आठवीच्या विद्यार्थ्याने दहावीच्या विद्यार्थ्यावर केला चाकूने वार ! उपचारादरम्यान मृत्यू

अहमदाबाद: गुजरातच्या अहमदाबादमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे . खोखरा येथील सेव्हन्थ डे स्कूलमध्ये शिकणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यावर एका आठवीच्या विद्यार्थ्याने चाकूने वार केला ज्यात त्याचा मृत्यू झाला . एका किरकोळ वादातून हा हल्ला केल्याचे म्हटले जात आहे . या घटनेनंतर मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी शाळेत घुसून साहित्याची तोडफोड केली व आंदोलन केले. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न शाळेने केल्याचा आरोप पालकांनी केला आहे .


मृत विद्यार्थी त्याच्या चुलत भावासोबत सेव्हन्थ डे स्कूलमध्ये शिकत होता. शाळा सुटल्यानंतर दोघेही पायऱ्या उतरत असताना त्याचे आठवीच्या विद्यार्थ्याशी भांडण झाले. भांडण इतके वाढले की त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यादरम्यान आरोपी विद्यार्थ्याने त्याच्या बॅगेतून चाकू काढला आणि समोरच्या मुलावर हल्ला केला आणि घटनास्थळावरून पळून गेला. पोलिसांनी आरोपी मुस्लिम विद्यार्थ्याला अटक केली आहे आणि हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच उपस्थित असलेल्या इतर विद्यार्थ्यांचे जबाब देखील घेतले आहेत.


पोलिसांनी घेतलेल्या जबाबानुसार हा हल्ला झाल्यानंतर शाळा प्रशासनाने त्वरित जखमी विद्यार्थ्याला दवाखान्यात नेले नाही. सुमारे अर्धा तास हा विद्यार्थी रक्ताच्या थारोळ्यात पडला होता . एकही शिक्षक किंवा कर्मचारी त्याठिकाणी आले नाहीत . पीडित विद्यार्थ्याच्या मित्रांनी त्याला ऑटोरिक्षातून दवाखान्यात नेले . पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला . या घटनेननंतर शाळेने खून झालेल्या ठिकाणी रक्त टँकरच्या साहाय्याने पाणी मागवून धुवून टाकले असेही या जबाबात म्हटले आहे .


घटनेनंतर पालकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे . त्यांनी शाळेबाहेर निदर्शने केली. संतप्त पालकांनी शाळेची तोडफोड केली आणि कर्मचाऱ्यांवरही हल्ला केला . अनेक पालकांनी आरोप केला की, काही विद्यार्थी शाळेत शस्त्रे आणि ड्रग्जसारख्या वस्तू आणत असतात. त्यांच्यावर शाळा प्रशासनाने वेळीच कारवाई केली असती तर आज ही घटना घडली नसती.

Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने