant Ambani: अनंत अंबानींनी दिली मोठी देणगी; केरळमधील दोन मंदिरांना ६ कोटी रुपये

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी केरळमधील दोन प्रमुख धार्मिक

Manipur on edge : मणिपूरमध्ये रॉकेट हल्ल्यात दोन चिमुरड्यांचा मृत्यू; संतप्त जमावाचा सुरक्षा दलांवर हल्ला, बिष्णुपूरमध्ये तणाव

इंफाळ : मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केले आहे. बिष्णुपूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे

Amaravati Capital : 'अमरावती' आता आंध्र प्रदेशची 'कायमस्वरूपी' राजधानी; केंद्राचे गॅझेट नोटिफिकेशन जारी!

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) राजधानीबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर केंद्र सरकारने

Rajnath Singh : "पाकिस्तानने बंगालकडे वाईट नजरेने पाहिलं तर..."; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्या भडकाऊ वक्तव्याला जोरदार