महापालिका निवडणुकीआधी ठाकरे बंधूंना मोठा झटका, 'या' निवडणुकीत पराभव


दोन्ही ठाकरे बंधूंना एकही जागा जिंकता आली नाही.


बेस्ट पतपेढीतील नऊ वर्षांची सत्ता ठाकरेंच्या शिवसेनेने गमावली.


मुंबई: दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीचा बहुप्रतिक्षित निकाल अखेर जाहीर झाला आहे. या निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंच्या पॅनेलला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधूंना एकही जागा जिंकता आली नाही. बेस्ट पतपेढीतील नऊ वर्षांची सत्ता ठाकरेंच्या शिवसेनेने गमावली आहे.


बेस्ट युनियनचे नेते शशांक राव यांच्या पॅनलने सर्वाधिक 14 जागा जिंकल्या, तर भाजपच्या पॅनलला 7 जागा मिळाल्या. ठाकरे बंधूंच्या 'उत्कर्ष' पॅनलला मात्र भोपळाही फोडता आला नाही.



​काय आहे निकाल:-


​शशांक राव पॅनल: 14


​प्रसाद लाड पॅनल: 07


मनसे - शिवसेना: 00


१८ ऑगस्टला या निवडणुकीसाठी मतदान झाले होते. या निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर होणार होता. मात्र मुंबईत मंगळवारी मुसळधार पाऊस झाल्याने मजमोजणीस विलंब झाला. अखेर रात्री उशिरा या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनेलला जबर धक्का बसला आहे.


बेस्ट वर्कर्स युनियनच्या शशांक राव पॅनलचे १४ उमेदवार निवडून आले आहेत. हा विजय म्हणजे बेस्ट कर्मचाऱ्यांनी युनियनने केलेल्या कामाला दिलेली खरी पोचपावती आहे. ​गेल्या अनेक वर्षांत शिवसेनेने बेस्टमध्ये जे खाजगीकरण आणले आणि कामगारविरोधी धोरणे राबवली, त्याबद्दलची कर्मचाऱ्यांची चीड या निकालातून दिसून येते. म्हणूनच त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नसल्याचे बोलले जात आहे.

Comments
Add Comment

MahaCare : महाकेअरच्या माध्यमातून राज्यात जागतिक दर्जाच्या कर्करोग उपचार सुविधा; नागपुरात हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्पाला मंजुरी

मुंबई : राज्यातील कर्करोग रुग्णांना जागतिक दर्जाचे उपचार आणि संशोधन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र

Devendra Fadnavis : आता शाळेत मिळणार 'ड्रग्ज'च्या दुष्परिणामांचे धडे

मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्र व्यूहरचना आणि कृती योजनेबाबत

Central Railway : कर्जत-लोणावळा रेल्वे मार्ग पूर्णपणे पूर्ववत; 17 जुलैपासून अनेक एक्सप्रेस गाड्या पुन्हा मूळ मार्गावर

मुंबई : कर्जत-लोणावळा (Karjat lonavala) दरम्यानच्या मध्य रेल्वेच्या दक्षिण-पूर्व डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे

Transformation of railway stations : पंतप्रधान मोदी उद्या ७५ स्थानके राष्ट्राला करणार समर्पित; 'अमृत भारत' योजनेचा वेग वाढला

मुंबई: रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि स्थानकांचे रूप पालटावे, या उद्देशाने

Pratap Sarnaik : ओला, उबरसह सर्व कंपन्यांना आता राज्य सरकारचा परवाना बंधनकारक

महाराष्ट्राचे नवे ॲग्रीगेटर धोरण लागू; रिक्षा टॅक्सीप्रमाणे चालकांना बॅच बंधनकारक मुंबई : महाराष्ट्रातील

Devendra Fadnavis : महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारे राज्य बनवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; गव्हर्नन्स प्रोसेस रि-इंजिनियरिंग संदर्भात तिसऱ्या टप्प्याची बैठक मुंबई : राज्य